शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांची ही शेवटची पाणीटंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : संचारबंदी व मजुरांची कमतरता अशा अडचणीतून मार्गक्रमण करत तब्बल सहा महिन्यांनंतर कास धरणाचे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : संचारबंदी व मजुरांची कमतरता अशा अडचणीतून मार्गक्रमण करत तब्बल सहा महिन्यांनंतर कास धरणाचे काम शुक्रवारी थांबले. पावसाळ्यानंतर उर्वरित कामे मार्गी लावून पुढील वर्षी धरणात जलसंचय करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. असे झाल्यास सातारकरांची ही शेवटची पाणीटंचाई असणार आहे.

केंद्र शासनाच्या सुजल निर्मल योजनेंतर्गत कास धरणासाठी ४२ कोटी ८९ लाख इतक्या रकमेला मार्च २०११ मध्ये राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. कामाचा वाढता कालावधी तसेच नवीन रस्ता, जमिनीचे संपादन यासह इतर कामे वाढल्याने हा प्रकल्प तब्बल ११३ कोटींवर पोहोचला होता; परंतु शासनाने धरणातून इतर कामांना वगळले असून, धरणाच्या नवीन ९५ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

गतवर्षी निधीचा अडसर निर्माण झाल्याने धरणाचे काम उशिरा सुरू झाले. फेब्रुवारी ते मार्च २०२० या कालावधीत जवळपास दीड महिनाच काम सुरू होते. यानंतर कोरोनामुळे या कामाला ब्रेक लागला. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने धरणाचे काम पुन्हा गतीने सुरू झाले. डिसेंबर २०२० ते २५ मे २०२१ असे एकूण सहा महिने धरणाचे काम चालले. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागल्याने परराज्यातील कर्मचारी घराकडे परतले व जलसंपदा विभागाला मजुरांची कमतरता भासू लागली. याशिवाय पावसाळादेखील तोंडावर आला आहे. त्यामुळे २५ मेपासून धरणाचे काम पूर्णतः थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस धरणाच्या उर्वरित कामास जलसंपदा विभागाकडून प्रारंभ केला जाणार आहे. धरणाचे काम मार्गी लागल्यानंतर आज उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यात तब्बल पाचपटीने वाढ होणार आहे. धरणात पुढच्या वर्षी पाणीसाठा झाल्यास सातारकरांचा पाणीप्रश्न हा कायमचा मार्गी लागणार आहे.

(चौकट)

यंदा झालेली कामे

शासनाकडून वेळेत निधी न मिळाल्याने धरणाचे काम गतवर्षी दीड ते दोन महिनेच चालले. यानंतर मात्र कामाने गती घेतली. यंदाच्या वर्षी मुख्य सांडव्याची खुदाई, सांडव्याचे संधानक (कॉंक्रीटीकरण) तसेच त्याच्या दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले. याशिवाय मुख्य विहिरीचे पाणी सोडण्याचे सेवा द्वार व आपत्कालीन द्वार याचेदेखील काम पूर्ण झाले आहे.

(चौकट)

पुढील टप्प्यात होणारी कामे

जलसंपदा विभागाने पावसाळा संपल्यानंतर धरणाचे उर्वरित काम हाती घेण्याचे नियोजन केले आहे. काम सुरू झाल्यानंतर जुन्या सांडव्यामधील घळभरणी केली जाणार आहे. घळभरणीचे माती काम एक लाख घनमीटर इतके आहे, तर सांडवा व पुच्छ कालव्याच्या संधानकाचे काम केले जाणार असून, एकूण काम दहा हजार घनमीटर इतके आहे.

(चौकट)

पुलाचे कामही थांबणार

कास धरणाजवळील सातारा-बामणोली मार्गावरील पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. हे कामदेखील सध्या प्रगतिपथावर आहे. मान्सूनची परिस्थिती पाहता येत्या आठ दिवसात हे कामदेखील काही कालावधीसाठी बंद ठेवले जाणार आहे.

(पॉइंटर)

- जुन्या धरणाची उंची १७.१९ मीटर

- होणारी वाढ १२.४२ मीटर

- नव्या धरणाची उंची २९.६१ मीटर

- जुन्या धरणाची लांबी २१८.८५ मीटर

- नवीन धरणाची लांबी ५८०.५० मीटर

- धरणाचा सध्याचा पाणीसाठा १०७ दशलक्ष घनफूट

- नवीन धरणाचा पाणीसाठा ५०० दशलक्ष घनफूट

फोटो : मेल