शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबानं सोडलं..पोलिसांनी तारलं !

By admin | Updated: July 1, 2016 23:37 IST

निराधाराला ‘आधार ’; आई-मुलाला दिलं पोलिस ठाणं स्वच्छतेचं काम

दत्ता यादव -- सातारा --हातात दंडुका घेतलेला खाकी गणवेशातला पोलिस पाहिलं की, भल्या भल्यांना कापरं भरतं. पोलिसांचा दरारा आणि रुबाब पाहिल्यानंतर पांढरपेशी माणसंही पोलिसांपासून चार हात लांबच राहतात; मात्र सातारा पोलिसांनी ही प्रतिमा बदलून टाकली आहे. कुटुंबीयांनी सोडलेल्या मायलेकांना खाकीने आपलसं केलंय. त्यांच्या दैनंदिन गरजा भागवता याव्यात म्हणून त्यांना कामही उपलब्ध करून दिलंय. सातारा पोलिसांच्या माणुसकीला अनेकांनी सलाम ठोकला आहे.कौटुंबिक कलहातून दोघांनीही घर सोडलं. दोन मुलं असतानाही ती अभागी माता घराबाहेर पडली. साताऱ्यात मिळेल ते काम करून एका मैत्रिणीसोबत उदरनिर्वाह करत होती. त्यातच मैत्रिणीचे अचानक निधन झाले. तिच्या मुलाला आपला मुलगा मानून तिने त्याचा सांभाळ केला. दोघांनाही कुटुंबानं सोडलं असलं तरी पोलिसांनी त्यांना तारलं. पोलिस ठाणे स्वच्छ करण्याचे काम त्यांना देऊन आर्थिक हातभार लावलाय. त्या दोघांचे घर आता पोलिस ठाणंच झालंय. बकुळाबाई चिकणे आणि संजय जगदाळे अशी अभागी मायलेकांची नावे आहेत. बकुळाबाई चिकणे या मूळच्या जावळी तालुक्यातील कुसंबी या गावच्या. तर संजय जगदाळे हा येथील शुक्रवार पेठेत राहणारा. बकुळाबार्इंनी पन्नासी पार केली आहे तर संजयनेही चाळीसी गाठलीय. बकुळाबाई सांगतायत, मला दोन मुलं. पाच वर्षांपूर्वी मला घरातून बाहेर काढलं. एवढेच नव्हे तर मी मेले म्हणून माझ्या मोठ्या मुलानं माझं कार्यही घातलं. घर सोडल्यापासून मी राजवाडा परिसरात राहत होते. त्या ठिकाणी संजयच्या आईची आणि माझी ओळख झाली. तीही अशीच माझ्यासारखी घराबाहेर राहत होती. आम्ही दोघी आणि तिचा मुलगा संजय हा आमच्यासोबत राहू लागला. संजयच्या आईचे अचानक निधन झाले. त्यानंतर तिच्या मुलाला माझा मुलगा समजूनच मी त्याचा सांभाळ केला. मिळेल ते काम करून त्याला खायला घालते. हे सांगत असताना त्यांना अश्रू आवरले नाहीत. धाकटा मुलगा मला कधी-कधी भेटायला येतो. मात्र मोठा मुलगा येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. पोलिस ठाण्याची भिंत बनली आसरा!तीन वर्षांपूर्वी बकुळाबाईने राजवाड्यावरून आपला संसार हलविला. शहर पोलिस ठाण्याच्या आवारात कुठे झाडाखाली तर कुठे भिंतीच्या आडोशाला हे दोघे राहू लागले. खाकी वर्दीतील माणूसही शेवटी माणूसच असतो. या खाकी वर्दीने या मायलेकांना आसरा तर दिलाच; पण उदरनिर्वाहाचे साधनही उपलब्ध करून दिलं. रोज पोलिस ठाण्याची स्वच्छता हे मायलेक करतात. या मोबदल्यात त्यांना दरमहा एक हजार ते बाराशे रुपये मिळतायत. शहर पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूस भिंतीच्या आडोशाला त्यांनी संसार थाटलाय. एक पत्र्याची पेटी अन् दोन गोधडी एवढाच दोघांचा संसार. दरवर्षी पावसाळ्यात त्यांचा संसार कधी पालिकेच्या इमारतीत तर कधी दिसेल त्या इमारतीच्या बेसमेंटला सुरू असतो.म्हणे आम्हाला घरकूल मिळणार!माझी लाकडं आता स्मशानात पोहोचली आहेत. जे करायचं आहे ते मुलासाठी. त्याच्या नावावर मी रेशनिंग कार्डही काढले आहे. आम्हाला आता घरकूलही मिळणार आहे. मात्र ‘साहेब. आज या उद्या या,’ अशी उत्तरे देत असल्याचेही बकुळाबार्इंनी सांगितले.