शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

माझा कुणा म्हणू मी... नेतेच पडले पेचात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:51 IST

दीपक शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बरं का.. हा माझा खंदा कार्यकर्ता... हा माझा माणूस... यांना निवडून ...

दीपक शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : बरं का.. हा माझा खंदा कार्यकर्ता... हा माझा माणूस... यांना निवडून द्या शहराचा विकास करू... जिल्ह्याचा विकास करू. सर्वसामान्य माणसाला सत्ता मिळाली पाहिजे, यासाठी स्थानिक निवडणुकीत प्रत्येक गावागावात आणि गल्ली बोळात जाऊन विनवणी करणाऱ्या नेत्यांसाठी आता हाताच्या बोटावर मोजण्या येण्याएवढेच कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहेत. त्यामुळे नेत्यांच्या प्रचारात अजून रंगच भरत नाही.नेता आणि कार्यकर्ते यांच्यातील वाढलेली दरी निवडणुकीच्या माध्यमातून तरी कमी होईल, अशी असलेली अपेक्षाही फोल ठरली आहे. ज्यांच्यासाठी सकाळी...संध्याकाळी व गरज लागली तर रात्रीही जे नेत्यासाठी फिरले ते कार्यकर्ते आता कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे माझा कुणा म्हणू मी, अशी अवस्था आघाडी आणि युतीच्या उमेदवारांची झाली आहे.नेते आणि कार्यकर्ते हे निवडणुकीच्या काळातील अजोड गणित. या गणिताची बेरीज करत पुढे जावे लागते. ज्याची बेरीज आणि गुणाकार चांगला होतो त्याच्या गणिताचे उत्तर मोठे येते; पण जुळणी करून दिलेल्या गणितात वजाबाकी झाली की सगळं गणित फिस्कटतं. यालाच बेरजेचे आणि वजाबाकीचे राजकारण म्हटले जाते. स्थानिक निवडणुकांमध्ये नेत्याने आपल्यासाठी प्रचार करावा, ही कार्यकर्त्याची अपेक्षा असते. त्याप्रमाणे नेते दिवस-रात्र पायाला भिंगरी बांधून फिरतात. ज्यावेळी नेते येत नाहीत, त्यावेळी कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो. आता नेत्यांची बारी आहे. त्यामुळे कार्यकर्ते हटून बसले आहेत; पण तुमचीपण वेळ येणार, हे त्यांना कोण सांगणार.नगरपालिकेत निवडून यावे म्हणून ज्यांच्यासाठी उदयनराजे सकाळी... संध्याकाळी आणि गरज लागली तर रात्रीही फिरले ते आता कुठेच दिसत नाहीत. राजे तुमच्यासाठी काय पण... अशी डरकाळी फोडून मीच तुमचा सच्चा कार्यकर्ता, असा आव आणणारे बरेचजण आता गायब झाले आहेत. ‘तुम्ही काळजी करू नका, मी तुमचा प्रचार करणार,’ असे ठोस आश्वासन देण्यास कार्यकर्ते मागे राहिले नसले तरी प्रचारात मात्र पुढे कुठेच दिसत नाहीत. आता केवळ दहा ते बारा दिवस उरले आहेत. या बारा दिवसांत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन नेत्यांचा प्रचार करावा लागणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रचारात उतरण्यास सांगितले असले तरी एखादा-दुसरा आमदार वगळता कोणीही मनापासून काम करताना दिसत नाही. केवळ सभांमध्ये दिसणारे नेते दिसण्यासाठी आहेत. कामासाठी अजून कोणीही आपल्या स्थानिक पातळीवरील, गावागावातील कार्यकर्त्यांना आदेश आणि संदेश दिलेले नाहीत. त्यामुळे काही केल्या प्रचार यंत्रणा गतिमान होताना दिसत नाही.शिवसेनेने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली. यापूर्वी ते राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये होते. त्यामुळे त्यांना आपले कोणीच म्हणायला तयार नाही. भाजपचे नेते ते आता शिवसेनेचे उमेदवार असल्याचे म्हणतात तर शिवसेनावाले मूळचा भाजपचा उमेदवार असल्याने परकेपणाची जाणीव करून देतात. रिपाइंने तर प्रचाराची वेगळीच चूल मांडली आहे. त्यामुळे भाजपच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी नगरसेवकांच्या गल्लोगल्ली जाऊन बैठका घेऊन काम करण्याचे आवाहन केले; पण त्यांनी तेवढे मनावर घेतलेले नाही. नगरसेवकांना अजूनही रसद पुरवठा होत नसल्याने ते हतबल आहेत. आमचा प्रचार सुरू आहे. काळजी नको, असे आश्वासन त्यांचेही नेत्यांना आहे; पण प्रत्यक्षात ते प्रचारात कितपत सहभागी होत आहेत, हे त्यांचे त्यांनाच माहिती.उमेदवारी माघारी घेण्याची वेळ निघून गेली. आता सातारा लोकसभा मतदार संघात ९ उमेदवार रिंगणात आहेत. या नऊ उमेदवारांना पुढील १२ दिवसांत जिल्ह्याच्या कानाकोपºयात पोहोचायचे आहे. त्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून या उमेदवारांचा प्रचार सुरू होणार आहे. मग, पहाटेपासूनच तयारी. सकाळी कोणत्या गावात, नाष्टा आणि चहा कोणाकडे, दुपारी कोणत्या गावात आणि विश्रांती कोठे, संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचे नियोजन काय आणि रात्रीची सभा कुठे? या सर्व नियोजनाला कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ लागणार आहे. त्याशिवाय प्रचाराला रंगत येणार नाही. त्यातच अपक्ष असणारे उमेदवारही आपल्यापरीने गावागावांमध्ये जाऊन आपल्याला मतदान करण्यासाठी विनवणी करत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत उमेदवारांची होणारी धावपळ आणि कार्यकर्त्यांची पळापळ पाहायला मिळणे गरजेचे आहे.निवडणुका येतील आणि जातीलही; पण ज्यांनी आपल्यासाठी काही केले आणि जे करणार आहेत, त्यांचा विचार करून पक्षवाढीसाठी आणि स्वत:च्या राजकीय फायदासाठी काम होणे अपेक्षित आहे. मग ते नेत्याचे असो किंवा पक्षाचे. पण सातारा मतदार संघात सध्या वेगळेच वातावरण दिसते. एकमेकांची जिरवण्याच्या उद्देशानेच या निवडणुकीतील प्रचार पाहायला मिळतो. त्यामुळे पुढील काळात आणि यापूर्वीही दुखावलेली मने निवडणुकीच्या माध्यमातून सांधली जाण्याची आवश्यकता आहे.नगरसेवक आहे तरी कुठे...?सातारा शहरात काही नगरसेवक सध्या नजरेसच पडत नाहीत. निवडणूक झाल्यानंतर सुटीवर जाणारे अनेकजण आता ऐन निवडणुकीच्या काळातच बाहेरगावी गेल्याचे निरोप मिळत आहेत. तातडीच्या कामासाठी बाहेरगावी गेल्याचा निरोप ठेवून नगरसेवक शहराबाहेर असल्याचे अनेकजण सांगतात. निवडणूक आहे म्हणून शहरातील समस्या संपलेल्या नाहीत. तरी देखील निवडणुकीत काहीच काम नसल्याने त्यांनी टूर केली आहे.दारात एक; घरात एक प्रचारनिवडणुकीत एकमेकांची उणी-दुणी काढल्यामुळे आता प्रभागात एकत्र फिरण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे प्रत्येकजण मी स्वतंत्रपणे प्रचार करणार, असे सांगत आहे. कधीतरी कुठेतरी जास्त ऊन नाही, याचा अंदाज घेऊन एखादा कार्यकर्ता पत्रक वाटताना दिसतो; पण दारात एक आणि घरात एक जाऊन दुसरेच सांगत असल्यामुळे मतदारही गोंधळात पडले आहेत.