शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

गावोगावी राजकीय डावपेचांची आखणी

By admin | Updated: April 15, 2015 23:57 IST

कातरखटाव गटात राजकीय वारे : निवडणुका लांबल्यामुळे गावपुढाऱ्यांना दिलासा

कातरखटाव : कातरखटाव व परिसरातील कोणतीही प्राथमिक तयारी नसताना ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख तोंडावर येऊन आदळल्याने गांगरून गेलेल्या गाव कारभाऱ्यांना निवडणुका पुढे गेल्यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उर्वरीत काळात डावपेच आखून निवडणुकीची जोरदार तयारी करण्याचे बेत गावोगावचे गावकारभारी आखत आहेत. जून-जुलैमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे रणागंण आतापासून तापवायला सुरुवात झाली आहे. कातरखटाव गटातील कातरखटावसह, बोंबाळे, दाळमोडी, एनकूळ, कणसेवाडी, मानेवाडी, तुपेवाडी, येरळवाडी, डाभेंवाडी या सर्व ग्रामपंयतींच्या निवडणुका अपेक्षित आहेत. अशा परिस्थितीत अद्याप सरपंचपदाचे आरक्षण निघाले नव्हते. गाव कारभारी सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष देऊन होते.अशातच पंधरा दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला झाला आहे. या पार्श्वभूमीवर गाफील असलेले गाव कारभारी अक्षरश: गांगरून गेले होते. अजून प्रभागाच्या मतदार याद्या हाताशी नाहीत, उमेदवाराचा पत्ता नाही, आघाडी-बिघाडीची बोलणी नाही, कसलीही प्राथमिक स्वरूपाची तयारी नाही. संभाव्य उमेदवाराचे दाखले, सरकारी देणी, विविध संस्थांकडील दाखले नाहीत आणि अशातच सर्व जागांवर योग्य उमेदवार देऊन ते निवडून आणण्याचे दिव्यसंकट समोर उभे राहिले होते.आता निवडणुका नजरेच्या अचूक टप्प्यापर्यंत दूर गेल्यामुळे गावकारभाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायतीच्या सत्तेपर्यंत उडी मारण्यासाठी आता गावकारभाऱ्यांना मागे सरण्यासाठी मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा फड चांगलाच रंगणार, हे आताच स्पष्ट दिसून येत आहे. (वार्ताहर)पुढाऱ्यांची प्रत्येक कार्यक्रमाला हजेरीकुणाला राम राम, कुणाला सलाम, कुणाला जयभीम, तर कुणाला जय महाराष्ट्र, असे नमस्काराचे वेगवेगळे प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत. लग्न, सोळावा, मुंज, देवदेव, कोणी आजारी पडले तर त्या ठिकाणी हजेरी, आर्थिक सहकार्याची तयारी, असे वेगवेगळे प्रयोग करून मतदार आपल्या बाजूने कसा वळवता येईल, त्या दृष्टीने पुढाऱ्यांचे प्रयत्न चालू झाले आहेत. कातरखटाव गटात गावपुढारी उदंडकातरखटाव गटात राजकीय विचार केला तर ‘‘लेकुरे उदंड झाली, या नाटकाप्रमाणे ‘ढिगभर नेते आहेत. ऐन उन्हाळ्यात निवडणुका लागल्यामुळे पाणीप्रश्न चांगलाच पेटणार आहे. गावपातळीवर होणाऱ्या निवडणुकामध्ये आमदार जयकुमार गोरे गट, शेखर गोरे गट, आमदार प्रभाकर घार्गे गट, सर्व पक्षांचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत हे नक्की.