शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

अकरावीसाठी खेड्याकडे चलो रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

ग्रामीण भागात प्रवेश नाममात्र : खासगी शिकवणी वर्गात नियमित हजेरी लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दहावीच्या निकालानंतर आता प्रवेश ...

ग्रामीण भागात प्रवेश नाममात्र : खासगी शिकवणी वर्गात नियमित हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दहावीच्या निकालानंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदाही ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे कल वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये हजेरी लावण्याची सक्ती नसल्याने येथे नाममात्र प्रवेश घेऊन खासगी शिकवणी वर्गात नियमित हजेरी लावणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

कोरोना महामारीमुळे गतवर्षीसारखं हेही वर्ष ऑनलाईन शिक्षणात जाणार असेल तर मोठ्या शहरांमध्ये महागड्या फी भरून प्रवेश घेणं पालक टाळत आहेत. त्याऐवजी खासगी क्लास लावून महाविद्यालयात न जाता अभ्यास करण्याचा पर्यायी मार्ग पालकांनी शोधला आहे. महाविद्यालय आणि खासगी क्लास या दोन्हींची भरमसाठ फी भरण्यापेक्षा ग्रामीण भागातील महाविद्यालये खर्चाच्या पातळीवरही पालकांना परवडणारे आहे.

ग्रामीण भागातील बहुतांश महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असायची. यंदा मात्र शहराएवढंच महत्त्व ग्रामीण भागातील महाविद्यालयांना आल्याने तेथेही प्रवेशासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरांच्या तुलनेत गावाकडील महाविद्यालयांची फी कमी आणि पालकांना परवडेल, अशीच आकारली जाते. त्यामुळे खेड्याकडे चला, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

चौकट :

गावात प्रवेश का?

कॉलेजमध्ये न जाता केवळ परीक्षांपुरते जाता यावे, हे ग्रामीण भागात प्रवेश घेण्याचे मुख्य कारण आहे. तेथे उपस्थितीची अट नसल्याने आणि परीक्षेच्या वेळीही महाविद्यालयांकडून विशेष सवलत देण्याची खात्री दिली जाते. ग्रामीण भागात प्रवेश घेऊन शहरात क्लासेस करण्यासाठी विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळताना दिसतात. त्यामुळे अकरावी, बारावीच्या वर्गातील उपस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पॉईंटर

एकूण विद्यार्थी : ३३,२८७

बारावी महाविद्यालय संख्या : ६३५

मुले : १७,८७०

मुली : १५,४१७

ऑफलाईन प्रवेश व्हावेत

यावर्षी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया असली तरीही सीईटी देणाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यायचे आहे. त्यामुळे सध्या केवळ नोंदणी सुरू केली आहे. शिक्षण उपसंचालकांनी अकरावी सीईटीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश निश्चिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. सीईटीनंतर मेरिट लिस्ट लावून प्रवेश निश्चित करता येईल.

- प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवाळ

अद्याप शासनाच्या स्पष्ट सूचना नाहीत. अकरावी सीईटीनंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश ऑफलाईन असले तरीही ग्रामीणकडे ओढा दिसतेय. सीईटी सक्तीची आवश्यक करणे योग्य ठरले असते. विद्यार्थ्यांकडून विचारपूस सुरू आहे. प्रवेश समिती त्यांची नावे नोंदवून पुढील सूचना देत आहे.

- प्राचार्य डॉ. उत्तमराव पवार

कोट :

गावातल्या शाळेतच अकरावी, बारावीचे वर्ग आहेत. इथेही नियमित वर्ग भरतात, त्यामुळे गावातच प्रवेश घेतला आहे. शहरात राहून शिकण्यावर खूप खर्च होणार. तो करणे पालकांना शक्य होणार नाही. सोबतच्या मैत्रिणीही गावातच प्रवेश घेणार आहेत.

- साक्षी इनामदार, कोडोली

गावाशेजारी महाविद्यालय आहे. तिथे अकरावीला प्रवेश घेऊन मोठ्या शहरात कोचिंग क्लासेस करणार आहे. त्यामुळे अकरावी सीईटीत वेळ घालवणार, नीट परीक्षेची तयारीही करायची आहे. परीक्षेवेळी गावाकडे जाऊन परीक्षा देईन. शहरात रूम घेऊन अभ्यासाला सुरुवात केली आहे.

- प्रणव सावंत, गुरुवार पेठ