शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
4
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
5
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
6
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
7
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
8
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
9
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
10
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
11
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
12
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
13
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
14
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
15
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
16
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

विद्यार्थ्यांच्या पुस्तकांमुळं गटशिक्षणाधिकाऱ्यांना ‘धडा’

By admin | Updated: July 15, 2016 22:38 IST

तब्बल महिन्यानंतर पुस्तके हातात : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संबंधितांना तत्काळ नोटीस--लोकमतचा दणका!

नितीन काळेल --सातारा -शाळा सुरू होऊन तब्बल एक महिना झाला तरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे पुस्तकच मिळाले नाही, हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी संबंधित तालुक्यातील चार गटशिक्षणाधिकाऱ्यांना खुलासा करण्याची नोटीस पाठविली आहे. याप्रकरणात संबंधितांनी पुस्तकाची आॅनलाईन मागणीच केली नसल्याचे कारण पुढे आले आहे. दरम्यान, ‘लोकमत’च्या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, लवकरच सर्व पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत. याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. शाळा सुरू होण्यापूर्वी तशी मागणी करणे आवश्यक असते. तरच शाळा भरताना ही पुस्तके संबंधित शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात; मात्र यावर्षी सातारा जिल्ह्यात पुस्तके मिळाली. पण, चार तालुक्यांत तीन वर्गांची हिंदी विषयाची पुस्तके मिळाली नाहीत. याबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने घेतली. त्यानंतर पुस्तके न मिळण्यामागचे कारण समोर आले. तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत किती विद्यार्थी आहेत, किती पुस्तकांची आवश्यकता आहे, त्याची आकडेवारी घेऊन आॅनलाईन मागणी करावी लागते. यावर्षी कऱ्हाड, पाटण, खटाव आणि खंडाळ्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी प्रथमदर्शनी पाचवी, सहावी आणि सातवीच्या हिंदी सुलभभारती या विषयाच्या पुस्तकांची मागणी केली नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांना आढळून आले. त्यांनी चार तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांना सात दिवसांत खुलासा करा, अशा आशयाचीच नोटीस काढली आहे. त्यानंतर देशमुख यांनी या प्रकरणात संबंधितांशी चर्चा करून पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत कशी लवकर पोहोचतील, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर गुरुवारीच एक वाहन पुस्तके आणण्यासाठी कोल्हापूर येथे गेले होते. त्यामुळे महिन्यानंतर हातात हिंदी विषयाचे पुस्तक पडत आहे. पुस्तके न मिळालेले विद्यार्थी...चार तालुक्यांतील विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत. यामध्ये पाचवी १५ हजार ८६५, सहावी ८ हजार ७३१ आणि सातवी ५ हजार ८४९ असे विद्यार्थी आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना दोन दिवसांत पुस्तके मिळतील, अशी व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी पुस्तके मिळाली...मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांच्या कार्यवाहीनंतर शुक्रवारी खटाव आणि पाटण तालुक्यांत पाचवीची हिंदी विषयाची पुस्तके प्राप्त झाली आहेत. तर कऱ्हाड तालुक्यात पुस्तके पोहोच करण्याची कार्यवाही सुरू होती, अशी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याचे वृत्त मी ‘लोकमत’मध्ये वाचले. त्यानंतर माहिती घेतली असता संबंधितांनी हिंदी विषयाच्या पुस्तकांची आॅनलाईन मागणी केली नसल्याचे समोर आले. त्यामुळे चार गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस काढली आहे. येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील. - राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद