शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

‘सिंचन’साठी खासगीकरण शेवटचा पर्याय

By admin | Updated: May 18, 2015 01:03 IST

संजय पाटील : वर्षभरात सिंचन योजनांसाठी भरीव प्रयत्न; राज्यपालांना भेटणार

सांगली : सिंचन योजनांसाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात आम्हाला यश मिळेल. योजना सक्षमपणे चालणे गरजेचे आहे. लोकहिताच्या योजना कोणत्याही गोष्टीसाठी अडचणीत येणार असतील, तर खासगीकरण हा शेवटचा पर्याय असेल, असे मत खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, सिंचन योजनांचा लाभ मिळण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळेच सर्व लाभार्थी गावांमधून एकत्रितपणे पाण्याचे पैसे भरले गेले आणि सक्षमपणे ही योजना ज्यावेळी सुरू होईल तेव्हा अत्यंत नाममात्र पाणीपट्टी असेल. त्यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभूसह ज्या उपयोजना आहेत. त्यांच्यासाठी पुरेसा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध होईल. केंद्र शासनाने सिंचन योजनांना निधी देण्याऐवजी थेट राज्य शासनालाच त्यासाठीचा निधी वाढवून दिला आहे. राज्य शासनाकडून असा निधी मिळत असताना अनुशेषाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे आम्ही राज्यपालांना भेटून त्याविषयीची विनंती केली आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सिंचन योजनांना शिस्त लागावी म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत जर या योजना अडचणीत येणार असतील, तर शेवटचा पर्याय खासगीकरणाचा असेल. त्याविषयीची चर्चा यापूर्वी झाली होती, पण आता लगेचच त्याबाबत विचार होणार नाही. शासनामार्फतच निधी मिळवून योजना पूर्णत्वास नेण्याचा तसेच पाणीपट्टीची शिस्त लावण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. राज्य शासनाच्या धोरणाबाबत ते म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्यातील रिक्त जागांचा अनुशेष भरून निघायला हवा. तोही आपल्याच महाराष्ट्राचा भाग आहे. त्यामुळे अशा गोष्टी होत असताना पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा अर्थ काढणे चुकीचे आहे. पश्चिम महाराष्ट्रावर राज्य शासन अन्याय करणार नाही. आम्हीही याठिकाणच्या योजनांसाठी पाठपुरावा करीत आहोत. (प्रतिनिधी)