शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शेतकºयांच्या संघटनेचे नेते धंदेवाईक निघाले--शंकर धोंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘राजू शेट्टी काय किंवा सदाभाऊ खोत, या दोघांच्याही छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला मी लावला. ही आमचीच लेकरे असली तरी ती धंदेवाईकपणे वागू लागली आहेत,’ अशी टीका माजी आमदार व राष्ट्रवादी काँॅगे्रस किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांसाठी राज्यव्यापी अभियान आयोजित ...

ठळक मुद्दे ; शेतकºयाला देशोधडीला लावण्याचा मोदी सरकारचा डाव शेतकºयांना देशोधडीला लावण्याचा डाव भाजप सरकारने आखला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘राजू शेट्टी काय किंवा सदाभाऊ खोत, या दोघांच्याही छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला मी लावला. ही आमचीच लेकरे असली तरी ती धंदेवाईकपणे वागू लागली आहेत,’ अशी टीका माजी आमदार व राष्ट्रवादी काँॅगे्रस किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.

शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांसाठी राज्यव्यापी अभियान आयोजित केली आहे. या अभियानासाठी साताºयात आलेल्या धोंडगे यांनी सरकारच्या धोरणावरही चौफेर टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शेतकरी संघटनेचे शंकर गोडसे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, श्रीनिवास शिंदे यांची उपस्थिती होती.‘भारत हा देश कृषीवर अवलंबून आहे. मात्र हेच क्षेत्र सध्या अडचणीत आहे. शेतकºयांना देशोधडीला लावण्याचा डाव भाजप सरकारने आखला आहे. या सरकारने बाहेरच्या देशामध्ये जमीन भाड्याने घेऊन तिथला माल भारतात आणला जात आहे. मागणी नसतानाही मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आयात केली जात आहे. मात्र, शेतकºयांना हमीभाव देण्यास टाळाटाळ केली जाते.

आमचे दोन कार्यकर्ते शेतकºयांनी निवडून दिले. मात्र, त्यांनीच धंदेवाईक राजकारण सुरू केले. तुमचे भांडण दीड जिल्ह्यापुरते आहे. आख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही वेठीस का धरत आहात? शेतकरी धर्मसंकटात आहे. त्याला दिलासा देण्यासाठी त्यागाची भूमिका घ्या,’ असा सल्ला धोंडगे यांनी यावेळी दिला.‘देश आणि राज्याच्या सर्वोच्च स्थानी असणारे पंतप्रधान व मुख्यमंत्री हे दोघेही सपशेल खोटे बोलत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात १ लाख टीएमसी पाणी जलयुक्तच्या माध्यमातून साठवले. त्यांना टीएमसी आणि क्युसेक यातील फरक तरी कळतो का? माधव भंडारी, जेटली, दानवे, धोत्रे ही मंडळी वारंवार शेतकरी विरोधात भूमिका मांडताना दिसत आहेत. देशात फॉर्मर इन्कम सिक्युरिटी कायदा लागू करावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जातआहे.केंद्र सरकारने केनियासह इतर जिल्ह्यांत जमीन भाड्याने घेऊन पिके लावली आहेत. भविष्यात देशातील शेतकरी देशोधडीला लावून कार्पोरेट फार्मिंग आणण्याचा डाव स्पष्ट होत असल्याची टीकाही धोंडगे यांनी केली.मोदी फकीर...पर हम तो बालबच्चेवालेमोदी त्यांच्या भाषणात नेहमी मै फकीर...असं म्हणत असतात. मोदीजी हम तो बालबच्चेवाले है...अशी उपरोधिक टीका शंकर धोंडगे यांनी यावेळी केली.