शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोयनेत वीस टक्क्यांहून कमी पाणी!

By admin | Updated: May 22, 2014 00:22 IST

वीजनिर्मितीच्या मर्यादा ओलांडल्या : ६७.०५ टीएमसीऐवजी वापरले ७९ टीएमसी पाणी

 अरुण पवार, पाटण : राज्याच्या विकासाचा मानबिंदू ठरलेल्या कोयना धरणात २१ मेअखेर केवळ १९.८७ टीएमसी पाणीसाठा उरला आहे. सध्या ‘महाजनको’कडून वीजनिर्मितीसाठी पाण्याची मागणी कमी असली, तरी सांगलीकडील शेती व सिंचनासाठी कोयनेतील पाण्याचा सतत वापर सुरू आहे. पायथा वीजगृहातूनही पाण्याचा वापर थोड्याफार प्रमाणात केला जात आहे. मान्सून दाखल होईपर्यंत कोयना धरण वीज, पाणीपुरवठा, शेती या सर्वांना पुरून उरेल का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. यापैकी ६७.०५ टीएमसी पाणीसाठी वीजनिर्मितीसाठी असून, ३० टीएमसी पाणी पूर्वेकडील म्हणजेच सांगलीकडील शेती, सिंचन व पिण्याच्या पाण्याची गरज भागविते. उर्वरित ५ टीएमसी मृत पाणीसाठा म्हणून राखीव राहतो. कोयना धरणातील विभागणी सामान्यत: वरीलप्रमाणे होते. मागील पावसाळ््यात १०४ टीएमसी पाणीसाठा होऊन कोयना धरण भरले होते. तरीदेखील एप्रिलच्या मध्यात कोयना धरणातील पाणीसाठ्याने झपाट्याने तळ गाठला असल्यामुळे चिंता वाढण्यास सुरुवात झाली. ही चिंता आजही कायम आहे. आजमितीस कोयना धरणात केवळ १९.८७ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीदेखील सांगलीकडे ६५ दशलक्ष घनमीटर पाणी दिवसाकाठी सोडावे लागत आहे, तर वीजनिर्मितीसाठी पोफळी विद्युत गृहाकडे २१९एमसीएफटी पाणी, चौथ्या टप्प्याकडील वीजनिर्मितीसाठी ३६३ एमसीएफटी पाणी सोडले जात आहे, हे सध्याचे चित्र आहे. ‘महाजनको’ने ६७.०५ टीएमसी पाणीसाठा करारानुसार वापरून झाल्यानंतरही मर्यादा ओलांडत ७९ टीएमसी पाणी वापरण्यापर्यंत मजल मारली. यावर ‘महाजनको’ला जलसंपदा विभागाने एक पत्र पाठवून कोणत्या आधारावर मर्यादा ओलांडून पाणीवापर केला, याचा खुलासा मागविला होता. आता पाऊस वेळेवर येतो का आणि उर्वरित पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरतो का, हे पाहावे लागणार आहे.