शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी खेड्याकडे चलो रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

ग्रामीण भागात प्रवेश नाममात्र : खासगी शिकवणी वर्गात नियमित हजेरी लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दहावीच्या निकालानंतर आता प्रवेश ...

ग्रामीण भागात प्रवेश नाममात्र : खासगी शिकवणी वर्गात नियमित हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दहावीच्या निकालानंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदाही ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे कल वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये हजेरी लावण्याची सक्ती नसल्याने येथे नाममात्र प्रवेश घेऊन खासगी शिकवणी वर्गात नियमित हजेरी लावणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

कोरोना महामारीमुळे गतवर्षीसारखं हेही वर्ष ऑनलाईन शिक्षणात जाणार असेल तर मोठ्या शहरांमध्ये महागड्या फी भरून प्रवेश घेणं पालक टाळत आहेत. त्याऐवजी खासगी क्लास लावून महाविद्यालयात न जाता अभ्यास करण्याचा पर्यायी मार्ग पालकांनी शोधला आहे. महाविद्यालय आणि खासगी क्लास या दोन्हींची भरमसाठ फी भरण्यापेक्षा ग्रामीण भागातील महाविद्यालये खर्चाच्या पातळीवरही पालकांना परवडणारे आहे.

ग्रामीण भागातील बहुतांश महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असायची. यंदा मात्र शहराएवढंच महत्त्व ग्रामीण भागातील महाविद्यालयांना आल्याने तेथेही प्रवेशासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरांच्या तुलनेत गावाकडील महाविद्यालयांची फी कमी आणि पालकांना परवडेल, अशीच आकारली जाते. त्यामुळे खेड्याकडे चला, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

चौकट :

गावात प्रवेश का?

कॉलेजमध्ये न जाता केवळ परीक्षांपुरते जाता यावे, हे ग्रामीण भागात प्रवेश घेण्याचे मुख्य कारण आहे. तेथे उपस्थितीची अट नसल्याने आणि परीक्षेच्या वेळीही महाविद्यालयांकडून विशेष सवलत देण्याची खात्री दिली जाते. ग्रामीण भागात प्रवेश घेऊन शहरात क्लासेस करण्यासाठी विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळताना दिसतात. त्यामुळे अकरावी, बारावीच्या वर्गातील उपस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पॉईंटर

एकूण विद्यार्थी : ३३,२८७

बारावी महाविद्यालय संख्या : ६३५

मुले : १७,८७०

मुली : १५,४१७

ऑफलाईन प्रवेश व्हावेत

यावर्षी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया असली तरीही सीईटी देणाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यायचे आहे. त्यामुळे सध्या केवळ नोंदणी सुरू केली आहे. शिक्षण उपसंचालकांनी अकरावी सीईटीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश निश्चिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. सीईटीनंतर मेरिट लिस्ट लावून प्रवेश निश्चित करता येईल.

- प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवाळ

अद्याप शासनाच्या स्पष्ट सूचना नाहीत. अकरावी सीईटीनंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश ऑफलाईन असले तरीही ग्रामीणकडे ओढा दिसतेय. सीईटी सक्तीची आवश्यक करणे योग्य ठरले असते. विद्यार्थ्यांकडून विचारपूस सुरू आहे. प्रवेश समिती त्यांची नावे नोंदवून पुढील सूचना देत आहे.

- प्राचार्य डॉ. उत्तमराव पवार

कोट :

गावातल्या शाळेतच अकरावी, बारावीचे वर्ग आहेत. इथेही नियमित वर्ग भरतात, त्यामुळे गावातच प्रवेश घेतला आहे. शहरात राहून शिकण्यावर खूप खर्च होणार. तो करणे पालकांना शक्य होणार नाही. सोबतच्या मैत्रिणीही गावातच प्रवेश घेणार आहेत.

- साक्षी इनामदार, कोडोली

गावाशेजारी महाविद्यालय आहे. तिथे अकरावीला प्रवेश घेऊन मोठ्या शहरात कोचिंग क्लासेस करणार आहे. त्यामुळे अकरावी सीईटीत वेळ घालवणार, नीट परीक्षेची तयारीही करायची आहे. परीक्षेवेळी गावाकडे जाऊन परीक्षा देईन. शहरात रूम घेऊन अभ्यासाला सुरुवात केली आहे.

- प्रणव सावंत, गुरुवार पेठ