शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

एप्रिल ‘फूल’ऐवजी एप्रिल ‘कूल’ करू या-सोशल मीडियाच्या माध्यमातून वृक्षलागवडीबाबत प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:40 IST

 सातारा : एकीकडे वाढते तापमान अन् दुसरीकडे दिवसरात्र भडकणाऱ्या वणव्यामुळे डोंगर ओसाड पडू लागले आहे. या वणव्यात हजारो वृक्ष खाक होत असून, पशुपक्ष्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता नेटिझन्सनी पुढाकार घेतला आहे. ‘तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावू या ...

ठळक मुद्देनेटिझन्सची हाक

 सातारा : एकीकडे वाढते तापमान अन् दुसरीकडे दिवसरात्र भडकणाऱ्या वणव्यामुळे डोंगर ओसाड पडू लागले आहे. या वणव्यात हजारो वृक्ष खाक होत असून, पशुपक्ष्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता नेटिझन्सनी पुढाकार घेतला आहे. ‘तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावू या आणि पुढील वर्षापासून ‘एप्रिल फूल’ऐवजी ‘एप्रिल कूल करू या,’ अशी आर्त हाक सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जात आहे.

सध्या सोशल मीडिया हे केवळ संवादाचेच नव्हे तर जनजागृतीचेही प्रभावी माध्यम बनू पाहत आहे. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असो की आर्थिक मदत असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून जो तो आपापल्या परीने मदतीसाठी धावून येतो. वाढत्या उष्म्याचा जसा माणसांवर परिणाम होतो तसाच परिणाम पशुपक्ष्यांवरही होतो. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्याने पशुपक्षी कासावीस होतात. त्यामुळे पक्ष्यांसाठी पाणवठे तयारकरण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले.परिणामी अनेकांकडून रस्त्याच्या कडेला, झाडांवर, डोंगरांवर पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था केलीगेली.

सध्या तापमानवाढ ही समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बेसुमार जंगलतोड आणिवणव्यामुळे हजारो झाडे जळून खाक होत आहे. ही बाब तापमानवाढीला कारणीभूत ठरत आहे. वाढतेतापमान रोखण्यासाठी आता पुन्हा एकदा नेटिझन्सनी पुढाकार घेतला आहे. तापमानवाढ रोखण्यासाठीवृक्ष लागवड व संवर्धनाबाबतसोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीपर आवाहन केले जात आहे.एप्रिल महिन्यात एकमेकांचा एप्रिल फूल करण्याऐवजी प्रत्येकाने एक झाड लावू या आणि पुढील वर्षी एप्रिल फूलऐवजी एप्रिल कूल करू या, अशी आर्त हाक नेटिझन्सकडून दिली जात आहे. विशेष बाब म्हणजे सातारकरांनी या हाकेला प्रतिसाद देत वृक्ष लागवडीसाठी पुढाकारही घेतला आहे. 

तापमान वाढ आणि वृक्षतोड हे दोन्ही विषय पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे महत्त्व ओळखून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये तापमानवाढ रोखण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. आज खरंच एप्रिल फूलऐवजी एप्रिल कूल करण्याची सर्वाधिक गरज आहे.- सागर भगत, चिमणगाव