शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गेल्या वर्षी ६८ टँकर.. ..यंदा मात्र केवळ आठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:58 IST

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उन्हाळ्याची चाहूल लागताच दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात टँकरची मागणी होत होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये जिल्ह्यात तब्बल ६८ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.मात्र, यंदा ही परिस्थिती बदलली असून, जिल्ह्यात केवळ आठ ठिकाणी टँकर सुरू करण्यात आले आहेत. गत तीन वर्षांपेक्षा टंचाईची तीव्रता ...

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उन्हाळ्याची चाहूल लागताच दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात टँकरची मागणी होत होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये जिल्ह्यात तब्बल ६८ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.मात्र, यंदा ही परिस्थिती बदलली असून, जिल्ह्यात केवळ आठ ठिकाणी टँकर सुरू करण्यात आले आहेत. गत तीन वर्षांपेक्षा टंचाईची तीव्रता अत्यंत कमी झाली असून, जलयुक्त शिवार आणि पुरेसा पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याचा हा परिणाम असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात दरवर्षी नागरिकांना भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत होते. एवढेच नव्हे तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून टँकरची मागणी होत होती. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे दीडशेहून अधिक मागणी अर्ज येत होते. विशेषत: माण, खटाव, खंडाळा आणि कोरेगाव तालुका दुष्काळ प्रवणक्षेत्र म्हणून ओळखले जात होते. मात्र, याच तालुक्यांनी केवळ एका वर्षात आपली दुष्काळाची ओळख पुसट करून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही ठरला.जलयुक्त शिवार योजना आणि वॉटर कप स्पर्धेत या दुष्काळी पट्ट्यातील गावांनी हिरिरीने सहभाग घेतला. गावच्या आजूबाजूने बंधारे बांधून पाणी अडविले. त्यामुळे साहजिकच पाणीसाठ्यात वाढ झाली. परिणामी गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी संपला असला तरी गावकऱ्यांची मेहनत आणि जिद्द दुष्काळी भाग म्हणूनअसलेली ओळख पुसण्यास कारणीभूत ठरली.ऐन एप्रिल महिन्यातही यंदा कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यामध्ये अद्यापही टँकरची मागणी झाली नाही. मात्र, खटाव आणि माण तालुक्यामध्ये मागणी होऊ लागली आहे.खटाव तालुक्यातील आवळेपठार (गारवडी) येथे तीन दिवसांतून एकदा एका टँकरने पाणीपुरवठा करण्यातयेत आहे. माण तालुक्यामधील सात गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आले. विरळी, पुकळेवाडी, पाचवड, वारूगड, मोगराळे, कुकुडवाड, जाधववाडी या गावांचा त्यामध्ये समावेश आहे.एप्रिल महिना संपत आला तरी जिल्ह्यात केवळ आठ टँकर सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरठवा विभागातर्फे अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याची कामेही करण्यात आली आहेत. तसेच गेल्या वर्षी पावसाचे प्रमाणही चांगलेहोते. त्यामुळे साहजिकच पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे दृष्काळाच्या झळा नागरिकांना यंदा कमी सोसायला लागतायंत.पाच वर्षांपूर्वी म्हणे दोनशे टँकर...माण आणि खटाव तालुक्यांची गेल्या पाच वर्षांपूर्वी भीषण परिस्थिती होती. प्रचंड दुष्काळ आणि पाण्याची टंचाई यामुळे नागरिक अक्षरश: हैराण होत होते. या दोन तालुक्यांत म्हणे त्यावेळी दोनशेहून अधिक टँकर सुरू होते. मात्र, कालांतराने या तालुक्यांमध्ये बदल होत गेला. जिल्ह्यातील इतर नऊ तालुक्यांमध्ये पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे नागरिकांनी कधी टँकरची मागणी केली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व लक्ष माण, खटाव या दोन तालुक्यांत केंद्रीत केले होते.