शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याआधी सावध राहू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर ...

सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर याचा फार मोठा ताण येऊ शकतो. ब्राझीलमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली, तशी परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते. हे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने निर्बंध पाळणे आवश्यक आहे. परिस्थिती सुधारल्यास हे निर्बंध निश्चितपणे उठतील; मात्र तोपर्यंत काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले, भविष्याच्या काळात कदाचित काही स्ट्रेस येण्याची शक्यता आहे. संपूर्ण सिस्टमवर, सप्लाय चेनवर ताण पडतो. ऑक्सिजन आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास पुरेसा आहे. संसर्ग वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मी स्वतः संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून आहे. औषध प्रशासन विभागाच्या साहाय्यक आयुक्तांना औषधसाठा पुरेसा आहे की नाही याबाबतची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा रोजचा अहवाल मी तपासत आहे.

निर्बंध लादले गेले असल्याने व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक यांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे, याबाबत मला जाणीव आहे. तरीसुद्धा कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी काळजी म्हणून ही उपाययोजना केलेली आहे. यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य राहील, अशी मला अपेक्षा आहे.

जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामध्ये राज्य शासन ३० एप्रिलपूर्वीसुद्धा शिथिलता देऊ शकते. मात्र याबाबत मी आत्ताच काही सांगू शकणार नाही. निर्बंध कधी उठवायचे हे खरेतर लोकांच्याच हातात आहे. लोकांनी जर नियमांचे पालन केले, पॉझिटिव्ह केसेसचे प्रमाण कमी राहिले तर राज्य शासन त्याबाबतचा निर्णय घेऊ शकते, असेदेखील जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.