शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

विजयाचा गुलाल अंगावर घेऊन पर्यावरण रक्षणाचा धडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेट्री : विजयाचा गुलाल अंगावर पडला की अनेकजण हवेत जातात. आपल्या भोवताली काय चाललंय याचंही भान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेट्री : विजयाचा गुलाल अंगावर पडला की अनेकजण हवेत जातात. आपल्या भोवताली काय चाललंय याचंही भान राहत नाही. पण मनात हळवा कोपरा असणारीही काही मंडळी असतात. अनावळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या अमोल जाधव यांच्या अंगावरचा विजयी गुलाल निघालाही नव्हता. ते गावाकडे जाताना गणेशखिंडीत वणवा लागल्याचे लक्षात आले. क्षणात ते सहकाऱ्यांना घेऊन वणवा विझविण्यासाठी धावून गेले.

शहराच्या पश्चिमेकडील सातारा-कास मार्गावर गणेशखिंड पठार परिसरात परळीकडील दिशेला विघ्नसंतुष्ट प्रवृत्ती असणाऱ्यांकडून वणवा लावण्यात आला होता. यामुळे परिसरातील कित्येक टन चारा नष्ट होऊन वाऱ्याच्या वेगामुळे मोठ्या प्रमाणावर आग भडकतानाचे चित्र दिसून येत होते. दरम्यान, सातारा येथून निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल ऐकून अनावळेकडे आल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले अमोल नामदेव जाधव यांनी विजयाचा गुलाल अंगावर घेऊन वणवा विझवला.

पश्चिमेकडील डोंगरमाथ्यावर असणारा हा परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची कुरणं आहेत. अशा या परिसराला विघ्नसंतुष्टांची नजर लागली आहे. वणवे लावून गवतांच्या कुरणांची राख करण्यात ही मंडळी धन्यता मानताना दिसत आहेत.

यवतेश्वर, कास, बामणोली या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने शेतीबरोबर पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. येथील संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने उदरनिर्वाहासाठी शेतकरी जनावरे सांभाळताना दिसतात. जनावरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकरी गवत कापणी करून त्याच्या पेंढ्या तयार करून गंजी लावतात. मात्र सध्या या परिसरात ठिकठिकाणी वारंवार वणवे लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत.

गणेशखिंड परिसरात गेल्या आठवड्यात लागलेला वणवा झाडांच्या डहाळ्याच्या साह्याने विझविण्यासाठी अनावळे-पेट्रीचे निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव व त्यांचे मित्र सहकारी मंगेश माने, गणेश माने, संतोष माने, दिलीप माने, सुहास माने, संतोष भोसले, अजय खामकर, तुषार माने, सागर माने, अजित माने, दत्ता माने, शशी माने, सूरज माने,गणेश पांडुरंग माने यांनी आटोकाट प्रयत्न केले. वणव्यावर नियंत्रण राखून संभाव्य अधिक हानी टळून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यास मदत केल्याने सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.

पर्यावरणाची हानी टाळण्यास मदत

कित्येक वन्यजीवांचा बळी जात असून पशुपक्ष्यांच्या निवाऱ्यांना धोका निर्माण होतो. या वणव्यांमुळे येथील वनसंपदा धोक्यात येऊ लागली आहे. काही अतिउत्साही पर्यटकांकडून वणवा लावला गेल्याने यवतेश्वर-कास मार्गावर गणेशखिंड पठार परिसरात कित्येक टन चारा जळून खाक झाला आहे. अशा बेजबाबदार वृत्तीला आवर घालण्याची मागणी होत आहे. आमच्या मित्रांकडून वेळीच वणवा रोखला गेल्याने संभाव्य पर्यावरणाची हानी टळली, याचे समाधान आहे, अशा भावना नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव यांनी व्यक्त केल्या.

फोटो

२९पेट्री-वणवा

सातारा-कास मार्गावरील गणेश खिंडीत लागलेला वणवा नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव यांनी मित्रांच्या मदतीने विजविला.