शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

लोणंदच्या पीचवर विधानसभेची तयारी

By admin | Updated: April 11, 2016 00:39 IST

लोणंद : शिवसेनेची रणनीती निवडणुकीसाठी अवसानघातकी; भाजपशी युतीचा प्रस्ताव धुडकावला

दशरथ ननावरे -- लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला मित्रपक्ष भाजपाशी युतीचा प्रस्ताव धुडकावत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक लोणंदमध्ये सेनेची अल्प ताकद असतानाही घेतलेल्या या निर्णयामागे राजकीय समीकरणे लपलेली आहेत. लोणंद नगरपंचायतच्या पीचवर गटबांधणी करून विधानसभेची तयारी करण्याची गणिते शिवसेनेने आखल्याचे मानले जात आहे. मात्र, सेनेची ही रणनीती नगरपंचायतीसाठी अवसानघातकी ठरणार आहे. लोणंदच्या पहिल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारंपरिक लढतीत शिवसेना-भाजप मिळून सक्षम तिसरा पर्याय उभा करतील, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र, निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्ही पक्षांत कोणत्याही नेत्यांनी चर्चा केल्या नाहीत. वस्तूत: दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची ध्येयधोरणेच अवलंबण्याशिवाय स्थानिकांना पर्याय उरला नाही. याचेच पर्यवसान निवडणूक स्वतंत्र लढण्यात झाले. या संपूर्ण घडामोडीत स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेतल्याने शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनेलसाठीही मोठी धावपळ करावी लागल्याचे दिसून येते. त्यातच ज्यांच्या नेतृत्वाखाली लोणंदची निवडणूक लढायची ते तालुकाप्रमुख चंद्रकांत शेळके आणि शहरप्रमुख रवींद्र क्षीरसागर या बिनीच्या शिलेदारांनीच सेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपा आणि राष्ट्रवादीचा रस्ता धरला. त्यामुळे शिवसेनेचा भगवा कोणाच्या हाती द्यावा, अशी परिस्थिती सेनेच्या वरिष्ठांवर ओढावली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत उमेदवारांची शोधाशोध करावी लागल्याने १७ प्रभागांपैकी केवळ नऊच प्रभागांत त्यांना उमेदवार मिळाले आहेत. त्या मानाने भाजपाने चौदा प्रभागांत उमेदवार देऊन आपण लोणंदमध्ये सेनेपेक्षा वरचढ आहोत, हे दाखवून दिले आहे.शिवसेनेने नऊ प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. भाजपासोबत युती झाली नाही. दोघांनीही नगरपालिकेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किमान सेनेची व्होटबँक अबाधित ठेवून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. पक्षाच्या ध्येयधोरणासाठी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा मात्र बळी गेला असल्याचे समोर आले आहे.शिवसेनेची भूमिका यशस्वी होणार का ?लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची ‘एकला चलो रे’ ची भूमिका कितपत यशस्वी करणार, हे पुढील काळच ठरवणार आहे. वास्तविक लोणंदमध्ये शिवसेनेची ताकद अल्प आहे. असे असतानाही शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयामागे राजकीय समीकरणे लपलेली आहेत, असे राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.