शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

‘एलईडीं’च्या प्रकाशात उजळले कातरखटाव!

By admin | Updated: October 16, 2015 00:58 IST

सामाजिक बांधिलकी : सावली फाउंडेशनने लाखो रुपये खर्चून चौकाचौकात उभारले टॉवर -- गूड न्यूज

विठ्ठल नलवडे - कातरखटाव--शहरातील झगमगाट, रात्रीच्या वेळी पथदिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालेले रस्ते, हे चित्र आपल्याही गावात निर्माण व्हावे, असे स्वप्न प्रत्येक गावकऱ्यांच्या मनात असतं. कातरखटाववासीयांच्या मनात असलेलं हे स्वप्न सत्यात उतरवलंय सावली फाउंडेशनने. संस्थेनं स्वखर्चातून १९ लाख रुपये खर्चून गावातील चौकाचौकात उभारलेल्या एलईडी पथदिव्यांमुळं अख्खं गाव प्रकाशानं उजळून निघालंय.गेल्या चाळीस वर्षांपासून अंधारमय असलेल्या कातरखटाव गावाला झळाळी देण्याचे काम येथील सावली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सरपंच तानाजी बागल यांनी विधायक कार्यातून केले आहे. कोणतेही सत्ता नसताना लाखो रूपये खर्चून विकासकाम मार्गी लावली आहेत. बसस्टॉप ते जानाई चौक या मार्गावर नव्याने बसविण्यात आलेले एलईडी दिवे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले असून कातरखटाव व परिसरातील लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. गेली पंधरा दिवस कातरखटाव मुख्य चौक, मारूती मंदिर, शिवाजी चौक, कुंभार चौक, जानाई चौक, मातंगवस्ती, मानेवाडी, तुपेवाडी येथे बसविण्यात आलेल्या पथदिव्यांमुळे कातरखटाव गावाला झळाळी मिळाली आहे. सर्वांना बरोबर घेऊन तानाजी बागल काम करत आहेत. गावाला बसस्टॉप कुठे आहे माहीत नव्हते. कातरखटाव, शिंगाडवाडी, रानमळा या बसथांब्यावर रखरखत्या उन्हात शाळेतील मुले, ज्येष्ठ नागरिकांना उभे रहायला जागा नव्हती. तिथे पिकअप शेड उभारण्यात आली. संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. वाड्यावस्त्यावरील रस्त्याचे काम, तसेच आठवड्यातून एकदा दवाखान्याची गाडी सुरू करण्यात आली असून यामध्ये रूग्णासाठी मोफत उपचाराची सोय सावली संस्थेतर्फे करण्यात आली आहे. गावातील जुन्या हातपंपावर नवीन पाईप वाढविण्यात आल्या असून आजूबाजूच्या खेड्यापाड्यात लाखो रूपयांची विकासकामे सावली फाउंडेशन संस्थेतर्फे मार्गी लावण्यात आली आहेत. संस्थेच्या सामाजिक कार्याचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. खटाव तालुक्यातील पहिलाच उपक्रमएखाद्या गावात एलईडी पथदिवे बसविण्याचा तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. गावातील चौका-चौकात लावलेल्या पथदिव्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांची बालगोपाळांबरोबर वर्दळ वाढू लागली आहे. या पथदिव्यामुळे नागरिकांना एक वेगळी अनुभूती येत असून गावागावात, खेड्यापाड्यात पथदिव्याची जोरात चर्चा चालू आहे.गावासाठी पदरमोड करणारज्याला खरच गावचा विकास करायचा आहे. त्याला सत्ताच हातात पाहिजे असे नाही. ज्यांना विकासच करायचा नाही, त्यांना पळवाटा भरपूर आहेत. माझ्याकडे सत्ता असो किंवा नसो, वेळ पडेल तिथे पदरमोड करून गावाचा विकास करणार.- तानाजी बागल, सरपंच, कातरखटाव