शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी खेड्याकडे चलो रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

ग्रामीण भागात प्रवेश नाममात्र : खासगी शिकवणी वर्गात नियमित हजेरी लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दहावीच्या निकालानंतर आता प्रवेश ...

ग्रामीण भागात प्रवेश नाममात्र : खासगी शिकवणी वर्गात नियमित हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दहावीच्या निकालानंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदाही ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे कल वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये हजेरी लावण्याची सक्ती नसल्याने येथे नाममात्र प्रवेश घेऊन खासगी शिकवणी वर्गात नियमित हजेरी लावणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

कोरोना महामारीमुळे गतवर्षीसारखं हेही वर्ष ऑनलाईन शिक्षणात जाणार असेल तर मोठ्या शहरांमध्ये महागड्या फी भरून प्रवेश घेणं पालक टाळत आहेत. त्याऐवजी खासगी क्लास लावून महाविद्यालयात न जाता अभ्यास करण्याचा पर्यायी मार्ग पालकांनी शोधला आहे. महाविद्यालय आणि खासगी क्लास या दोन्हींची भरमसाठ फी भरण्यापेक्षा ग्रामीण भागातील महाविद्यालये खर्चाच्या पातळीवरही पालकांना परवडणारे आहे.

ग्रामीण भागातील बहुतांश महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असायची. यंदा मात्र शहराएवढंच महत्त्व ग्रामीण भागातील महाविद्यालयांना आल्याने तेथेही प्रवेशासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरांच्या तुलनेत गावाकडील महाविद्यालयांची फी कमी आणि पालकांना परवडेल, अशीच आकारली जाते. त्यामुळे खेड्याकडे चला, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

चौकट :

गावात प्रवेश का?

कॉलेजमध्ये न जाता केवळ परीक्षांपुरते जाता यावे, हे ग्रामीण भागात प्रवेश घेण्याचे मुख्य कारण आहे. तेथे उपस्थितीची अट नसल्याने आणि परीक्षेच्या वेळीही महाविद्यालयांकडून विशेष सवलत देण्याची खात्री दिली जाते. ग्रामीण भागात प्रवेश घेऊन शहरात क्लासेस करण्यासाठी विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळताना दिसतात. त्यामुळे अकरावी, बारावीच्या वर्गातील उपस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पॉईंटर

एकूण विद्यार्थी : ३३,२८७

बारावी महाविद्यालय संख्या : ६३५

मुले : १७,८७०

मुली : १५,४१७

ऑफलाईन प्रवेश व्हावेत

यावर्षी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया असली तरीही सीईटी देणाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यायचे आहे. त्यामुळे सध्या केवळ नोंदणी सुरू केली आहे. शिक्षण उपसंचालकांनी अकरावी सीईटीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश निश्चिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. सीईटीनंतर मेरिट लिस्ट लावून प्रवेश निश्चित करता येईल.

- प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवाळ

अद्याप शासनाच्या स्पष्ट सूचना नाहीत. अकरावी सीईटीनंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश ऑफलाईन असले तरीही ग्रामीणकडे ओढा दिसतेय. सीईटी सक्तीची आवश्यक करणे योग्य ठरले असते. विद्यार्थ्यांकडून विचारपूस सुरू आहे. प्रवेश समिती त्यांची नावे नोंदवून पुढील सूचना देत आहे.

- प्राचार्य डॉ. उत्तमराव पवार

कोट :

गावातल्या शाळेतच अकरावी, बारावीचे वर्ग आहेत. इथेही नियमित वर्ग भरतात, त्यामुळे गावातच प्रवेश घेतला आहे. शहरात राहून शिकण्यावर खूप खर्च होणार. तो करणे पालकांना शक्य होणार नाही. सोबतच्या मैत्रिणीही गावातच प्रवेश घेणार आहेत.

- साक्षी इनामदार, कोडोली

गावाशेजारी महाविद्यालय आहे. तिथे अकरावीला प्रवेश घेऊन मोठ्या शहरात कोचिंग क्लासेस करणार आहे. त्यामुळे अकरावी सीईटीत वेळ घालवणार, नीट परीक्षेची तयारीही करायची आहे. परीक्षेवेळी गावाकडे जाऊन परीक्षा देईन. शहरात रूम घेऊन अभ्यासाला सुरुवात केली आहे.

- प्रणव सावंत, गुरुवार पेठ