शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

एलईडीच्या गायब फाईलचा सभेत प्रकाश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2016 01:03 IST

--सत्ताधाऱ्यांकडून पदाधिकारी धारेवर : गुन्हा दाखल करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन; सभेत विविध ४६ विषयांना बहुमताने मंजुरी --सातारा पालिका सर्वसाधारण सभा

सातारा : सातारा पालिकेच्या प्रशासनाच्या कारभाराची सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी शनिवारी लक्तरेच काढली. शहरातील अनेक भागांतील पथदिवे बंद आहेत. तक्रारी करूनही पालिकेचे विद्युत अभियंते सूर्यकांत साळुंखे कामे करीत नाहीत. नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. अशा अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करून साळुंखे यांना नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. मात्र, असे असताना ठेकेदाराला ३० लाखांची बिले देण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर टेंडरची फाईल पालिकेतून गायब झाल्याची धक्कादायक माहिती सभेत उघडकीस आली. नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.सभेत विषय पत्रिकेवरील ४६ विषयांना गदारोळात मंजुरी देण्यात आली. विषयांना मंजुरी देण्यापूर्वी सातारा शहरातील पथदिव्यांचा विषय सभागृहात चर्चेला आला. नगरसेविका सुवर्णा पाटील यांनी सदर बझार भागात गेल्या पंधरा दिवसांपासून रस्त्यावरील दिवे लागत नाहीत. पालिकेचे अभियंता सूर्यकांत साळुंखे यांच्याकडे अनेकदा तक्रारी करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पदाधिकाऱ्यांनी सांगून कामे होत नसतील तर सर्वसामान्य जनतेची कामे होतील का, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. नगरसेविका मुक्ता लेवे म्हणाल्या, ‘साळुंखे यांना निलंबित केले तरी त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाते. सेवेत घेण्यामागे नेमका कोणाचा हात आहे. शहरातील अनेक भाग अंधारात आहेत. सर्वच नगरसेवक साळुंखे यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत आहेत. अशा अधिकाऱ्याला घरी पाठविला पाहिजे.’ अशी त्यांनी मागणी केली.शहरातील रस्त्यावरील बंद दिव्यावरून विद्युत अभियंता साळुंखे यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रवीण पाटील म्हणाले, ‘विद्युत विभागातील सावळा गोंधळामुळे पालिकेला लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे.’ अशोक मोने म्हणाले, ‘विद्युत अभियंता साळुंखे हे पालिकेतील ‘नंदीबैल’ आहेत.’ सदस्य म्हणाले की, ‘तेवढ्यापुरते मान डोलावतात. साळुंखेंवर आत्तापर्यंत चार ते पाच वेळा निलंबनाची कारवाई होते पुन्हा त्याला घेतले जाते. त्यापेक्षा ठेका पद्धतीने अभियंत्याची नेमणूक करून साळुंखेंना घरी पाठवावे,’ अशी मागणी नगरसेवक महेश जगताप, जयेंद्र चव्हाण, रवी पवार यांनी केली. (प्रतिनिधी)कृत्रिम तलावाचे भिजत घोंगडे !गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तळे निर्मितीसाठी १५ लाखांची तरतूद केली आहे. मात्र ती अपुरी आहे. गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तळी उभारणीसाठी ५८ लाख रुपये लागत आहेत. पालिकेची स्थिती नसल्यामुळे गणेश मंडळांनी शाडू-मातीच्या लहान मूर्ती बसवाव्यात म्हणजे विसर्जनास सोपे जाईल. यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला. गणेश मंडळांच्या गणेश मूर्ती तयार झाल्या आहेत. पालिकेला कृत्रिम तळे शक्य नसेल तर पूर्वी प्रमाणे मंगळवार तळे, मोती तळ्यांमध्ये विर्सजनास परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवक अशोक मोने यांच्यासह अनेकांनी केली. यावर नगरसेविका हेमांगी जोशी, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम यांनी या तळ्यांमध्ये विसर्जन करण्यास आक्षेप घेतला. प्रशासनाने कृत्रिम तळ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी जागेची मागणी करावी पालिका एकदाच खर्च करेल, अशी मागणी सभागृहात नगरसेवकांनी केली. स्वच्छतागृह पाडणाऱ्यांवर कारवाई होणार !पालिकेची सभा सुरू असताना प्रभाग ९ मधील पालिकेच्या मालकीची शौचालये पाडण्यात आली. ही शौचालये पाडताना पालिकेने परवानगी दिली होती का? असा प्रश्न या प्रभागातील नगरसेवक कल्याण राक्षे यांनी आरोग्य विभागाचे निरीक्षक साखरे व बांधकाम विभागाला विचारला. त्यावेळी दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला शौचालय पाडल्याची माहिती नाही, अशी मोघम उत्तरे देऊन संबंधित बिल्डरला पाठीशी घालण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला. यावेळी नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, प्रवीण पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. अधिकाऱ्यांना आत्ताच त्या भागात जाऊन शौचालय कोणी पाडले याची खातरजमा करावी आणि संबंधितांवर मालमत्तेचे नुकसान केले म्हणून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली.यावेळी अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. आरोग्य विभागाचे निरीक्षक साखरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि सभागृहात यावर ते म्हणाले, ‘शौचालये पाडण्यात आली असल्याचा खुलासा केला. यावर मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.’