शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

बैलगाडी शर्यतप्रकरणी पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:36 IST

ओगलेवाडी : ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे दैवत व सुखदुःखाच्या क्षणाचा सोबती असलेला बैल हा पाळीव प्राणी असल्याने बैलाला पशू व जंगली ...

ओगलेवाडी : ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे दैवत व सुखदुःखाच्या क्षणाचा सोबती असलेला बैल हा पाळीव प्राणी असल्याने बैलाला पशू व जंगली प्राण्याच्या यादीतून तत्काळ वगळावे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी विनाविलंब सुरू करून शेतकऱ्यांचा पारंपरिक खेळ असलेल्या बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू कराव्यात. यासाठी सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. पत्राची प्रत बैलगाडी संघटनेला देत राष्ट्रवादी शेतकऱ्यांसोबत असल्याची ग्वाही दिली आहे.

सह्याद्री कारखान्याचे संचालक रामदास पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव यांच्या हस्ते पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पत्राची प्रत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष उदयसिंह पाटील यांना देण्यात आली. यावेळी विलास देशमुख, अधिक सुर्वे, मिलिंद सुर्वे, हणमंत वनवे, सुरेश पाटील, बी. एम. पाटील, सतीश भोसले, युवराज पाटील, सुहास पाटील, गणेश गुरव, महेश शिंदे, मोहसीन पटेल, दादा डुबल, शंकर निकम उपस्थित होते.

प्रशांत यादव म्हणाले, ‘गोधन वाचविण्यासाठी व वाढविण्यासाठी बैलगाडी शर्यत सुरू होणे गरजेचे आहे. बैलगाडी शर्यत सुरू व्हावी यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिली आहेत. बैलगाडी शर्यतप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीच्या लढ्यात शेतकरी व बैलगाडी प्रेमींच्या सोबत राष्ट्रवादी पूर्ण ताकतीने उतरेल. ज्यावेळी बैलगाडी शर्यतीला मान्यता मिळेल. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील सर्वात पहिली बैलगाडी शर्यत ही सदाशिवगड विभागात आयोजित केली जाईल.’

रामदास पवार म्हणाले, ‘बैलगाडी शर्यत हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. खिलार गाय व बैल पैदास व उत्तम संगोपन होण्यासाठी बैलगाडी शर्यत सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बैलगाडी संघटनेला पाठिंबा दर्शविला आहे.