शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

गावोगावी राजकीय डावपेचांची आखणी

By admin | Updated: April 15, 2015 23:57 IST

कातरखटाव गटात राजकीय वारे : निवडणुका लांबल्यामुळे गावपुढाऱ्यांना दिलासा

कातरखटाव : कातरखटाव व परिसरातील कोणतीही प्राथमिक तयारी नसताना ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख तोंडावर येऊन आदळल्याने गांगरून गेलेल्या गाव कारभाऱ्यांना निवडणुका पुढे गेल्यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उर्वरीत काळात डावपेच आखून निवडणुकीची जोरदार तयारी करण्याचे बेत गावोगावचे गावकारभारी आखत आहेत. जून-जुलैमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे रणागंण आतापासून तापवायला सुरुवात झाली आहे. कातरखटाव गटातील कातरखटावसह, बोंबाळे, दाळमोडी, एनकूळ, कणसेवाडी, मानेवाडी, तुपेवाडी, येरळवाडी, डाभेंवाडी या सर्व ग्रामपंयतींच्या निवडणुका अपेक्षित आहेत. अशा परिस्थितीत अद्याप सरपंचपदाचे आरक्षण निघाले नव्हते. गाव कारभारी सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष देऊन होते.अशातच पंधरा दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला झाला आहे. या पार्श्वभूमीवर गाफील असलेले गाव कारभारी अक्षरश: गांगरून गेले होते. अजून प्रभागाच्या मतदार याद्या हाताशी नाहीत, उमेदवाराचा पत्ता नाही, आघाडी-बिघाडीची बोलणी नाही, कसलीही प्राथमिक स्वरूपाची तयारी नाही. संभाव्य उमेदवाराचे दाखले, सरकारी देणी, विविध संस्थांकडील दाखले नाहीत आणि अशातच सर्व जागांवर योग्य उमेदवार देऊन ते निवडून आणण्याचे दिव्यसंकट समोर उभे राहिले होते.आता निवडणुका नजरेच्या अचूक टप्प्यापर्यंत दूर गेल्यामुळे गावकारभाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायतीच्या सत्तेपर्यंत उडी मारण्यासाठी आता गावकारभाऱ्यांना मागे सरण्यासाठी मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा फड चांगलाच रंगणार, हे आताच स्पष्ट दिसून येत आहे. (वार्ताहर)पुढाऱ्यांची प्रत्येक कार्यक्रमाला हजेरीकुणाला राम राम, कुणाला सलाम, कुणाला जयभीम, तर कुणाला जय महाराष्ट्र, असे नमस्काराचे वेगवेगळे प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत. लग्न, सोळावा, मुंज, देवदेव, कोणी आजारी पडले तर त्या ठिकाणी हजेरी, आर्थिक सहकार्याची तयारी, असे वेगवेगळे प्रयोग करून मतदार आपल्या बाजूने कसा वळवता येईल, त्या दृष्टीने पुढाऱ्यांचे प्रयत्न चालू झाले आहेत. कातरखटाव गटात गावपुढारी उदंडकातरखटाव गटात राजकीय विचार केला तर ‘‘लेकुरे उदंड झाली, या नाटकाप्रमाणे ‘ढिगभर नेते आहेत. ऐन उन्हाळ्यात निवडणुका लागल्यामुळे पाणीप्रश्न चांगलाच पेटणार आहे. गावपातळीवर होणाऱ्या निवडणुकामध्ये आमदार जयकुमार गोरे गट, शेखर गोरे गट, आमदार प्रभाकर घार्गे गट, सर्व पक्षांचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत हे नक्की.