शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

अंधकारमय वाटेवर ज्ञानाचा प्रकाश..!

By admin | Updated: July 10, 2015 22:17 IST

शिक्षणाचे द्वार खुले : शाळाबाह्य मुले वळणार आता ‘गमभन’कडे

खंडाळा : शाळाबाह्य मुले हा शैक्षणिक प्रगतीच्या मार्गातील मोठा अडथळा मानला जातो. म्हणून शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांना वयानुरूप शिक्षणाची दारे उघडली गेली आहेत. त्यामुळे समाजातील गोरगरीब, फिरस्ती कुटुंबातील, भीक मागून उदरनिर्वाह करणारी मुले, कामगारांची मुले आता शाळेत जावू लागली आहेत. ती आता ‘गमभन’ शिकू लागली आहेत. जीवनाच्या अंध:कारमय वाटेवर ज्ञानाचा प्रकाश झळकल्याने या मुलांचे आयुष्य उज्वल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सातारा जिल्हा परिषदेने राज्य सरकारच्या धोरणानुसार ४ जुलै रोजी एकाचवेळी शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण केले. शाळेपासून वंचित असलेल्या ६ ते १४ वयोगटातील मुलांना शोधून त्यांची पाऊले शाळेच्या दिशेने वाटचाल करु लागली आहेत. गरिबांनी शिक्षणाच्या प्रवाहात आल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. पण गरीब शिक्षणापर्यंत येऊ शकत नसतील तर शिक्षणाने त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. याच धोरणातून खंंडाळा तालुक्यात ही मोहीम यशस्वीरित्या राबविली गेली. त्यानुसार तालुक्यात एकूण ६२ मुले शाळाबाह्य आढळून आली. त्यांना आता शाळेत दाखल करुन प्रत्यक्ष शिक्षण देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.खंडाळा येथील प्राथमिक शाळेत यापैकी काही मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. घरोघरी फिरणारी, रस्त्याकडेला खेळणारी ही मुले आता ‘गमभन’ अशी अक्षरे गिरवू लागली आहेत. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत आहे. (प्रतिनिधी)उपस्थिती टिकवणे मोठी समस्या...आजपर्यंत शाळेच्या बाहेर वावरणारी ही मुले शाळेत दाखल झाली खरी, पण ती रोज शाळेत येणे व टिकणे मोठे कष्टाचे काम आहे. एकतर त्यांची कुटुंबे स्थलांतरित होत असतात. अथवा काही मुले भीक मागून उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर काही कुटुंबे अवलंबून असतात. त्यामुळे ही मुले शाळेत आल्याने पोटाचे काय असा प्रश्न उभा राहतो. वास्तविक या मुलांसाठी निवासी शाळांची सोय होणे गरजेचे आहे. कुटुंबांना स्थैर्य मिळेल असे काम मिळणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.खंडाळा तालुक्यात सर्व्हेक्षणाप्रमाणे आढळलेल्या शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. शाळाबाह्य मुलांचे शिकणे प्रभावी करण्यासाठी त्यांना येते ते जाणून घेऊन अभ्यासक्रमाच्या चौकटीत बांधण्याची, त्यांच्या ज्ञात बाजू समजावून घेण्याची गरज आहे. व्यावहारिक ज्ञानाला आपल्या शालेय प्रक्रियेत उपयोजित केल्यास ही मुले वेगाने शिकताना दिसतील.-गजानन आडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, खंडाळा