शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

लोणंदच्या पीचवर विधानसभेची तयारी

By admin | Updated: April 11, 2016 00:39 IST

लोणंद : शिवसेनेची रणनीती निवडणुकीसाठी अवसानघातकी; भाजपशी युतीचा प्रस्ताव धुडकावला

दशरथ ननावरे -- लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला मित्रपक्ष भाजपाशी युतीचा प्रस्ताव धुडकावत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक लोणंदमध्ये सेनेची अल्प ताकद असतानाही घेतलेल्या या निर्णयामागे राजकीय समीकरणे लपलेली आहेत. लोणंद नगरपंचायतच्या पीचवर गटबांधणी करून विधानसभेची तयारी करण्याची गणिते शिवसेनेने आखल्याचे मानले जात आहे. मात्र, सेनेची ही रणनीती नगरपंचायतीसाठी अवसानघातकी ठरणार आहे. लोणंदच्या पहिल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारंपरिक लढतीत शिवसेना-भाजप मिळून सक्षम तिसरा पर्याय उभा करतील, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र, निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्ही पक्षांत कोणत्याही नेत्यांनी चर्चा केल्या नाहीत. वस्तूत: दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची ध्येयधोरणेच अवलंबण्याशिवाय स्थानिकांना पर्याय उरला नाही. याचेच पर्यवसान निवडणूक स्वतंत्र लढण्यात झाले. या संपूर्ण घडामोडीत स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेतल्याने शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनेलसाठीही मोठी धावपळ करावी लागल्याचे दिसून येते. त्यातच ज्यांच्या नेतृत्वाखाली लोणंदची निवडणूक लढायची ते तालुकाप्रमुख चंद्रकांत शेळके आणि शहरप्रमुख रवींद्र क्षीरसागर या बिनीच्या शिलेदारांनीच सेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपा आणि राष्ट्रवादीचा रस्ता धरला. त्यामुळे शिवसेनेचा भगवा कोणाच्या हाती द्यावा, अशी परिस्थिती सेनेच्या वरिष्ठांवर ओढावली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत उमेदवारांची शोधाशोध करावी लागल्याने १७ प्रभागांपैकी केवळ नऊच प्रभागांत त्यांना उमेदवार मिळाले आहेत. त्या मानाने भाजपाने चौदा प्रभागांत उमेदवार देऊन आपण लोणंदमध्ये सेनेपेक्षा वरचढ आहोत, हे दाखवून दिले आहे.शिवसेनेने नऊ प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. भाजपासोबत युती झाली नाही. दोघांनीही नगरपालिकेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किमान सेनेची व्होटबँक अबाधित ठेवून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. पक्षाच्या ध्येयधोरणासाठी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा मात्र बळी गेला असल्याचे समोर आले आहे.शिवसेनेची भूमिका यशस्वी होणार का ?लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची ‘एकला चलो रे’ ची भूमिका कितपत यशस्वी करणार, हे पुढील काळच ठरवणार आहे. वास्तविक लोणंदमध्ये शिवसेनेची ताकद अल्प आहे. असे असतानाही शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयामागे राजकीय समीकरणे लपलेली आहेत, असे राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.