शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या संघटनेचे नेते धंदेवाईक निघाले--शंकर धोंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘राजू शेट्टी काय किंवा सदाभाऊ खोत, या दोघांच्याही छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला मी लावला. ही आमचीच लेकरे असली तरी ती धंदेवाईकपणे वागू लागली आहेत,’ अशी टीका माजी आमदार व राष्ट्रवादी काँॅगे्रस किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांसाठी राज्यव्यापी अभियान आयोजित ...

ठळक मुद्दे ; शेतकºयाला देशोधडीला लावण्याचा मोदी सरकारचा डाव शेतकºयांना देशोधडीला लावण्याचा डाव भाजप सरकारने आखला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘राजू शेट्टी काय किंवा सदाभाऊ खोत, या दोघांच्याही छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला मी लावला. ही आमचीच लेकरे असली तरी ती धंदेवाईकपणे वागू लागली आहेत,’ अशी टीका माजी आमदार व राष्ट्रवादी काँॅगे्रस किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.

शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांसाठी राज्यव्यापी अभियान आयोजित केली आहे. या अभियानासाठी साताºयात आलेल्या धोंडगे यांनी सरकारच्या धोरणावरही चौफेर टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शेतकरी संघटनेचे शंकर गोडसे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, श्रीनिवास शिंदे यांची उपस्थिती होती.‘भारत हा देश कृषीवर अवलंबून आहे. मात्र हेच क्षेत्र सध्या अडचणीत आहे. शेतकºयांना देशोधडीला लावण्याचा डाव भाजप सरकारने आखला आहे. या सरकारने बाहेरच्या देशामध्ये जमीन भाड्याने घेऊन तिथला माल भारतात आणला जात आहे. मागणी नसतानाही मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आयात केली जात आहे. मात्र, शेतकºयांना हमीभाव देण्यास टाळाटाळ केली जाते.

आमचे दोन कार्यकर्ते शेतकºयांनी निवडून दिले. मात्र, त्यांनीच धंदेवाईक राजकारण सुरू केले. तुमचे भांडण दीड जिल्ह्यापुरते आहे. आख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही वेठीस का धरत आहात? शेतकरी धर्मसंकटात आहे. त्याला दिलासा देण्यासाठी त्यागाची भूमिका घ्या,’ असा सल्ला धोंडगे यांनी यावेळी दिला.‘देश आणि राज्याच्या सर्वोच्च स्थानी असणारे पंतप्रधान व मुख्यमंत्री हे दोघेही सपशेल खोटे बोलत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात १ लाख टीएमसी पाणी जलयुक्तच्या माध्यमातून साठवले. त्यांना टीएमसी आणि क्युसेक यातील फरक तरी कळतो का? माधव भंडारी, जेटली, दानवे, धोत्रे ही मंडळी वारंवार शेतकरी विरोधात भूमिका मांडताना दिसत आहेत. देशात फॉर्मर इन्कम सिक्युरिटी कायदा लागू करावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जातआहे.केंद्र सरकारने केनियासह इतर जिल्ह्यांत जमीन भाड्याने घेऊन पिके लावली आहेत. भविष्यात देशातील शेतकरी देशोधडीला लावून कार्पोरेट फार्मिंग आणण्याचा डाव स्पष्ट होत असल्याची टीकाही धोंडगे यांनी केली.मोदी फकीर...पर हम तो बालबच्चेवालेमोदी त्यांच्या भाषणात नेहमी मै फकीर...असं म्हणत असतात. मोदीजी हम तो बालबच्चेवाले है...अशी उपरोधिक टीका शंकर धोंडगे यांनी यावेळी केली.