शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

अंधकारमय वाटेवर ज्ञानाचा प्रकाश..!

By admin | Updated: July 10, 2015 22:17 IST

शिक्षणाचे द्वार खुले : शाळाबाह्य मुले वळणार आता ‘गमभन’कडे

खंडाळा : शाळाबाह्य मुले हा शैक्षणिक प्रगतीच्या मार्गातील मोठा अडथळा मानला जातो. म्हणून शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांना वयानुरूप शिक्षणाची दारे उघडली गेली आहेत. त्यामुळे समाजातील गोरगरीब, फिरस्ती कुटुंबातील, भीक मागून उदरनिर्वाह करणारी मुले, कामगारांची मुले आता शाळेत जावू लागली आहेत. ती आता ‘गमभन’ शिकू लागली आहेत. जीवनाच्या अंध:कारमय वाटेवर ज्ञानाचा प्रकाश झळकल्याने या मुलांचे आयुष्य उज्वल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सातारा जिल्हा परिषदेने राज्य सरकारच्या धोरणानुसार ४ जुलै रोजी एकाचवेळी शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण केले. शाळेपासून वंचित असलेल्या ६ ते १४ वयोगटातील मुलांना शोधून त्यांची पाऊले शाळेच्या दिशेने वाटचाल करु लागली आहेत. गरिबांनी शिक्षणाच्या प्रवाहात आल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. पण गरीब शिक्षणापर्यंत येऊ शकत नसतील तर शिक्षणाने त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. याच धोरणातून खंंडाळा तालुक्यात ही मोहीम यशस्वीरित्या राबविली गेली. त्यानुसार तालुक्यात एकूण ६२ मुले शाळाबाह्य आढळून आली. त्यांना आता शाळेत दाखल करुन प्रत्यक्ष शिक्षण देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.खंडाळा येथील प्राथमिक शाळेत यापैकी काही मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. घरोघरी फिरणारी, रस्त्याकडेला खेळणारी ही मुले आता ‘गमभन’ अशी अक्षरे गिरवू लागली आहेत. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत आहे. (प्रतिनिधी)उपस्थिती टिकवणे मोठी समस्या...आजपर्यंत शाळेच्या बाहेर वावरणारी ही मुले शाळेत दाखल झाली खरी, पण ती रोज शाळेत येणे व टिकणे मोठे कष्टाचे काम आहे. एकतर त्यांची कुटुंबे स्थलांतरित होत असतात. अथवा काही मुले भीक मागून उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर काही कुटुंबे अवलंबून असतात. त्यामुळे ही मुले शाळेत आल्याने पोटाचे काय असा प्रश्न उभा राहतो. वास्तविक या मुलांसाठी निवासी शाळांची सोय होणे गरजेचे आहे. कुटुंबांना स्थैर्य मिळेल असे काम मिळणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.खंडाळा तालुक्यात सर्व्हेक्षणाप्रमाणे आढळलेल्या शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. शाळाबाह्य मुलांचे शिकणे प्रभावी करण्यासाठी त्यांना येते ते जाणून घेऊन अभ्यासक्रमाच्या चौकटीत बांधण्याची, त्यांच्या ज्ञात बाजू समजावून घेण्याची गरज आहे. व्यावहारिक ज्ञानाला आपल्या शालेय प्रक्रियेत उपयोजित केल्यास ही मुले वेगाने शिकताना दिसतील.-गजानन आडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, खंडाळा