शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

महामार्ग सुरक्षित करून घेऊ

By admin | Updated: November 21, 2014 00:28 IST

पृथ्वीराज चव्हाण : कच्छी कुटुंबीयांचे केले सांत्वन

लोणंद : खंडाळ्यानजीक कंटेनर उलटून रविवारी झालेल्या अपघातात लोणंद येथील एकाच कुटुंबातील चार जणींचा व सुखेड येथील दोन जणांचा मृत्यू झाला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मृतांच्या नातेवाइकांची गुरुवारी भेट घेऊन सांत्वन केले. महामार्गावर होणाऱ्या अपघातांबद्दल तातडीने उपाययोजना करायला लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.रविवारी कंटेनर उलटून खंडाळ्यानजीक झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले होते. यात लोणंद येथील एकाच कुटुंबातील साकिना कच्छी, शबाना कच्छी, हवाबी कच्छी, सलमा कच्छी या चौघींचा तर सुखेड येथील नेहा वाघमारे व प्रमोद वाघमारे या बहीण-भावाचा दुर्दैवी अंत झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. ते म्हणाले, ‘महामार्गावर एसटी बसेस थांबविणे पूर्णपणे चुकीचे असून, त्यामुळे जर अपघात होत असतील तर हा प्रश्न गंभीर आहे. महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व रिलायन्स कंपनीची लवकरच बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्यात येईल. राज्यात सर्वच महामार्गांवर होणाऱ्या अपघातांबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.’‘खंडाळा व शिरवळ गावांलगत महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांना रिलायन्स कंपनी जबाबदार असून, त्यांच्या चुकीच्या कामामुळे व आडमुठ्या धोरणामुळेच अनेकांचे प्राण गेले आहेत. याबाबतही उपाययोजना करणे गरजेचे आहे,’ असे मत तालुक्यातील नागरिक व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजित निंबाळकर, राहुल घाडगे, गुरुदेव बरदाडे, बापुराव धायगुडे, धनाजी अहिरेकर, गनीभाई कच्छी, महंमद कच्छी, लक्ष्मण शेळके, राजूशेठ डोईफोडे, संजय जाधव, अ‍ॅड. बबलू मणेर, तुकाराम क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)