शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याचा उत्तरार्ध परमार्थाने उजळतोय!

By admin | Updated: August 19, 2015 21:21 IST

कऱ्हाडचे महिला मंडळ : भजन सेवेची रौप्यमहोत्सवी वाटचाल

प्रमोद सुकरे - कऱ्हाड  महाराष्ट्रातील सुमारे ८५० वर्षांपूर्वीपासून संत विचारांची परंपरा आजच्या जमान्यातही टिकून आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आदींनी घालून दिलेल्या परमार्थाच्या वाटेवरूनच अनेकांचे मार्गक्रमण चालू असल्याचे आजही दिसते. कऱ्हाडच्या वीरशैव महिला भजनी मंडळाने तर गेल्या २५ वर्षांपासून अभंग, ओव्या, गवळणी म्हणत रौप्यमहोत्सवी वाटचाल केली आहे. या मंडळातील बहुतांशी सदस्यांनी साठी तर गाठली आहेच; पण काहीनी वयाची पंचाहत्तरीही पूर्ण केली आहे.भजन सेवेतून आपले जगणे सुसह्य करणाऱ्या, भजन सेवेत दंग राहणाऱ्या या सदस्यांना ‘राम राम म्हणता म्हणता, जावो प्राण’ असेच वाटत असावे. जणू त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध परमार्थानेच उजळतोय, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या धमण्यांतून संतांचे विचार वाहतात, असं म्हंटलं तरी चुकीचे ठरणार नाही. जन्माचे ते मूळ । पाहिले शोधून । दु:खाशी कारण । जन्म घ्यावा ।।म्हणजे, दु:ख भेगण्यासाठीच माणसाने जन्म घ्यावा, असे संत सांगतात तर, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधुनी पाहे ।, असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. त्यामुळे या सर्व दु:खावर ‘विठ्ठलाचे नामस्मरण’ हा एकमेव रामबाण उपाय आहे, हे कळल्यामुळेच कऱ्हाडातील पंधरा-वीस महिला १९९१ मध्ये एकत्र आल्या. भजनी मंडळ स्थापन करायचं ठरवलं. गणेश पारगावकर यांच्याकडून भजनाचे धडे घेतले; अन् आजवर हजारो भजनांचे कार्यक्रम त्यांनी केले. खरंतर प्रत्येकाच्या जीवनात, प्रपंच्यात अनेक व्यथा, अडचणी, अपार कष्ट, हे सारं असतंच; पण त्या साऱ्यावर पुष्पा दळवी, सुनंदा देशमाने, रेखा घाटे, सुरेखा डुबल, कालिंदी डुबल, शालन विभुते, राजश्री चिंगळे, सुमन जंगम, कमल बेडके, लता बेंद्रे, छाया मुंढेकर, लीला फल्ले, उषा उमरदंड, मुक्ता घाटे, कल्पना दळवी, सुनीता गुजर, शालिनी वांगकर, जयश्री तोडकर यांनी महिला भजनी मंडळाची वाटचाल सुरू केली. एखाद्या गोष्टीत स्वत:ला झोकून देणं अन् त्यात सलग २५ वर्षे सातत्य ठेवणं खूप कठीण काम; पण ते काम या महिलांनी केलं आहे.सामाजिक बांधिलकीचीही जाणीव भजन अन् रूद्र पठणात नेहमी मग्न राहणाऱ्या या महिलांच्या मनात सामाजिक बांधिलकीची जाणही तितकीच आहे. म्हणून तर दुष्काळग्रस्त भागातील चारा छावणीसाठी आर्थिक मदत, कारगिल युद्धातील शहीद झालेल्या सैनिकांच्या कल्याणनिधीसही मदतीचा हात त्यांनी त्या-त्यावेळी दिला आहे. खरंतर आज सासूने सुनेचं अन् सुनेनं सासूचं कौतुक केल्याचं दृश्य दुर्मिळ झालंय; पण भजनसेवेची रौप्यमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या या सर्व सासवांचा त्यांच्या सुनांनी नुकताच एक कार्यक्रम घेऊन सत्कार केला. तेव्हा आता ‘तुम्ही चालवा हा पुढे वारसा’ अशी साद सासूबार्इंनी आपल्या सूनबार्इंना घातली. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, प्रा. शीला कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्या जपताहेत रूद्र पठणाचीही परंपरा... भजनाबरोबर या मंडळाच्या सदस्या रूद्र पठणही करतात. सुमारे तीन तास चालणाऱ्या रूद्र पठणाचे कऱ्हाडसह मुंबई, पुणे, केल्हापूर आदी जिल्ह्यांत केले आहेत. आजवर त्यांनी सुमोर पाचशे कार्यक्रम केले असल्याचे पुष्पा दळवी सांगतात. त्यांच्या या उपक्रमांचेही समाजातून कौतुक होत आहे.