शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट आॅफिसला लेटलतिफांचे ग्रहण

By admin | Updated: July 15, 2016 22:38 IST

शिरवळकरांचे हाल : तातडीने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

शिरवळ : ‘थांबा...शिरवळ पोस्ट आॅफिसला येताय...जरा उशिराने या..,’ असे निरोप सध्या पोस्ट आॅफिसकडे येणाऱ्या नागरिकांना देत आहे. शिरवळ पोस्ट आॅफिस व सातारा येथील प्रवर अधीक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ही वेळ शिरवळमधील नागरिकांवर आली आहे. त्यामुळे शिरवळ येथील पोस्ट आॅफिस शिरवळकरांसाठी बंद करणे आहे, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.औद्योगिकदृष्ट्या प्रगत होत असलेले शिरवळ हे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी जय तुळजाभवानी मंगल कार्यालयासमोर पोस्ट आॅफिस असून, पोस्ट आॅफिस म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था शिरवळकरांची झाली आहे. येथील पोस्टमास्तरसह कर्मचारी म्हणजे ह्यआओ जाओ घर तुम्हाराह्ण या उक्तीप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून वागत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात आलेला एक कर्मचारी तर नागरिकांना व विचारणा करण्यास आलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनाही अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे याबाबत सातारा येथील पोस्ट आॅफिसच्या प्रवर अधीक्षक कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता नेमकी कोणती तक्रार आहे हे न ऐकताच तुम्हाला काय सांगायचे आहे ते एका ओळीमध्ये किंवा चार ओळीमध्ये लेखी सातारा कार्यालयाला पाठवा आम्ही तुम्हाला पत्ता देतो, असे सांगितले. शिरवळकरिता येणारे विविध पार्सल, पत्र व इतर कागदपत्रही साताराहून सरळ शिरवळला न येता वाई येथे पाठवून मग एसटी ने याठिकाणी पाठवून मगच शिरवळ पोस्ट आॅफिसला पाठविले जातात. त्यामुळे शिरवळ पोस्ट आॅफिसमधील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वाईहून येणाऱ्या पार्सलची वाट पाहत शिरवळ बसस्थानकात तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे.विशेष म्हणजे शिरवळमधील तब्बल ९२ शिक्षकांच्या पीपीएफचा प्रश्न हा फेब्रुवारी महिन्यापासून विविध कारणांमुळे तिष्ठत पडला आहे. तिच अवस्था आरडी खात्याबाबतही झाली आहे तर येथे नेमण्यात आलेला कर्मचारी वर्गही नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात दिलेला असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)जनसेट अभावी काम ठप्पशिरवळ पोस्ट आॅफिसमधील जनसेट केवळ शोपीस बनले आहे. जनसेटमधील बॅटऱ्या चोरीला गेल्याने शिरवळमधील पोस्टमास्तर यांनी नवीन बॅटऱ्या खरेदीकामी पाठविलेले कोटेशन सातारा येथील प्रवर अधीक्षक कार्यालयाने अद्यापही मंजूर न केल्याने जनसेट एक वर्षभरापासून बंद अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे पोस्ट आॅफिसची लाईट गेल्यास येथील कामकाज पूर्णपणे ठप्प पडत आहे.दोघांवरच अख्ख्या शिरवळचा ताणसातारा येथील प्रवर अधीक्षक कार्यालयाने येथील पोस्टमन कमी केल्याने शिरवळ व परिसरातील पत्रवाटपाचा सगळा बोजा हा दोनच पोस्टमनवर आला आहे. एकीकडे केंद्र शासनाकडून पोस्ट आॅफिसचे रूपांतर बँकेमध्ये करण्याचे प्रयत्न सुरू असताना सातारा येथील प्रवर अधीक्षक कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका शिरवळकरांना विशेषत: महिला वर्ग व वयोवृद्धांना बसत आहे.