शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मलाबी मोर्चाला यिवू द्या की रं..

By admin | Updated: July 11, 2014 00:40 IST

खंडाळा तहसील कार्यालय : अनुसूचित जमातींच्या सवलतींसाठी धनगर समाजबांधवांचा एल्गार

खंडाळा : राज्यातील धनगर समाजाला अनुचूचित जमातीच्या सवलती जाहीर कराव्यात, यासाठी खंडाळा तहसील कार्यालयावर धनगर समाजातील शेकडो लोकांनी मेंढरांसह मोर्चा काढला. यामुळे तहसील कार्यालयाकडे जाण्याच्या मार्गावर चक्काजाम झाला होता.पंचायत समितीचे समितीचे सदस्य रमेश धायगुडे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चाने खंडाळा शहर गजबजले होते. त्यामुळे आरक्षणासाठी मुक्या जनावरांनीही तहसील कार्यालयासमोर चक्काजाम केल्याचे दिसून येत होते. सवलती न मिळाल्यास आघाडी शासनाच्या विरोधात काम करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. भारतीय राज्यघटनेनुसार धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत केलेला आहे. देशातील हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाना, बिहार, गोवा यासह सात राज्यांमध्ये या सामाजाला अनुसूचित जमातींच्या सवलती दिल्या जातात. वास्तविक हा समाज मेंढपाळ व्यवसायामुळे भटकंती करणारा आहे. देशातील विविध भागांत वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. त्यामुळे ‘संविधानाच्या कलमात ‘धनगड’ असा उल्लेख आढळतो. मात्र, महाराष्ट्रात तो ‘धनगर’ या नावाने ओळखला जातो. केवळ लेखनातील चुकांमुळे महाराष्ट्रातील या समाजाला विविध सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने धनगर समाजाला अनुचूचित जमातींच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.त्यांना योग्य त्या सवलती जाहीर करून शासनाने त्यांच्या विकासाचा स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अनेकदा मागणी करूनही शासनाने दखल न घेतल्याने मोर्चा काढण्याची वेळ आली आहे,’ अशा भावना काही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. आरक्षण सवलतीच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.घोडे-मेंढरांचाही सहभागराष्ट्रीय महामार्गापासून ते तहसील कार्यालयापर्यंत घोडी, मेंढरं आणि मेंढपाळासह गजीनृत्यांच्या तालावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, सभापती दीपाली साळुंखे, सदस्य रमेश धायगुडे, जिल्हा परिषदेचे सदस्य माणिकराव सोनवलकर, टी. आर. गारळे, रमेश शिंदे, समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे, आनंदराव वाघमोडे, राजेंद्र तांबे, नामदेवराव धायगुडे, लताताई नरुटे, शामराव गाढवे, भीमराव बुरुंगले, काशिनाथ धायगुडे आदी उपस्थित होते.धनगर समाजाचा वापर केवळ मतांसाठी करण्यात आला, त्यामुळे गेली पन्नास वर्षे मेंढपाळांची ससेहोलपट सुरू आहे. आमच्या सवलती आम्हाला मिळायलाच हव्यात, विधानसभेपूर्वी त्या जाहीर न केल्यास या समाजाचाच राजकीय मार्ग वेगळा राहील.- रमेश धायगुडे-पाटीलसदस्य, पंचायत समिती खंडाळा