शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

गावोगावी राजकीय डावपेचांची आखणी

By admin | Updated: April 15, 2015 23:57 IST

कातरखटाव गटात राजकीय वारे : निवडणुका लांबल्यामुळे गावपुढाऱ्यांना दिलासा

कातरखटाव : कातरखटाव व परिसरातील कोणतीही प्राथमिक तयारी नसताना ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख तोंडावर येऊन आदळल्याने गांगरून गेलेल्या गाव कारभाऱ्यांना निवडणुका पुढे गेल्यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उर्वरीत काळात डावपेच आखून निवडणुकीची जोरदार तयारी करण्याचे बेत गावोगावचे गावकारभारी आखत आहेत. जून-जुलैमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे रणागंण आतापासून तापवायला सुरुवात झाली आहे. कातरखटाव गटातील कातरखटावसह, बोंबाळे, दाळमोडी, एनकूळ, कणसेवाडी, मानेवाडी, तुपेवाडी, येरळवाडी, डाभेंवाडी या सर्व ग्रामपंयतींच्या निवडणुका अपेक्षित आहेत. अशा परिस्थितीत अद्याप सरपंचपदाचे आरक्षण निघाले नव्हते. गाव कारभारी सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष देऊन होते.अशातच पंधरा दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला झाला आहे. या पार्श्वभूमीवर गाफील असलेले गाव कारभारी अक्षरश: गांगरून गेले होते. अजून प्रभागाच्या मतदार याद्या हाताशी नाहीत, उमेदवाराचा पत्ता नाही, आघाडी-बिघाडीची बोलणी नाही, कसलीही प्राथमिक स्वरूपाची तयारी नाही. संभाव्य उमेदवाराचे दाखले, सरकारी देणी, विविध संस्थांकडील दाखले नाहीत आणि अशातच सर्व जागांवर योग्य उमेदवार देऊन ते निवडून आणण्याचे दिव्यसंकट समोर उभे राहिले होते.आता निवडणुका नजरेच्या अचूक टप्प्यापर्यंत दूर गेल्यामुळे गावकारभाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायतीच्या सत्तेपर्यंत उडी मारण्यासाठी आता गावकारभाऱ्यांना मागे सरण्यासाठी मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा फड चांगलाच रंगणार, हे आताच स्पष्ट दिसून येत आहे. (वार्ताहर)पुढाऱ्यांची प्रत्येक कार्यक्रमाला हजेरीकुणाला राम राम, कुणाला सलाम, कुणाला जयभीम, तर कुणाला जय महाराष्ट्र, असे नमस्काराचे वेगवेगळे प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत. लग्न, सोळावा, मुंज, देवदेव, कोणी आजारी पडले तर त्या ठिकाणी हजेरी, आर्थिक सहकार्याची तयारी, असे वेगवेगळे प्रयोग करून मतदार आपल्या बाजूने कसा वळवता येईल, त्या दृष्टीने पुढाऱ्यांचे प्रयत्न चालू झाले आहेत. कातरखटाव गटात गावपुढारी उदंडकातरखटाव गटात राजकीय विचार केला तर ‘‘लेकुरे उदंड झाली, या नाटकाप्रमाणे ‘ढिगभर नेते आहेत. ऐन उन्हाळ्यात निवडणुका लागल्यामुळे पाणीप्रश्न चांगलाच पेटणार आहे. गावपातळीवर होणाऱ्या निवडणुकामध्ये आमदार जयकुमार गोरे गट, शेखर गोरे गट, आमदार प्रभाकर घार्गे गट, सर्व पक्षांचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत हे नक्की.