शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जरंडेश्वरबाबत रस्त्यावर उतरुन ईडीला जिल्हाबाहेर काढू : शशिकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST

कोरेगाव : कोरेगावचा जरंडेश्वर हा जिल्ह्याची प्रमुख अर्थवाहिनी आहे. ५० हजार शेतकऱ्यांना न्याय देणारा, १५ लाख मेट्रिक टन ...

कोरेगाव : कोरेगावचा जरंडेश्वर हा जिल्ह्याची प्रमुख अर्थवाहिनी आहे. ५० हजार शेतकऱ्यांना न्याय देणारा, १५ लाख मेट्रिक टन गाळप करणारा, सातारा जिल्ह्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा, जिल्हा बँकेला ७ कोटींचा फायदा मिळवून देणारा, अनेकांचे संसार उभा करणारा हा कारखाना जर कुणाच्या राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कायदेशीर लढाई तर आम्ही लढूच पण अतिरेक झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून ईडीला जिल्हाबाहेर धाडण्याचे काम येथील शेतकरी करेल,’ असे आव्हान माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.

देऊर (ता. कोरेगाव) येथील मुधाई मंगल कार्यालयात जरंडेश्वर कारखाना ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, बिचुकले सरपंच प्रशांत पवार, माजी प्राचार्य गुलाबसिंग कदम, नीलेश जगदाळे, नरशिंग दिसले, शंकरराव कदम, रमेश कदम, सह्याद्री बँकेचे संचालक दिलीप कदम, गजानन मोरे, वैशाली सुतार, कविता देशमुख, राजेंद्र कदम, धनसिंग शिंदे, संदीप भोसले, नीलेश कदम उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, जरंडेश्वर कारखान्याबाबत ईडीने कारवाई सुरू केली आहे. खरंतर ईडीने कायदेशीर मार्गाने ही लढाई सुरू ठेवावी. यात जे काही समोर येईल ते येईल पण कोणत्याही परस्थितीत हा कारखाना बंद ठेवू नये, यासाठीच हे जनजागृती आंदोलन सुरु आहे. सध्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, गावागावात याबाबत मेळावे घेऊन त्यानंतर एक निवेदन ईडीला दिले जाईल. या निवेदनाबाबतीत सकारात्मक भूमिका दाखवली तर सहकार्य करू मात्र विरोध केला तर रस्त्यावर उतरून विरोध करु, ही भूमिका घ्यावी लागेल, असे आमदार शिंदे म्हणाले.

काहीही झालं तरी जरंडेश्वर चुकीच्या पध्दतीने बंद पडू देणार नाही, हा आमचा निर्धार आहे. हा कारखाना आजही सुरू आहे. तो सुरुच राहील पण जर कोणी याला टाळे ठोकण्यासाठी आलं तर ५० हजार शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल, अशी भूमिका आमदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

एक साखर कारखाना बंद राहिला तर किती मोठे नुकसान होत, याची जाणीव आहे. हा कारखाना ज्यांच्यामुळे बंद झाला, त्यानंतर या कारखान्यासाठी अनेक व्यवस्था याठिकाणी आल्या त्यांनाही या लोकांनी हाकलून दिले. आज ही मंडळी दिल्लीला जाऊन आली. त्यांनी हा कारखाना ईडीने चालवावा, अशी भूमिका मांडली किंवा सक्षम माणसाला चालवण्यासाठी द्या, अशी मागणी दिल्लीत एका नेत्यांना केली. खरंतर ज्यांच्यामुळे या कारखान्याचा लिलाव झाला, ती मंडळी आज कारखाना परत मिळवण्यासाठी धडपडत आहेत. काहींनी तर कारखाना परत ताब्यात आल्याचा आनंद साखर वाटून साजरा केला.

अडीच हजार गाळप क्षमता असलेला जरंडेश्वर आज जिल्ह्यात सर्वाधिक साडेबारा हजार गाळप प्रतिदिन करत आहे. चांगला दर देण्याबरोबरच जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांच्या ऊसाला समाधानकारक दर देत आहे. कामगारांना वेळेत पगार देत आहे, असं असताना चुकीच्या पध्दतीने हा कारखाना कोणी बंद पाडत असेल तर जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली जाईल.

प्रास्तविक शांताराम दोरके यांनी केले. प्रा. गुलाबसिंग कदम, सरपंच प्रशांत पवार, कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले.