शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

चितळीत टेंभू जलसेतूला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:55 IST

मायणी : खटाव तालुक्यातील चितळी येथील येरळा नदीवरून सुमारे दोन किलोमीटर लांबीचा जाणाऱ्या टेंभूच्या पुलाला शुक्रवारी गळती लागली. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली.याबाबत माहिती अशी की, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेती पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजना ...

मायणी : खटाव तालुक्यातील चितळी येथील येरळा नदीवरून सुमारे दोन किलोमीटर लांबीचा जाणाऱ्या टेंभूच्या पुलाला शुक्रवारी गळती लागली. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली.याबाबत माहिती अशी की, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेती पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा आशिया खंडातील मोठा सुमारे दोन किलोमीटर लांबीचा व ११० मीटर उंचीवर जलसेतू येरळा नदीवर चितळे येथे बांधण्यात आला आहे.या ठिकाणाहून सांगली जिल्ह्यात टेंभू योजनेचे पाणी जाते. खानापूर तालुक्यातील माहुली येथून टप्पा क्रमांक तीनमधून पाणी सोलापूर जिल्ह्यास जाते. येरळा नदीवरील टेंभू पाठाच्या पुलाला चितळी येथे गळती लागली आहे. यात पंधरा अश्वशक्ती मोटारीपेक्षा अधिक वेगाने पाण्याची गळती सुरू आहे. या गळतीमुळे पाण्याचा मोठा झरा पुलाखालून वाहताना दिसत आहे.टेंभूच्या पुलाचे चाळीस गाळे असून, त्यातील गाळा नंबर ३१ या ठिकाणाहून पाणी गळती सुरू आहे. त्या ठिकाणच्या गाळ्यातील जोडाच्या ठिकाणची रबरी पाईप उचकटल्याने गळती होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.टेंभूचे पाणी दोन-तीन दिवसांपासून सुरू झाले.आटपाडी सांगोलाकडे हे पाणी पोहोचणार आहे. चितळी हद्दीत येरळा नदीवरील बंदिस्त पुलाच्या गाळा नंबर ३१ येथून सुरुवातीला पाण्याची थोडी गळती सुरू झाली होती. गळतीचे प्रमाण दोन दिवसांत दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातून पंधरा अश्वशक्तीच्या मोटारी एवढे पाणी गळती होत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास ३१ नंबर गाळ्याला भगदाड पडून आटपाडी सांगोलाकडे जाणारे पाणी थांबू शकते. तसेच मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.अधिकारी फिरकलेच नाहीतगळतीमुळे पाण्याचा मोठा झरा पुलाखालून वाहताना दिसत आहे. लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र संबंधित विभागाचा कोणताही अधिकारी अद्याप या ठिकाणी फिरकले नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.