शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

वीस वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे धडे

By admin | Updated: July 5, 2016 00:28 IST

मलकापूरचे आनंदराव चव्हाण विद्यालय : आगाशिव डोंगरात दरवर्षी बीजारोपण

माणिक डोंगरे --मलकापूर  -येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारे पर्यावरणपूरक शिक्षणाचे धडेही दिले जातात. विद्यालयातील हजारो विद्यार्थीगेल्या वीस वर्षांपासून सातत्याने जून-जुलै महिन्यांत बीजारोपण व वृक्षारोपणाचा उपक्रम राबवतात. त्यामुळे आगाशिव डोंगराला वेगळी झळाळी मिळाली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आनंदराव चव्हाण विद्यालयाची १९८१ मध्ये स्थापना करण्यात आली. केवळ २५ विद्यार्थी घेऊन सुरू केलेल्या या शैक्षणित संकुलात आज पाचवी ते बारावी पर्यंत तब्बल १ हजार ९०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना ५१ शिक्षक अद्यापनाचे काम करतात. विविध प्रकारच्या शालेय व सहशालेय उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या जोडीला आदर्श ज्युनिअर कॉलेजची सुरुवात केली. सर्वांगीण विकास साधणारे हे शैक्षणिक संकुल आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच निसर्गसंवर्धनपर उपक्रमात आगाशिव डोंगरात बीजारोपण, वृक्षारोपण, लूज बोल्डर बंधारे यांसारख्या उपक्रमातून पर्यावरणपूरक शिक्षणही देण्यात येते. गेल्या वीस वर्षांत सातत्याने जून-जुलै महिन्यांत हे उपक्रम राबवल्याने आगाशिव डोंगर परिसरात झाडे लावली आहेत. तर बांध, बंधारे बांधल्यामुळे या भागातील जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या शैक्षणिक संकुलामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच व्यवहारिक, व्यावसायिक व सामाजिक संस्कार देऊन एक जबाबदार भारतीय नागरिक घडवण्याचा प्रयत्न या विद्यालयात सातत्याने होतो. प्रशस्त व सुसज्ज इमारत, स्वतंत्र प्रयोगशाळा, समृद्ध गं्रथालयसंगणक प्रशिक्षण वर्गअद्ययावत इंटरनेट कक्षाद्वारे आयटी प्रशिक्षणाची सोयडिजिटल क्लासरूमद्वारे अद्यापनाची सोयराष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून परिसर व निसर्ग निरीक्षण सहलीशासकीय चित्रकला परीक्षेसह सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षाक्रीडा गुणांकनासाठी उन्हाळी क्रीडा शिबिर व खेळांचे प्रात्यक्षिकवक्तृत्व, निबंध, सुंदर हस्ताक्षर, कथाकथन, रांगोळीस्पर्धा मार्गदर्शन केंद्रसंगीत व कला प्रशिक्षणबारावी नंतरच्या जे. ई. ई. व नीट स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन केंद्रपंढरीच्या मार्गावर व्यसनमुक्तीची दिंडीयंदा आठवे वर्ष : विलासबाबा जवळ यांच्या उपक्रमामुळे लाखो तरुण निर्व्यसनीसातारा : विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने शेकडो दिंड्या मार्गक्रमण करत आहेत. या दिंड्यांमध्येच एक दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मेढा येथील विलासबाबा जवळ हे गेली आठ वर्षे व्यसनमुक्ती दिंडी काढत आहेत. भजन, कीर्तन, भारुडाच्या माध्यमातून संतांनीही महाराष्ट्रात लोकजागृतीचे काम केले आहे. हीच परपंरा आजही जपली जात आहे. आषाढी वारीसाठी शेकडो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. या दिंड्यांमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. यामध्ये शेतकरी, तरुणाईची मोठी संख्या असते. व्यसनमुक्त चळवळीच्या माध्यमातून वाहून घेतलेले विलासबाबा जवळ त्यांच्या कार्यासाठी या गर्दीचा फायदा करून घेत आहेत. बंडातात्या कराडकर व तत्कालीन अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या संकल्पनेतून वारीच्या वाटेवर २००८ मध्ये प्रचाराचा प्रारंभ झाला. व्यसनमुक्तीचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी कुटुंबातील माणूस व्यसनमुक्त झाला पाहिजे. गोपालनद्वारे सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळाला पाहिजे. ही या संघटनेची पूर्वीपासून भूमिका आहे. व्यसनमुक्तीसाठी वारीत सहभागी झाल्यानंतर काही गोष्टी निदर्शनास आल्या. वारीत सहभागी झालेल्यांमध्येही व्यसनाधिनता आढळते. तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट याबरोबरच काहींमध्ये गांजा या व्यसनांचे प्रमाण खूपच आढळून आले. वारीच्या वाटेवर चित्रफीत, लघुपट, पथनाट्याद्वारे व्यसनमुक्तीवर प्रबोधन केले जात आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. असंख्य तरुण व्यसनमुक्त दिंडीत सहभागी होतात. गाडीतळावर येऊन माउलींची शपथ घेऊन पुन्हा व्यसन न करण्याचा संकल्प करतात. खिशातील व्यसनी पदार्थ काढून पोत्यात जमा करतात. त्यामुळे दोन-दोन पोती सहज भरतात. गांजा ओढणारी किंवा विकणारे कोण आढळले तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाते. माउलींच्या सोहळ्यात प्रचाररथाचे नेतृत्त्व भानुदास वैराट करत आहेत. तुकोबारायांच्या सोहळ्यात कल्याण तावरे, संदीप होले तपास करत आहेत. उपाध्यक्ष शहाजी काळे मार्गदर्शन करत आहेत. (प्रतिनिधी)संतवचनांचा दाखलादिंड्यांमध्ये व्यसनमुक्ती संदर्भात प्रबोधन करत असताना थेट विरोध न करता त्यांना तुकाराम महाराजांच्या अभंगांचा दाखला दिला जातो. त्यांना माउलींची शपथ दिली जाते. त्यामुळे लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो.- विलासबाबा जवळ