शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

पोस्ट आॅफिसला लेटलतिफांचे ग्रहण

By admin | Updated: July 15, 2016 22:38 IST

शिरवळकरांचे हाल : तातडीने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

शिरवळ : ‘थांबा...शिरवळ पोस्ट आॅफिसला येताय...जरा उशिराने या..,’ असे निरोप सध्या पोस्ट आॅफिसकडे येणाऱ्या नागरिकांना देत आहे. शिरवळ पोस्ट आॅफिस व सातारा येथील प्रवर अधीक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ही वेळ शिरवळमधील नागरिकांवर आली आहे. त्यामुळे शिरवळ येथील पोस्ट आॅफिस शिरवळकरांसाठी बंद करणे आहे, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.औद्योगिकदृष्ट्या प्रगत होत असलेले शिरवळ हे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी जय तुळजाभवानी मंगल कार्यालयासमोर पोस्ट आॅफिस असून, पोस्ट आॅफिस म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था शिरवळकरांची झाली आहे. येथील पोस्टमास्तरसह कर्मचारी म्हणजे ह्यआओ जाओ घर तुम्हाराह्ण या उक्तीप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून वागत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात आलेला एक कर्मचारी तर नागरिकांना व विचारणा करण्यास आलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनाही अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे याबाबत सातारा येथील पोस्ट आॅफिसच्या प्रवर अधीक्षक कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता नेमकी कोणती तक्रार आहे हे न ऐकताच तुम्हाला काय सांगायचे आहे ते एका ओळीमध्ये किंवा चार ओळीमध्ये लेखी सातारा कार्यालयाला पाठवा आम्ही तुम्हाला पत्ता देतो, असे सांगितले. शिरवळकरिता येणारे विविध पार्सल, पत्र व इतर कागदपत्रही साताराहून सरळ शिरवळला न येता वाई येथे पाठवून मग एसटी ने याठिकाणी पाठवून मगच शिरवळ पोस्ट आॅफिसला पाठविले जातात. त्यामुळे शिरवळ पोस्ट आॅफिसमधील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वाईहून येणाऱ्या पार्सलची वाट पाहत शिरवळ बसस्थानकात तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे.विशेष म्हणजे शिरवळमधील तब्बल ९२ शिक्षकांच्या पीपीएफचा प्रश्न हा फेब्रुवारी महिन्यापासून विविध कारणांमुळे तिष्ठत पडला आहे. तिच अवस्था आरडी खात्याबाबतही झाली आहे तर येथे नेमण्यात आलेला कर्मचारी वर्गही नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात दिलेला असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)जनसेट अभावी काम ठप्पशिरवळ पोस्ट आॅफिसमधील जनसेट केवळ शोपीस बनले आहे. जनसेटमधील बॅटऱ्या चोरीला गेल्याने शिरवळमधील पोस्टमास्तर यांनी नवीन बॅटऱ्या खरेदीकामी पाठविलेले कोटेशन सातारा येथील प्रवर अधीक्षक कार्यालयाने अद्यापही मंजूर न केल्याने जनसेट एक वर्षभरापासून बंद अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे पोस्ट आॅफिसची लाईट गेल्यास येथील कामकाज पूर्णपणे ठप्प पडत आहे.दोघांवरच अख्ख्या शिरवळचा ताणसातारा येथील प्रवर अधीक्षक कार्यालयाने येथील पोस्टमन कमी केल्याने शिरवळ व परिसरातील पत्रवाटपाचा सगळा बोजा हा दोनच पोस्टमनवर आला आहे. एकीकडे केंद्र शासनाकडून पोस्ट आॅफिसचे रूपांतर बँकेमध्ये करण्याचे प्रयत्न सुरू असताना सातारा येथील प्रवर अधीक्षक कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका शिरवळकरांना विशेषत: महिला वर्ग व वयोवृद्धांना बसत आहे.