शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

गाडी सोडा, फोन केल्यास होणार गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लॉकडाऊन करूनसुद्धा अनेक जण रस्त्यावर येऊ लागल्याने पोलिसांनी मंगळवारपासून वाहन जप्तीची कारवाई सुरू केली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : लॉकडाऊन करूनसुद्धा अनेक जण रस्त्यावर येऊ लागल्याने पोलिसांनी मंगळवारपासून वाहन जप्तीची कारवाई सुरू केली आहे. मात्र यामध्ये अनेक जण पोलिसांवर दबाव आणून वाहने सोडून द्या, अशी मागणी करत आहेत. हे निदर्शनास आल्यामुळे पोलिसांनी आता जे कोणी गाडी सोडण्यासाठी फोन करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक शाखेमध्ये गाडी पकडल्यानंतर यापूर्वी अनेकदा पोलिसांना फोन केले जात होते. ओळखीचे आणि कोणी प्रतिष्ठित असेल तर पोलीस सहानुभूतीचा विचार करून गाडीवर कोणतीही कारवाई न करता सोडून देत होते. मात्र आता कोरोनाची भयावह परिस्थिती असताना अनेक जण पोलिसांवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणत आहेत. जिल्हा पोलीस दलाने मंगळवारपासून वाहन जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात तब्बल ८०० हून अधिक वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. मात्र या कारवाई दरम्यान पोलिसांना प्रतिष्ठित लोकांकडून वेगवेगळे अनुभव येऊ लागले आहेत. काही जण गाडी पकडल्यानंतर पोलिसांना फोन करून गाडी सोडा अशी तंबी देत आहेत. हे प्रकार केवळ एका दिवसात बरेच घडल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी हा प्रकार आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यामुळे वरिष्ठांनी, आता जे कोणी गाडी सोडण्यासाठी फोन करतील त्यांचे फोन रेकॉर्ड करावेत. त्यानंतर पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणि आपत्कालीन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता वशिलेबाजी करून गाडी सोडण्याचे दिवस गेले आहेत, हे यावरून दिसून येत आहे.

पोलिसांनी अत्यंत कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. खरे तर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी घराबाहेर पडले नाही पाहिजे. सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. घराघरात लोक बाधित आढळून येत आहेत. असे असताना पोलिसांवर दबाव आणून एक प्रकारे गुन्ह्याला प्रवृत्त केल्याचे प्रकार समोर येत आहेत. आता तरी सातारकरांनी पोलिसांना सहकार्य करून काही काम नसताना घराबाहेर पडू नका तरच ही कोरोनाची लाट आटोक्यात येईल.

चौकट : ओळखीचे आहेत म्हणून येईल अंगलट!

पोलीस एकमेकाच्या ओळखीचे असतात. या ना त्या कारणाने पोलिसांची ओळख झालेली असते. यामध्ये पत्रकार, नेते, नगरसेवक, डॉक्टर यांच्यासह सर्वसामान्य लोकांचेही पोलीस ओळखीचे असतात. आता या कारवाई दरम्यान या ओळखीच्या लोकांनी जर गाडी सोडा असा जर फोन केला तर त्यांच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकांनी ही खबरदारी घेऊन गाडी सोडा ऐवजी बाहेर फिरू नका, असे सांगण्याची वेळ आली आहे.

चौकट : अजूनही लोक विनाकारण फिरतायत

दुसऱ्या दिवशी सातारा पोलिसांनी शहरात कारवाई करून ४२ वाहने जप्त केली. पोलिसांनी सकाळपासून वाहन जप्तीची मोहीम राबवली. त्यामुळे पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी वाहने रस्त्यावर कमी दिसून आली. मात्र तरीसुद्धा अनेक जण रस्त्यावर विनाकारण फिरताना पोलिसांना आढळून येत आहेत.