शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अंधकारमय वाटेवर ज्ञानाचा प्रकाश..!

By admin | Updated: July 10, 2015 22:17 IST

शिक्षणाचे द्वार खुले : शाळाबाह्य मुले वळणार आता ‘गमभन’कडे

खंडाळा : शाळाबाह्य मुले हा शैक्षणिक प्रगतीच्या मार्गातील मोठा अडथळा मानला जातो. म्हणून शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांना वयानुरूप शिक्षणाची दारे उघडली गेली आहेत. त्यामुळे समाजातील गोरगरीब, फिरस्ती कुटुंबातील, भीक मागून उदरनिर्वाह करणारी मुले, कामगारांची मुले आता शाळेत जावू लागली आहेत. ती आता ‘गमभन’ शिकू लागली आहेत. जीवनाच्या अंध:कारमय वाटेवर ज्ञानाचा प्रकाश झळकल्याने या मुलांचे आयुष्य उज्वल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सातारा जिल्हा परिषदेने राज्य सरकारच्या धोरणानुसार ४ जुलै रोजी एकाचवेळी शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण केले. शाळेपासून वंचित असलेल्या ६ ते १४ वयोगटातील मुलांना शोधून त्यांची पाऊले शाळेच्या दिशेने वाटचाल करु लागली आहेत. गरिबांनी शिक्षणाच्या प्रवाहात आल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. पण गरीब शिक्षणापर्यंत येऊ शकत नसतील तर शिक्षणाने त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. याच धोरणातून खंंडाळा तालुक्यात ही मोहीम यशस्वीरित्या राबविली गेली. त्यानुसार तालुक्यात एकूण ६२ मुले शाळाबाह्य आढळून आली. त्यांना आता शाळेत दाखल करुन प्रत्यक्ष शिक्षण देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.खंडाळा येथील प्राथमिक शाळेत यापैकी काही मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. घरोघरी फिरणारी, रस्त्याकडेला खेळणारी ही मुले आता ‘गमभन’ अशी अक्षरे गिरवू लागली आहेत. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत आहे. (प्रतिनिधी)उपस्थिती टिकवणे मोठी समस्या...आजपर्यंत शाळेच्या बाहेर वावरणारी ही मुले शाळेत दाखल झाली खरी, पण ती रोज शाळेत येणे व टिकणे मोठे कष्टाचे काम आहे. एकतर त्यांची कुटुंबे स्थलांतरित होत असतात. अथवा काही मुले भीक मागून उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर काही कुटुंबे अवलंबून असतात. त्यामुळे ही मुले शाळेत आल्याने पोटाचे काय असा प्रश्न उभा राहतो. वास्तविक या मुलांसाठी निवासी शाळांची सोय होणे गरजेचे आहे. कुटुंबांना स्थैर्य मिळेल असे काम मिळणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.खंडाळा तालुक्यात सर्व्हेक्षणाप्रमाणे आढळलेल्या शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. शाळाबाह्य मुलांचे शिकणे प्रभावी करण्यासाठी त्यांना येते ते जाणून घेऊन अभ्यासक्रमाच्या चौकटीत बांधण्याची, त्यांच्या ज्ञात बाजू समजावून घेण्याची गरज आहे. व्यावहारिक ज्ञानाला आपल्या शालेय प्रक्रियेत उपयोजित केल्यास ही मुले वेगाने शिकताना दिसतील.-गजानन आडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, खंडाळा