शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

‘एलईडीं’च्या प्रकाशात उजळले कातरखटाव!

By admin | Updated: October 16, 2015 00:58 IST

सामाजिक बांधिलकी : सावली फाउंडेशनने लाखो रुपये खर्चून चौकाचौकात उभारले टॉवर -- गूड न्यूज

विठ्ठल नलवडे - कातरखटाव--शहरातील झगमगाट, रात्रीच्या वेळी पथदिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालेले रस्ते, हे चित्र आपल्याही गावात निर्माण व्हावे, असे स्वप्न प्रत्येक गावकऱ्यांच्या मनात असतं. कातरखटाववासीयांच्या मनात असलेलं हे स्वप्न सत्यात उतरवलंय सावली फाउंडेशनने. संस्थेनं स्वखर्चातून १९ लाख रुपये खर्चून गावातील चौकाचौकात उभारलेल्या एलईडी पथदिव्यांमुळं अख्खं गाव प्रकाशानं उजळून निघालंय.गेल्या चाळीस वर्षांपासून अंधारमय असलेल्या कातरखटाव गावाला झळाळी देण्याचे काम येथील सावली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सरपंच तानाजी बागल यांनी विधायक कार्यातून केले आहे. कोणतेही सत्ता नसताना लाखो रूपये खर्चून विकासकाम मार्गी लावली आहेत. बसस्टॉप ते जानाई चौक या मार्गावर नव्याने बसविण्यात आलेले एलईडी दिवे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले असून कातरखटाव व परिसरातील लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. गेली पंधरा दिवस कातरखटाव मुख्य चौक, मारूती मंदिर, शिवाजी चौक, कुंभार चौक, जानाई चौक, मातंगवस्ती, मानेवाडी, तुपेवाडी येथे बसविण्यात आलेल्या पथदिव्यांमुळे कातरखटाव गावाला झळाळी मिळाली आहे. सर्वांना बरोबर घेऊन तानाजी बागल काम करत आहेत. गावाला बसस्टॉप कुठे आहे माहीत नव्हते. कातरखटाव, शिंगाडवाडी, रानमळा या बसथांब्यावर रखरखत्या उन्हात शाळेतील मुले, ज्येष्ठ नागरिकांना उभे रहायला जागा नव्हती. तिथे पिकअप शेड उभारण्यात आली. संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. वाड्यावस्त्यावरील रस्त्याचे काम, तसेच आठवड्यातून एकदा दवाखान्याची गाडी सुरू करण्यात आली असून यामध्ये रूग्णासाठी मोफत उपचाराची सोय सावली संस्थेतर्फे करण्यात आली आहे. गावातील जुन्या हातपंपावर नवीन पाईप वाढविण्यात आल्या असून आजूबाजूच्या खेड्यापाड्यात लाखो रूपयांची विकासकामे सावली फाउंडेशन संस्थेतर्फे मार्गी लावण्यात आली आहेत. संस्थेच्या सामाजिक कार्याचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. खटाव तालुक्यातील पहिलाच उपक्रमएखाद्या गावात एलईडी पथदिवे बसविण्याचा तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. गावातील चौका-चौकात लावलेल्या पथदिव्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांची बालगोपाळांबरोबर वर्दळ वाढू लागली आहे. या पथदिव्यामुळे नागरिकांना एक वेगळी अनुभूती येत असून गावागावात, खेड्यापाड्यात पथदिव्याची जोरात चर्चा चालू आहे.गावासाठी पदरमोड करणारज्याला खरच गावचा विकास करायचा आहे. त्याला सत्ताच हातात पाहिजे असे नाही. ज्यांना विकासच करायचा नाही, त्यांना पळवाटा भरपूर आहेत. माझ्याकडे सत्ता असो किंवा नसो, वेळ पडेल तिथे पदरमोड करून गावाचा विकास करणार.- तानाजी बागल, सरपंच, कातरखटाव