शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

शेवटच्या षटकांत फटकेबाजी

By admin | Updated: December 19, 2014 00:25 IST

अनेकांची दिवाळी कडू--खासदार अनू आगा यांनी सातारा तालुक्यातील शिवथर हे गाव दत्तक घेतले आहे.

जगदीश कोष्टी- सातारा  लोकसभा, विधानसभा निवडणुका याच वर्षी झाल्या. त्यामुळे सुमारे नव्वद दिवसांची आचारसंहिता यावर्षी लागल्याने विकासकामे करताना जिल्हा परिषदेसमोर तांत्रिक अडचणी आल्या. मात्र, ‘संसद ग्राम’ योजनेअंतर्गत तब्बल तीन खासदारांनी जिल्ह्यातील गावे दत्तक घेतल्याने शेवटच्या काही षटकांमध्ये विकासकामांची फटकेबाजी करण्याची वेळ सातारा जिल्हा परिषदेवर आली आहे.‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. सातारा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)पदी टी. आर. गारळे असताना निर्मल ग्राम योजनेत राज्यात डंका पिटवला होता. राज्यातील अनेक गावांनी या योजनेत स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन नव-नवे उपक्रम राबवित राज्यात बक्षिसे मिळविली होती. त्याकाळी जिल्हा परिषदेने स्थापन केलेले ‘गुड मॉर्निंग’ पथक गावात गेल्याबरोबर अनेकांची पळापळ होत होती. या पथकाची अनेकांनी धास्तीच घेतली होती. गेल्या काही वर्षांपासून मात्र या योजनेला खीळ बसल्याचे जाणवत होते. त्यानंतर केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील वीस टक्के गावांमध्ये अध्यापही स्वच्छतागृहे नसल्याचे समोर आले आहे. याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येकाला एक-एक गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अधिकारीही कामाला लागले आहेत. याच वर्षभरात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध समित्यांच्या सभापतींच्या निवडी झाल्या. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवरून बरेच मानापमान तसेच राजकीय खेळी झाल्याचे सातारकरांना पाहायला मिळाले. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तसेच आपल्याला सहकार्य करणारा जिल्हा परिषद गटांच्या बाबतीत बेरीज-वजाबाकीची गणितं करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवडी पार पाडल्या. त्यातूनच माणिकराव सोनवलकर यांच्या गळ्यात अध्यक्ष तर रवींद्र साळुंखे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली.सातारा जिल्हा परिषदेने या वर्षभरात अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम राबविल्याने सर्वत्र बोलबाला होता आहे. ‘निर्मल ग्राम’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नऊ कुटुंबे दत्तक घेतली आहेत.अनेकांची दिवाळी कडूजिल्हा परिषदेतील कामात सुसूत्रता यावी, प्रशासकीय अडचणी कमी व्हाव्यात म्हणून संगणकीकरण वाढले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आॅनलाईन खात्यात जमा होत आहेत. मात्र, आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांवर दिवाळी कडू साजरी करण्याची वेळ आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्य करत असलेल्या ९१ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांत एक रुपयाही मानधन मिळाले नाही. तसेच कुष्टरोग नियंत्रण पथकातील कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांचे पगार वेळेत झाले नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली होती.उदयनराजे भोसले हे सातारचे खासदार आहेत. त्यांनी संसद ग्राम योजनेअंतर्गत सातारा तालुक्यातील कोंडवे गाव दत्तक घेतले. त्यांच्याबरोबर खासदार शरद पवार यांनी खटाव तालुक्यातील ऐनकूळ तर खासदार अनू आगा यांनी सातारा तालुक्यातील शिवथर हे गाव दत्तक घेतले आहे.