शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

माझा कुणा म्हणू मी... नेतेच पडले पेचात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:51 IST

दीपक शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बरं का.. हा माझा खंदा कार्यकर्ता... हा माझा माणूस... यांना निवडून ...

दीपक शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : बरं का.. हा माझा खंदा कार्यकर्ता... हा माझा माणूस... यांना निवडून द्या शहराचा विकास करू... जिल्ह्याचा विकास करू. सर्वसामान्य माणसाला सत्ता मिळाली पाहिजे, यासाठी स्थानिक निवडणुकीत प्रत्येक गावागावात आणि गल्ली बोळात जाऊन विनवणी करणाऱ्या नेत्यांसाठी आता हाताच्या बोटावर मोजण्या येण्याएवढेच कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहेत. त्यामुळे नेत्यांच्या प्रचारात अजून रंगच भरत नाही.नेता आणि कार्यकर्ते यांच्यातील वाढलेली दरी निवडणुकीच्या माध्यमातून तरी कमी होईल, अशी असलेली अपेक्षाही फोल ठरली आहे. ज्यांच्यासाठी सकाळी...संध्याकाळी व गरज लागली तर रात्रीही जे नेत्यासाठी फिरले ते कार्यकर्ते आता कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे माझा कुणा म्हणू मी, अशी अवस्था आघाडी आणि युतीच्या उमेदवारांची झाली आहे.नेते आणि कार्यकर्ते हे निवडणुकीच्या काळातील अजोड गणित. या गणिताची बेरीज करत पुढे जावे लागते. ज्याची बेरीज आणि गुणाकार चांगला होतो त्याच्या गणिताचे उत्तर मोठे येते; पण जुळणी करून दिलेल्या गणितात वजाबाकी झाली की सगळं गणित फिस्कटतं. यालाच बेरजेचे आणि वजाबाकीचे राजकारण म्हटले जाते. स्थानिक निवडणुकांमध्ये नेत्याने आपल्यासाठी प्रचार करावा, ही कार्यकर्त्याची अपेक्षा असते. त्याप्रमाणे नेते दिवस-रात्र पायाला भिंगरी बांधून फिरतात. ज्यावेळी नेते येत नाहीत, त्यावेळी कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो. आता नेत्यांची बारी आहे. त्यामुळे कार्यकर्ते हटून बसले आहेत; पण तुमचीपण वेळ येणार, हे त्यांना कोण सांगणार.नगरपालिकेत निवडून यावे म्हणून ज्यांच्यासाठी उदयनराजे सकाळी... संध्याकाळी आणि गरज लागली तर रात्रीही फिरले ते आता कुठेच दिसत नाहीत. राजे तुमच्यासाठी काय पण... अशी डरकाळी फोडून मीच तुमचा सच्चा कार्यकर्ता, असा आव आणणारे बरेचजण आता गायब झाले आहेत. ‘तुम्ही काळजी करू नका, मी तुमचा प्रचार करणार,’ असे ठोस आश्वासन देण्यास कार्यकर्ते मागे राहिले नसले तरी प्रचारात मात्र पुढे कुठेच दिसत नाहीत. आता केवळ दहा ते बारा दिवस उरले आहेत. या बारा दिवसांत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन नेत्यांचा प्रचार करावा लागणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रचारात उतरण्यास सांगितले असले तरी एखादा-दुसरा आमदार वगळता कोणीही मनापासून काम करताना दिसत नाही. केवळ सभांमध्ये दिसणारे नेते दिसण्यासाठी आहेत. कामासाठी अजून कोणीही आपल्या स्थानिक पातळीवरील, गावागावातील कार्यकर्त्यांना आदेश आणि संदेश दिलेले नाहीत. त्यामुळे काही केल्या प्रचार यंत्रणा गतिमान होताना दिसत नाही.शिवसेनेने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली. यापूर्वी ते राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये होते. त्यामुळे त्यांना आपले कोणीच म्हणायला तयार नाही. भाजपचे नेते ते आता शिवसेनेचे उमेदवार असल्याचे म्हणतात तर शिवसेनावाले मूळचा भाजपचा उमेदवार असल्याने परकेपणाची जाणीव करून देतात. रिपाइंने तर प्रचाराची वेगळीच चूल मांडली आहे. त्यामुळे भाजपच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी नगरसेवकांच्या गल्लोगल्ली जाऊन बैठका घेऊन काम करण्याचे आवाहन केले; पण त्यांनी तेवढे मनावर घेतलेले नाही. नगरसेवकांना अजूनही रसद पुरवठा होत नसल्याने ते हतबल आहेत. आमचा प्रचार सुरू आहे. काळजी नको, असे आश्वासन त्यांचेही नेत्यांना आहे; पण प्रत्यक्षात ते प्रचारात कितपत सहभागी होत आहेत, हे त्यांचे त्यांनाच माहिती.उमेदवारी माघारी घेण्याची वेळ निघून गेली. आता सातारा लोकसभा मतदार संघात ९ उमेदवार रिंगणात आहेत. या नऊ उमेदवारांना पुढील १२ दिवसांत जिल्ह्याच्या कानाकोपºयात पोहोचायचे आहे. त्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून या उमेदवारांचा प्रचार सुरू होणार आहे. मग, पहाटेपासूनच तयारी. सकाळी कोणत्या गावात, नाष्टा आणि चहा कोणाकडे, दुपारी कोणत्या गावात आणि विश्रांती कोठे, संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचे नियोजन काय आणि रात्रीची सभा कुठे? या सर्व नियोजनाला कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ लागणार आहे. त्याशिवाय प्रचाराला रंगत येणार नाही. त्यातच अपक्ष असणारे उमेदवारही आपल्यापरीने गावागावांमध्ये जाऊन आपल्याला मतदान करण्यासाठी विनवणी करत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत उमेदवारांची होणारी धावपळ आणि कार्यकर्त्यांची पळापळ पाहायला मिळणे गरजेचे आहे.निवडणुका येतील आणि जातीलही; पण ज्यांनी आपल्यासाठी काही केले आणि जे करणार आहेत, त्यांचा विचार करून पक्षवाढीसाठी आणि स्वत:च्या राजकीय फायदासाठी काम होणे अपेक्षित आहे. मग ते नेत्याचे असो किंवा पक्षाचे. पण सातारा मतदार संघात सध्या वेगळेच वातावरण दिसते. एकमेकांची जिरवण्याच्या उद्देशानेच या निवडणुकीतील प्रचार पाहायला मिळतो. त्यामुळे पुढील काळात आणि यापूर्वीही दुखावलेली मने निवडणुकीच्या माध्यमातून सांधली जाण्याची आवश्यकता आहे.नगरसेवक आहे तरी कुठे...?सातारा शहरात काही नगरसेवक सध्या नजरेसच पडत नाहीत. निवडणूक झाल्यानंतर सुटीवर जाणारे अनेकजण आता ऐन निवडणुकीच्या काळातच बाहेरगावी गेल्याचे निरोप मिळत आहेत. तातडीच्या कामासाठी बाहेरगावी गेल्याचा निरोप ठेवून नगरसेवक शहराबाहेर असल्याचे अनेकजण सांगतात. निवडणूक आहे म्हणून शहरातील समस्या संपलेल्या नाहीत. तरी देखील निवडणुकीत काहीच काम नसल्याने त्यांनी टूर केली आहे.दारात एक; घरात एक प्रचारनिवडणुकीत एकमेकांची उणी-दुणी काढल्यामुळे आता प्रभागात एकत्र फिरण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे प्रत्येकजण मी स्वतंत्रपणे प्रचार करणार, असे सांगत आहे. कधीतरी कुठेतरी जास्त ऊन नाही, याचा अंदाज घेऊन एखादा कार्यकर्ता पत्रक वाटताना दिसतो; पण दारात एक आणि घरात एक जाऊन दुसरेच सांगत असल्यामुळे मतदारही गोंधळात पडले आहेत.