शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

वीस वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे धडे

By admin | Updated: July 5, 2016 00:28 IST

मलकापूरचे आनंदराव चव्हाण विद्यालय : आगाशिव डोंगरात दरवर्षी बीजारोपण

माणिक डोंगरे --मलकापूर  -येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारे पर्यावरणपूरक शिक्षणाचे धडेही दिले जातात. विद्यालयातील हजारो विद्यार्थीगेल्या वीस वर्षांपासून सातत्याने जून-जुलै महिन्यांत बीजारोपण व वृक्षारोपणाचा उपक्रम राबवतात. त्यामुळे आगाशिव डोंगराला वेगळी झळाळी मिळाली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आनंदराव चव्हाण विद्यालयाची १९८१ मध्ये स्थापना करण्यात आली. केवळ २५ विद्यार्थी घेऊन सुरू केलेल्या या शैक्षणित संकुलात आज पाचवी ते बारावी पर्यंत तब्बल १ हजार ९०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना ५१ शिक्षक अद्यापनाचे काम करतात. विविध प्रकारच्या शालेय व सहशालेय उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या जोडीला आदर्श ज्युनिअर कॉलेजची सुरुवात केली. सर्वांगीण विकास साधणारे हे शैक्षणिक संकुल आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच निसर्गसंवर्धनपर उपक्रमात आगाशिव डोंगरात बीजारोपण, वृक्षारोपण, लूज बोल्डर बंधारे यांसारख्या उपक्रमातून पर्यावरणपूरक शिक्षणही देण्यात येते. गेल्या वीस वर्षांत सातत्याने जून-जुलै महिन्यांत हे उपक्रम राबवल्याने आगाशिव डोंगर परिसरात झाडे लावली आहेत. तर बांध, बंधारे बांधल्यामुळे या भागातील जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या शैक्षणिक संकुलामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच व्यवहारिक, व्यावसायिक व सामाजिक संस्कार देऊन एक जबाबदार भारतीय नागरिक घडवण्याचा प्रयत्न या विद्यालयात सातत्याने होतो. प्रशस्त व सुसज्ज इमारत, स्वतंत्र प्रयोगशाळा, समृद्ध गं्रथालयसंगणक प्रशिक्षण वर्गअद्ययावत इंटरनेट कक्षाद्वारे आयटी प्रशिक्षणाची सोयडिजिटल क्लासरूमद्वारे अद्यापनाची सोयराष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून परिसर व निसर्ग निरीक्षण सहलीशासकीय चित्रकला परीक्षेसह सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षाक्रीडा गुणांकनासाठी उन्हाळी क्रीडा शिबिर व खेळांचे प्रात्यक्षिकवक्तृत्व, निबंध, सुंदर हस्ताक्षर, कथाकथन, रांगोळीस्पर्धा मार्गदर्शन केंद्रसंगीत व कला प्रशिक्षणबारावी नंतरच्या जे. ई. ई. व नीट स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन केंद्रपंढरीच्या मार्गावर व्यसनमुक्तीची दिंडीयंदा आठवे वर्ष : विलासबाबा जवळ यांच्या उपक्रमामुळे लाखो तरुण निर्व्यसनीसातारा : विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने शेकडो दिंड्या मार्गक्रमण करत आहेत. या दिंड्यांमध्येच एक दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मेढा येथील विलासबाबा जवळ हे गेली आठ वर्षे व्यसनमुक्ती दिंडी काढत आहेत. भजन, कीर्तन, भारुडाच्या माध्यमातून संतांनीही महाराष्ट्रात लोकजागृतीचे काम केले आहे. हीच परपंरा आजही जपली जात आहे. आषाढी वारीसाठी शेकडो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. या दिंड्यांमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. यामध्ये शेतकरी, तरुणाईची मोठी संख्या असते. व्यसनमुक्त चळवळीच्या माध्यमातून वाहून घेतलेले विलासबाबा जवळ त्यांच्या कार्यासाठी या गर्दीचा फायदा करून घेत आहेत. बंडातात्या कराडकर व तत्कालीन अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या संकल्पनेतून वारीच्या वाटेवर २००८ मध्ये प्रचाराचा प्रारंभ झाला. व्यसनमुक्तीचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी कुटुंबातील माणूस व्यसनमुक्त झाला पाहिजे. गोपालनद्वारे सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळाला पाहिजे. ही या संघटनेची पूर्वीपासून भूमिका आहे. व्यसनमुक्तीसाठी वारीत सहभागी झाल्यानंतर काही गोष्टी निदर्शनास आल्या. वारीत सहभागी झालेल्यांमध्येही व्यसनाधिनता आढळते. तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट याबरोबरच काहींमध्ये गांजा या व्यसनांचे प्रमाण खूपच आढळून आले. वारीच्या वाटेवर चित्रफीत, लघुपट, पथनाट्याद्वारे व्यसनमुक्तीवर प्रबोधन केले जात आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. असंख्य तरुण व्यसनमुक्त दिंडीत सहभागी होतात. गाडीतळावर येऊन माउलींची शपथ घेऊन पुन्हा व्यसन न करण्याचा संकल्प करतात. खिशातील व्यसनी पदार्थ काढून पोत्यात जमा करतात. त्यामुळे दोन-दोन पोती सहज भरतात. गांजा ओढणारी किंवा विकणारे कोण आढळले तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाते. माउलींच्या सोहळ्यात प्रचाररथाचे नेतृत्त्व भानुदास वैराट करत आहेत. तुकोबारायांच्या सोहळ्यात कल्याण तावरे, संदीप होले तपास करत आहेत. उपाध्यक्ष शहाजी काळे मार्गदर्शन करत आहेत. (प्रतिनिधी)संतवचनांचा दाखलादिंड्यांमध्ये व्यसनमुक्ती संदर्भात प्रबोधन करत असताना थेट विरोध न करता त्यांना तुकाराम महाराजांच्या अभंगांचा दाखला दिला जातो. त्यांना माउलींची शपथ दिली जाते. त्यामुळे लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो.- विलासबाबा जवळ