शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

एकमेकांना सावरू... लक्ष गाठू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:42 IST

हिंदू संस्कृतीत सण, उत्सवांना मानाचे स्थान आहे. प्रत्येक उत्सवाला परंपरा अन् इतिहासाची किनार लाभली आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी ...

हिंदू संस्कृतीत सण, उत्सवांना मानाचे स्थान आहे. प्रत्येक उत्सवाला परंपरा अन् इतिहासाची किनार लाभली आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी दहीहंडीदेखील एक महत्त्वाचा उत्सव. आपण आजवर या उत्सवाकडे केवळ एक जल्लोष म्हणून पाहात आलो आहोत, पण हा उत्सव आपल्याला जगण्याचा अर्थही सांगून जातो. तरुण एकमेकांना सावरत मानवी मनोरा उभा करतात. आपल्याला काहीही करून आपलं लक्ष गाठायचंय, असा धीर देतात अन् गोविंदा दहीहंडी फोडून आपलं लक्ष गाठतो. खरंतर दहीहंडी हा उत्सव आनंद देऊन जाणारा असला, तरी एकमेकांचा हात धरणं, सावरणं म्हणजेच ‘दहीहंडी’ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

बालगोपाळ श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे, यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे; पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.

दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजोशीर असते. यादिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे आदी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याला फोडण्याचा विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळांतील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून दहीहंडीचा उत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे तरुणाईत थोडा निरुत्साह आहे. मात्र, दहीहंडीच्या मनोऱ्याप्रमाणे जो-तो एकमेकांना सावरत, आधार देत कोरोना संकटाची ‘हंडी’ फोडण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्नही गंभीर बनला. अशा संकटकाळात जो-ता एकमेकांच्या मदतीसाठी धावून आला. एकमेकांच्या हातात हात देत ‘दहीहंडी’प्रमाणे माणुसकीचा मनोरा उभा राहिला. या मनोऱ्याने कधी अडखळत, तर कधी स्वत:ला सावरत अनेक कुटुंबांना जगण्याचे बळ दिले. आज एकमेकांचा हात धरणं, सावरणं म्हणजेच ‘दहीहंडी’ ही नवी संकल्पना आता रुजू लागली आहे.