शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नेते प्रचाराच्या गर्दीत; जनता समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: April 2, 2016 00:17 IST

नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी : पाणी, अंतर्गत रस्ते अन् गटारांचाच प्रश्न; मातब्बरांच्या प्रभागातील स्थिती --लोणंदचं रणकंदन

राहिद सय्यद -- लोणंद --लोणंद नगरंपचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रचारामध्ये मोठी रंगत आली आहे. असे असतानाच मातब्बर नेत्यांच्याच प्रभागामध्येच मात्र समस्या जैसे थे आहेत. नेते प्रचारात दंग असताना जनता मात्र समस्यांचा सामना करताना दिसत आहे. लोणंद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले आहे. त्यानंतर प्रथमच नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. मात्र हे होत असताना येथील प्रभागांना विविध समस्यांनी ग्रासल्याचे दिसून येत आहे. येथील प्रभाग १५, १६, १७ हे पूर्वी ग्रामपंचायतचा वॉर्ड ६ होता. आता त्याचे तीन प्रभाग झाले आहेत. प्रभाग १५ हा शिवाजी चौक दक्षिण भाग परिसर आहे. येथील आरक्षण सर्वसाधारण महिला वर्गासाठी असून येथील मतदारसंख्या ५८० इतकी आहे. येथे प्रामुख्याने पिण्याचे पाणी, गटारे, अंतर्गत रस्ते अशा अनेक समस्या दिसून येत आहेत. येथील काही ठिकाणच्या सार्वजनिक स्वच्छतालयात पाण्याची सोय नाही. तसेच अंतर्गत रस्त्याचा अभाव आहे. प्रभाग १६ हा सईबाई हौसिंग सोसायटी, सातारारोड पूर्वभाग परिसर आहे. सोसायटीच्या उत्तर भागाकडे लोणंद गावातील गटाराचे सांडपाणी सोडल्याने सोसायटीत या सांडपाण्यामुळे दुर्गंधी, डास, घाणीचे साम्राज्य दिसून येते. येथील आरक्षण सर्वसाधारण असून, मतदार संख्या ५२४ इतकी आहे. तसेच येथील सोसायटीत येण्या-जाण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडून जावे लागत आहे. सोसायटीच्या मार्गावर भुयारी मार्ग झाला पाहिजे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, चिल्ड्रन पार्क आणि व्यायाम शाळेची मोठी गरज आहे.प्रभाग १७ हा लोणंद नगरपंचायतीचा सर्वात मोठा ३ किलोमीटर अंतराचा प्रभाग आहे. हा खोतमळा, फुलेनगर, सावित्रीबाई नगर, ठोंबरे मळा, कुरणवस्ती अशा परिसराचा प्रभाग आहे. येथे सर्वसाधारण महिला आरक्षण असून, मतदार संख्या ८८० आहे. हा प्रभाग चार वाड्या-वस्त्यांवर विभागला आहे. कायमच दुर्लक्षित राहिलेला हा प्रभाग आहे. या वाड्या-वस्त्यांवर कोणतीही सुविधा आत्तापर्यंत पोहोचविली गेली नाही. त्यामुळे तेथील सार्वजनिक स्वच्छतालय, गटार, कचराकुंडी, मुतारी असे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला उघड्या स्वरूपात असलेल्या गटारातून सांडपाणी सोडले जात आहे. उघड्या गटारातून जाणारे सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरवित आहे. त्यामुळे तेथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल लावावा लागतो. बंदिस्त गटाराचे नियोजन होण्याची आवश्यकता आहे. प्रभाग १५ मध्ये अंतर्गत रस्ते व गटारे, कचराकुंडी नसल्याने नागरिकांना कचरा रस्त्यात टाकावा लागत आहे. त्यामुळे गटारे तुंबून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रोगराई पसरत आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.- नानासो जाधव, प्रभाग १५लोणंदमधील सईबाई सोसायटीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि लहान मुलांसाठी गार्डन झाले पाहिजे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थानाची व्यवस्था झाली होण्याची गरज आहे. तसेच बंदिस्त गटारे योजना राबवावी.- दत्तात्रय कचरे, प्रभाग १६गावातून मळ्याकडे येताना रेल्वेलाईन क्रॉस करून यावे लागते. तेथे भुयारी मार्ग होण्याची अत्यंत गरज आहे. जांभळीचा मळा, खोत मळा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. आमच्याकडून दिवाबत्ती कर, घरपट्टी घेतली जाते. परंतु आम्हाला ग्रामपंचायतीने आजपर्यंत कोणत्याही सोयीसुविधा पुरविल्या नाहीत.- मंगेश क्षीरसागर, प्रभाग १७