शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

चितळीत टेंभू जलसेतूला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:55 IST

मायणी : खटाव तालुक्यातील चितळी येथील येरळा नदीवरून सुमारे दोन किलोमीटर लांबीचा जाणाऱ्या टेंभूच्या पुलाला शुक्रवारी गळती लागली. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली.याबाबत माहिती अशी की, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेती पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजना ...

मायणी : खटाव तालुक्यातील चितळी येथील येरळा नदीवरून सुमारे दोन किलोमीटर लांबीचा जाणाऱ्या टेंभूच्या पुलाला शुक्रवारी गळती लागली. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली.याबाबत माहिती अशी की, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेती पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा आशिया खंडातील मोठा सुमारे दोन किलोमीटर लांबीचा व ११० मीटर उंचीवर जलसेतू येरळा नदीवर चितळे येथे बांधण्यात आला आहे.या ठिकाणाहून सांगली जिल्ह्यात टेंभू योजनेचे पाणी जाते. खानापूर तालुक्यातील माहुली येथून टप्पा क्रमांक तीनमधून पाणी सोलापूर जिल्ह्यास जाते. येरळा नदीवरील टेंभू पाठाच्या पुलाला चितळी येथे गळती लागली आहे. यात पंधरा अश्वशक्ती मोटारीपेक्षा अधिक वेगाने पाण्याची गळती सुरू आहे. या गळतीमुळे पाण्याचा मोठा झरा पुलाखालून वाहताना दिसत आहे.टेंभूच्या पुलाचे चाळीस गाळे असून, त्यातील गाळा नंबर ३१ या ठिकाणाहून पाणी गळती सुरू आहे. त्या ठिकाणच्या गाळ्यातील जोडाच्या ठिकाणची रबरी पाईप उचकटल्याने गळती होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.टेंभूचे पाणी दोन-तीन दिवसांपासून सुरू झाले.आटपाडी सांगोलाकडे हे पाणी पोहोचणार आहे. चितळी हद्दीत येरळा नदीवरील बंदिस्त पुलाच्या गाळा नंबर ३१ येथून सुरुवातीला पाण्याची थोडी गळती सुरू झाली होती. गळतीचे प्रमाण दोन दिवसांत दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातून पंधरा अश्वशक्तीच्या मोटारी एवढे पाणी गळती होत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास ३१ नंबर गाळ्याला भगदाड पडून आटपाडी सांगोलाकडे जाणारे पाणी थांबू शकते. तसेच मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.अधिकारी फिरकलेच नाहीतगळतीमुळे पाण्याचा मोठा झरा पुलाखालून वाहताना दिसत आहे. लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र संबंधित विभागाचा कोणताही अधिकारी अद्याप या ठिकाणी फिरकले नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.