शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

जरंडेश्वरबाबत रस्त्यावर उतरुन ईडीला जिल्हाबाहेर काढू : शशिकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST

कोरेगाव : कोरेगावचा जरंडेश्वर हा जिल्ह्याची प्रमुख अर्थवाहिनी आहे. ५० हजार शेतकऱ्यांना न्याय देणारा, १५ लाख मेट्रिक टन ...

कोरेगाव : कोरेगावचा जरंडेश्वर हा जिल्ह्याची प्रमुख अर्थवाहिनी आहे. ५० हजार शेतकऱ्यांना न्याय देणारा, १५ लाख मेट्रिक टन गाळप करणारा, सातारा जिल्ह्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा, जिल्हा बँकेला ७ कोटींचा फायदा मिळवून देणारा, अनेकांचे संसार उभा करणारा हा कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडीला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल,’ असे आव्हान माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.

देऊर (ता. कोरेगाव) येथील मुधाई मंगल कार्यालयात जरंडेश्वर कारखाना ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, बिचुकले सरपंच प्रशांत पवार, माजी प्राचार्य गुलाबसिंग कदम, नीलेश जगदाळे, नरशिंग दिसले, शंकरराव कदम, रमेश कदम, सह्याद्री बँकेचे संचालक दिलीप कदम, गजानन मोरे, वैशाली सुतार, कविता देशमुख, राजेंद्र कदम, धनसिंग शिंदे, संदीप भोसले, नीलेश कदम उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, जरंडेश्वर कारखान्याबाबत ईडीने कारवाई सुरू केली आहे. खरंतर ईडीने कायदेशीर मार्गाने ही लढाई सुरू ठेवावी. यात जे काही समोर येईल ते येईल पण कोणत्याही परस्थितीत हा कारखाना बंद ठेवू नये, यासाठीच हे जनजागृती आंदोलन सुरु आहे. सध्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, गावागावात याबाबत मेळावे घेऊन त्यानंतर एक निवेदन ईडीला दिले जाईल. या निवेदनाबाबतीत सकारात्मक भूमिका दाखवली तर सहकार्य करू मात्र विरोध केला तर रस्त्यावर उतरून विरोध करु, ही भूमिका घ्यावी लागेल, असे आमदार शिंदे म्हणाले.

काहीही झालं तरी जरंडेश्वर चुकीच्या पध्दतीने बंद पडू देणार नाही, हा आमचा निर्धार आहे. हा कारखाना आजही सुरू आहे. तो सुरुच राहील पण जर कोणी याला टाळे ठोकण्यासाठी आलं तर ५० हजार शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल, अशी भूमिका आमदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

एक साखर कारखाना बंद राहिला तर किती मोठे नुकसान होत, याची जाणीव आहे. हा कारखाना ज्यांच्यामुळे बंद झाला, त्यानंतर या कारखान्यासाठी अनेक व्यवस्था याठिकाणी आल्या त्यांनाही या लोकांनी हाकलून दिले. आज ही मंडळी दिल्लीला जाऊन आली. त्यांनी हा कारखाना ईडीने चालवावा, अशी भूमिका मांडली किंवा सक्षम माणसाला चालवण्यासाठी द्या, अशी मागणी दिल्लीत एका नेत्यांना केली. खरंतर ज्यांच्यामुळे या कारखान्याचा लिलाव झाला, ती मंडळी आज कारखाना परत मिळवण्यासाठी धडपडत आहेत. काहींनी तर कारखाना परत ताब्यात आल्याचा आनंद साखर वाटून साजरा केला.

अडीच हजार गाळप क्षमता असलेला जरंडेश्वर आज जिल्ह्यात सर्वाधिक साडेबारा हजार गाळप प्रतिदिन करत आहे. चांगला दर देण्याबरोबरच जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांच्या ऊसाला समाधानकारक दर देत आहे. कामगारांना वेळेत पगार देत आहे, असं असताना चुकीच्या पध्दतीने हा कारखाना कोणी बंद पाडत असेल तर जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली जाईल.

प्रास्तविक शांताराम दोरके यांनी केले. प्रा. गुलाबसिंग कदम, सरपंच प्रशांत पवार, कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले.