शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

चितळीत टेंभू जलसेतूला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:55 IST

मायणी : खटाव तालुक्यातील चितळी येथील येरळा नदीवरून सुमारे दोन किलोमीटर लांबीचा जाणाऱ्या टेंभूच्या पुलाला शुक्रवारी गळती लागली. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली.याबाबत माहिती अशी की, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेती पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजना ...

मायणी : खटाव तालुक्यातील चितळी येथील येरळा नदीवरून सुमारे दोन किलोमीटर लांबीचा जाणाऱ्या टेंभूच्या पुलाला शुक्रवारी गळती लागली. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली.याबाबत माहिती अशी की, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेती पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा आशिया खंडातील मोठा सुमारे दोन किलोमीटर लांबीचा व ११० मीटर उंचीवर जलसेतू येरळा नदीवर चितळे येथे बांधण्यात आला आहे.या ठिकाणाहून सांगली जिल्ह्यात टेंभू योजनेचे पाणी जाते. खानापूर तालुक्यातील माहुली येथून टप्पा क्रमांक तीनमधून पाणी सोलापूर जिल्ह्यास जाते. येरळा नदीवरील टेंभू पाठाच्या पुलाला चितळी येथे गळती लागली आहे. यात पंधरा अश्वशक्ती मोटारीपेक्षा अधिक वेगाने पाण्याची गळती सुरू आहे. या गळतीमुळे पाण्याचा मोठा झरा पुलाखालून वाहताना दिसत आहे.टेंभूच्या पुलाचे चाळीस गाळे असून, त्यातील गाळा नंबर ३१ या ठिकाणाहून पाणी गळती सुरू आहे. त्या ठिकाणच्या गाळ्यातील जोडाच्या ठिकाणची रबरी पाईप उचकटल्याने गळती होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.टेंभूचे पाणी दोन-तीन दिवसांपासून सुरू झाले.आटपाडी सांगोलाकडे हे पाणी पोहोचणार आहे. चितळी हद्दीत येरळा नदीवरील बंदिस्त पुलाच्या गाळा नंबर ३१ येथून सुरुवातीला पाण्याची थोडी गळती सुरू झाली होती. गळतीचे प्रमाण दोन दिवसांत दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातून पंधरा अश्वशक्तीच्या मोटारी एवढे पाणी गळती होत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास ३१ नंबर गाळ्याला भगदाड पडून आटपाडी सांगोलाकडे जाणारे पाणी थांबू शकते. तसेच मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.अधिकारी फिरकलेच नाहीतगळतीमुळे पाण्याचा मोठा झरा पुलाखालून वाहताना दिसत आहे. लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र संबंधित विभागाचा कोणताही अधिकारी अद्याप या ठिकाणी फिरकले नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.