शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शेवटच्या षटकांत फटकेबाजी

By admin | Updated: December 19, 2014 00:25 IST

अनेकांची दिवाळी कडू--खासदार अनू आगा यांनी सातारा तालुक्यातील शिवथर हे गाव दत्तक घेतले आहे.

जगदीश कोष्टी- सातारा  लोकसभा, विधानसभा निवडणुका याच वर्षी झाल्या. त्यामुळे सुमारे नव्वद दिवसांची आचारसंहिता यावर्षी लागल्याने विकासकामे करताना जिल्हा परिषदेसमोर तांत्रिक अडचणी आल्या. मात्र, ‘संसद ग्राम’ योजनेअंतर्गत तब्बल तीन खासदारांनी जिल्ह्यातील गावे दत्तक घेतल्याने शेवटच्या काही षटकांमध्ये विकासकामांची फटकेबाजी करण्याची वेळ सातारा जिल्हा परिषदेवर आली आहे.‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. सातारा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)पदी टी. आर. गारळे असताना निर्मल ग्राम योजनेत राज्यात डंका पिटवला होता. राज्यातील अनेक गावांनी या योजनेत स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन नव-नवे उपक्रम राबवित राज्यात बक्षिसे मिळविली होती. त्याकाळी जिल्हा परिषदेने स्थापन केलेले ‘गुड मॉर्निंग’ पथक गावात गेल्याबरोबर अनेकांची पळापळ होत होती. या पथकाची अनेकांनी धास्तीच घेतली होती. गेल्या काही वर्षांपासून मात्र या योजनेला खीळ बसल्याचे जाणवत होते. त्यानंतर केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील वीस टक्के गावांमध्ये अध्यापही स्वच्छतागृहे नसल्याचे समोर आले आहे. याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येकाला एक-एक गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अधिकारीही कामाला लागले आहेत. याच वर्षभरात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध समित्यांच्या सभापतींच्या निवडी झाल्या. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवरून बरेच मानापमान तसेच राजकीय खेळी झाल्याचे सातारकरांना पाहायला मिळाले. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तसेच आपल्याला सहकार्य करणारा जिल्हा परिषद गटांच्या बाबतीत बेरीज-वजाबाकीची गणितं करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवडी पार पाडल्या. त्यातूनच माणिकराव सोनवलकर यांच्या गळ्यात अध्यक्ष तर रवींद्र साळुंखे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली.सातारा जिल्हा परिषदेने या वर्षभरात अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम राबविल्याने सर्वत्र बोलबाला होता आहे. ‘निर्मल ग्राम’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नऊ कुटुंबे दत्तक घेतली आहेत.अनेकांची दिवाळी कडूजिल्हा परिषदेतील कामात सुसूत्रता यावी, प्रशासकीय अडचणी कमी व्हाव्यात म्हणून संगणकीकरण वाढले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आॅनलाईन खात्यात जमा होत आहेत. मात्र, आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांवर दिवाळी कडू साजरी करण्याची वेळ आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्य करत असलेल्या ९१ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांत एक रुपयाही मानधन मिळाले नाही. तसेच कुष्टरोग नियंत्रण पथकातील कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांचे पगार वेळेत झाले नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली होती.उदयनराजे भोसले हे सातारचे खासदार आहेत. त्यांनी संसद ग्राम योजनेअंतर्गत सातारा तालुक्यातील कोंडवे गाव दत्तक घेतले. त्यांच्याबरोबर खासदार शरद पवार यांनी खटाव तालुक्यातील ऐनकूळ तर खासदार अनू आगा यांनी सातारा तालुक्यातील शिवथर हे गाव दत्तक घेतले आहे.