शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांची ही शेवटची पाणीटंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : संचारबंदी व मजुरांची कमतरता अशा अडचणीतून मार्गक्रमण करत तब्बल सहा महिन्यांनंतर कास धरणाचे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : संचारबंदी व मजुरांची कमतरता अशा अडचणीतून मार्गक्रमण करत तब्बल सहा महिन्यांनंतर कास धरणाचे काम शुक्रवारी थांबले. पावसाळ्यानंतर उर्वरित कामे मार्गी लावून पुढील वर्षी धरणात जलसंचय करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. असे झाल्यास सातारकरांची ही शेवटची पाणीटंचाई असणार आहे.

केंद्र शासनाच्या सुजल निर्मल योजनेंतर्गत कास धरणासाठी ४२ कोटी ८९ लाख इतक्या रकमेला मार्च २०११ मध्ये राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. कामाचा वाढता कालावधी तसेच नवीन रस्ता, जमिनीचे संपादन यासह इतर कामे वाढल्याने हा प्रकल्प तब्बल ११३ कोटींवर पोहोचला होता; परंतु शासनाने धरणातून इतर कामांना वगळले असून, धरणाच्या नवीन ९५ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

गतवर्षी निधीचा अडसर निर्माण झाल्याने धरणाचे काम उशिरा सुरू झाले. फेब्रुवारी ते मार्च २०२० या कालावधीत जवळपास दीड महिनाच काम सुरू होते. यानंतर कोरोनामुळे या कामाला ब्रेक लागला. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने धरणाचे काम पुन्हा गतीने सुरू झाले. डिसेंबर २०२० ते २५ मे २०२१ असे एकूण सहा महिने धरणाचे काम चालले. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागल्याने परराज्यातील कर्मचारी घराकडे परतले व जलसंपदा विभागाला मजुरांची कमतरता भासू लागली. याशिवाय पावसाळादेखील तोंडावर आला आहे. त्यामुळे २५ मेपासून धरणाचे काम पूर्णतः थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस धरणाच्या उर्वरित कामास जलसंपदा विभागाकडून प्रारंभ केला जाणार आहे. धरणाचे काम मार्गी लागल्यानंतर आज उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यात तब्बल पाचपटीने वाढ होणार आहे. धरणात पुढच्या वर्षी पाणीसाठा झाल्यास सातारकरांचा पाणीप्रश्न हा कायमचा मार्गी लागणार आहे.

(चौकट)

यंदा झालेली कामे

शासनाकडून वेळेत निधी न मिळाल्याने धरणाचे काम गतवर्षी दीड ते दोन महिनेच चालले. यानंतर मात्र कामाने गती घेतली. यंदाच्या वर्षी मुख्य सांडव्याची खुदाई, सांडव्याचे संधानक (कॉंक्रीटीकरण) तसेच त्याच्या दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले. याशिवाय मुख्य विहिरीचे पाणी सोडण्याचे सेवा द्वार व आपत्कालीन द्वार याचेदेखील काम पूर्ण झाले आहे.

(चौकट)

पुढील टप्प्यात होणारी कामे

जलसंपदा विभागाने पावसाळा संपल्यानंतर धरणाचे उर्वरित काम हाती घेण्याचे नियोजन केले आहे. काम सुरू झाल्यानंतर जुन्या सांडव्यामधील घळभरणी केली जाणार आहे. घळभरणीचे माती काम एक लाख घनमीटर इतके आहे, तर सांडवा व पुच्छ कालव्याच्या संधानकाचे काम केले जाणार असून, एकूण काम दहा हजार घनमीटर इतके आहे.

(चौकट)

पुलाचे कामही थांबणार

कास धरणाजवळील सातारा-बामणोली मार्गावरील पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. हे कामदेखील सध्या प्रगतिपथावर आहे. मान्सूनची परिस्थिती पाहता येत्या आठ दिवसात हे कामदेखील काही कालावधीसाठी बंद ठेवले जाणार आहे.

(पॉइंटर)

- जुन्या धरणाची उंची १७.१९ मीटर

- होणारी वाढ १२.४२ मीटर

- नव्या धरणाची उंची २९.६१ मीटर

- जुन्या धरणाची लांबी २१८.८५ मीटर

- नवीन धरणाची लांबी ५८०.५० मीटर

- धरणाचा सध्याचा पाणीसाठा १०७ दशलक्ष घनफूट

- नवीन धरणाचा पाणीसाठा ५०० दशलक्ष घनफूट

फोटो : मेल