शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

एप्रिल ‘फूल’ऐवजी एप्रिल ‘कूल’ करू या-सोशल मीडियाच्या माध्यमातून वृक्षलागवडीबाबत प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:40 IST

 सातारा : एकीकडे वाढते तापमान अन् दुसरीकडे दिवसरात्र भडकणाऱ्या वणव्यामुळे डोंगर ओसाड पडू लागले आहे. या वणव्यात हजारो वृक्ष खाक होत असून, पशुपक्ष्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता नेटिझन्सनी पुढाकार घेतला आहे. ‘तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावू या ...

ठळक मुद्देनेटिझन्सची हाक

 सातारा : एकीकडे वाढते तापमान अन् दुसरीकडे दिवसरात्र भडकणाऱ्या वणव्यामुळे डोंगर ओसाड पडू लागले आहे. या वणव्यात हजारो वृक्ष खाक होत असून, पशुपक्ष्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता नेटिझन्सनी पुढाकार घेतला आहे. ‘तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावू या आणि पुढील वर्षापासून ‘एप्रिल फूल’ऐवजी ‘एप्रिल कूल करू या,’ अशी आर्त हाक सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जात आहे.

सध्या सोशल मीडिया हे केवळ संवादाचेच नव्हे तर जनजागृतीचेही प्रभावी माध्यम बनू पाहत आहे. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असो की आर्थिक मदत असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून जो तो आपापल्या परीने मदतीसाठी धावून येतो. वाढत्या उष्म्याचा जसा माणसांवर परिणाम होतो तसाच परिणाम पशुपक्ष्यांवरही होतो. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्याने पशुपक्षी कासावीस होतात. त्यामुळे पक्ष्यांसाठी पाणवठे तयारकरण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले.परिणामी अनेकांकडून रस्त्याच्या कडेला, झाडांवर, डोंगरांवर पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था केलीगेली.

सध्या तापमानवाढ ही समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बेसुमार जंगलतोड आणिवणव्यामुळे हजारो झाडे जळून खाक होत आहे. ही बाब तापमानवाढीला कारणीभूत ठरत आहे. वाढतेतापमान रोखण्यासाठी आता पुन्हा एकदा नेटिझन्सनी पुढाकार घेतला आहे. तापमानवाढ रोखण्यासाठीवृक्ष लागवड व संवर्धनाबाबतसोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीपर आवाहन केले जात आहे.एप्रिल महिन्यात एकमेकांचा एप्रिल फूल करण्याऐवजी प्रत्येकाने एक झाड लावू या आणि पुढील वर्षी एप्रिल फूलऐवजी एप्रिल कूल करू या, अशी आर्त हाक नेटिझन्सकडून दिली जात आहे. विशेष बाब म्हणजे सातारकरांनी या हाकेला प्रतिसाद देत वृक्ष लागवडीसाठी पुढाकारही घेतला आहे. 

तापमान वाढ आणि वृक्षतोड हे दोन्ही विषय पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे महत्त्व ओळखून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये तापमानवाढ रोखण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. आज खरंच एप्रिल फूलऐवजी एप्रिल कूल करण्याची सर्वाधिक गरज आहे.- सागर भगत, चिमणगाव