शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

‘सिंचन’साठी खासगीकरण शेवटचा पर्याय

By admin | Updated: May 18, 2015 01:03 IST

संजय पाटील : वर्षभरात सिंचन योजनांसाठी भरीव प्रयत्न; राज्यपालांना भेटणार

सांगली : सिंचन योजनांसाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात आम्हाला यश मिळेल. योजना सक्षमपणे चालणे गरजेचे आहे. लोकहिताच्या योजना कोणत्याही गोष्टीसाठी अडचणीत येणार असतील, तर खासगीकरण हा शेवटचा पर्याय असेल, असे मत खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, सिंचन योजनांचा लाभ मिळण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळेच सर्व लाभार्थी गावांमधून एकत्रितपणे पाण्याचे पैसे भरले गेले आणि सक्षमपणे ही योजना ज्यावेळी सुरू होईल तेव्हा अत्यंत नाममात्र पाणीपट्टी असेल. त्यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभूसह ज्या उपयोजना आहेत. त्यांच्यासाठी पुरेसा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध होईल. केंद्र शासनाने सिंचन योजनांना निधी देण्याऐवजी थेट राज्य शासनालाच त्यासाठीचा निधी वाढवून दिला आहे. राज्य शासनाकडून असा निधी मिळत असताना अनुशेषाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे आम्ही राज्यपालांना भेटून त्याविषयीची विनंती केली आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सिंचन योजनांना शिस्त लागावी म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत जर या योजना अडचणीत येणार असतील, तर शेवटचा पर्याय खासगीकरणाचा असेल. त्याविषयीची चर्चा यापूर्वी झाली होती, पण आता लगेचच त्याबाबत विचार होणार नाही. शासनामार्फतच निधी मिळवून योजना पूर्णत्वास नेण्याचा तसेच पाणीपट्टीची शिस्त लावण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. राज्य शासनाच्या धोरणाबाबत ते म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्यातील रिक्त जागांचा अनुशेष भरून निघायला हवा. तोही आपल्याच महाराष्ट्राचा भाग आहे. त्यामुळे अशा गोष्टी होत असताना पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा अर्थ काढणे चुकीचे आहे. पश्चिम महाराष्ट्रावर राज्य शासन अन्याय करणार नाही. आम्हीही याठिकाणच्या योजनांसाठी पाठपुरावा करीत आहोत. (प्रतिनिधी)