शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

महामार्ग सुरक्षित करून घेऊ

By admin | Updated: November 21, 2014 00:28 IST

पृथ्वीराज चव्हाण : कच्छी कुटुंबीयांचे केले सांत्वन

लोणंद : खंडाळ्यानजीक कंटेनर उलटून रविवारी झालेल्या अपघातात लोणंद येथील एकाच कुटुंबातील चार जणींचा व सुखेड येथील दोन जणांचा मृत्यू झाला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मृतांच्या नातेवाइकांची गुरुवारी भेट घेऊन सांत्वन केले. महामार्गावर होणाऱ्या अपघातांबद्दल तातडीने उपाययोजना करायला लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.रविवारी कंटेनर उलटून खंडाळ्यानजीक झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले होते. यात लोणंद येथील एकाच कुटुंबातील साकिना कच्छी, शबाना कच्छी, हवाबी कच्छी, सलमा कच्छी या चौघींचा तर सुखेड येथील नेहा वाघमारे व प्रमोद वाघमारे या बहीण-भावाचा दुर्दैवी अंत झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. ते म्हणाले, ‘महामार्गावर एसटी बसेस थांबविणे पूर्णपणे चुकीचे असून, त्यामुळे जर अपघात होत असतील तर हा प्रश्न गंभीर आहे. महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व रिलायन्स कंपनीची लवकरच बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्यात येईल. राज्यात सर्वच महामार्गांवर होणाऱ्या अपघातांबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.’‘खंडाळा व शिरवळ गावांलगत महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांना रिलायन्स कंपनी जबाबदार असून, त्यांच्या चुकीच्या कामामुळे व आडमुठ्या धोरणामुळेच अनेकांचे प्राण गेले आहेत. याबाबतही उपाययोजना करणे गरजेचे आहे,’ असे मत तालुक्यातील नागरिक व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजित निंबाळकर, राहुल घाडगे, गुरुदेव बरदाडे, बापुराव धायगुडे, धनाजी अहिरेकर, गनीभाई कच्छी, महंमद कच्छी, लक्ष्मण शेळके, राजूशेठ डोईफोडे, संजय जाधव, अ‍ॅड. बबलू मणेर, तुकाराम क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)