शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

आडनाव बदललं; पण ‘वाडी’ सुटेना!---गाव बदललं, नाव बदलायचंय

By admin | Updated: February 13, 2015 22:56 IST

कागदावर ‘भुडकेवाडी’, कमानीवर ‘मोरगाव’ : पस्तीस वर्षांपूर्वी प्रस्ताव; वाट पाहून अखेर ग्रामस्थांनीच केलं नामकरण-

संजय पाटील - कऱ्हाड- प्रसिद्ध ठिकाणावरून, ऐतिहासिक संदर्भावरून किंवा देवदेवतांच्या अधिष्ठानावरून बहुतांश गावांची नावे आहेत; पण पाटण तालुक्यातील तारळे विभागात असलेल्या भुडकेवाडीचे नाव चक्क ग्रामस्थांच्या आडनावरून पडल्याचं सांगितलं जातं. मुळात ‘कोंबडी आधी की अंडी’ हा जसा यक्षप्रश्न, तसाच आडनावरून गावाचं नाव की, गावाच्या नावावरून आडनाव, या प्रश्नाचं उत्तर ग्रामस्थांना अद्याप सापडलेलं नाही; पण काहीही असलं तरी त्यांना हे नाव बदलायचंय. त्यासाठी त्यांनी प्रस्तावही दिलाय. मात्र, शासन दरबारी उशीर लागत असल्याने त्यांनी स्वत:च गावाच्या कमानीवर ‘मोरगाव’ असं लिहून टाकलंय.तारळे विभागात सुमारे अकराशे लोकवस्तीचं भुडकेवाडी गाव असून, वरची भुडकेवाडी व खालची भुडकेवाडी या दोन भागांत हे गाव विखुरलं आहे. येथील बहुतांश ग्रामस्थांचं पूर्वी ‘भुडके’ असं आडनाव होतं. त्यावरूनच गावाला भुडकेवाडी नाव पडलं असावं; पण सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी पाटण पंचायत समितीचे तत्कालीन सभापती आनंदराव मोरे यांनी गावाच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव मांडला. ग्रामसभेत त्याबाबत चर्चा झाली. ग्रामस्थांनी आडनाव बदलून ‘मोरे’ केले असल्यामुळे गावाला ‘मोरगाव’ हे नाव देण्यात यावं, अशी मागणी त्यावेळी झाली. तसा ठरावही झाला. संबंधित ठराव व नाव बदलाचा प्रस्ताव ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे व पुढे जिल्हा परिषदेकडे दिला. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. गावाला अजूनही भुडकेवाडी म्हणूनच ओळखलं जातं. शासकीय काम अन् सहा महिने थांब, अशी प्रचलित म्हण आहे. मात्र, भुडकेवाडीच्या ग्रामस्थांनी तब्बल पस्तीस वर्षे वाट पाहिली. शासन दरबारी काहीच हालचाल होत नसल्याने अखेर गावाच्या स्वागत कमानीवर ‘भुडकेवाडी ऊर्फ मोरगाव’ असं लिहिलं. स्वागत कमानीबरोबरच गावातल्या प्रत्येक पाटीवर भुडकेवाडीऐवजी ‘मोरगाव’ झळकू लागलं. परिसरात याच नावानं गावाला आता ओळखलं जातंय. वाडी म्हटलं की प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे गावाचं नाव सांगताना आम्हाला, विशेषत: मुलांना अपमानास्पद वाटतं, सरपंच दिनकर मोरे सांगत होते.‘गावानं शासनाच्या प्रत्येक अभियानामध्ये सक्रिय सहभागी होतं यश मिळवलं. आता आम्हाला गावाचं नाव बदलण्याची प्रतीक्षा लागली आहे. शासनाने ग्रामस्थांची अडचण लक्षात घेवून ही मागणी तातडीने पूर्ण करावी,’ अशी सरपंच मोरे यांनी केली आहे. पुरस्कारप्राप्त भुडकेवाडीभुडकेवाडी गावाला जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २००८ साली गावाला निर्मल ग्राम, २००९ साली तंटामुक्ती, २०१० ते २०१३ पर्यंत सलग तीनवेळा पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना व २०१२ मध्ये गावातील जिल्हा परीषद शाळेला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. विकासकामे होऊनसुद्धा नावात वाडी असल्याने आमच्या गावाला महत्व मिळत नाही. गाव मोठं असुनही फक्त नावामुळे गावाला वस्ती समजलं जातं. माणसांच्या बघण्याचा दृष्टीकोन आमच्या लक्षात येतो. मात्र, आमचा नाईलाज आहे. प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घ्यावी. - दिनकर मोरे, सरपंचभुडकेवाडीला विभागात सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. देशसेवेत या गावाचा महत्त्वाचा वाटा आहे. सध्या गावात आजी-माजी असे एकूण पस्तीस सैनिक आहेत. कारगिल युद्धात शहीद झालेले गजानन मोरे हे सुद्धा याच गावचे. सध्या गावात शहीद मोरे यांचे भव्य स्मारक आहे. गावातील मुले-मुली शिक्षणासाठी शहरात जातात. उद्योग, व्यवसाय, नोकरीनिमित्तही अनेकजण शहरात वास्तव्यास आहेत. त्याठिकाणी गावाचे नाव सांगितल्यानंतर काहीजण वेगळ्या नजरेने पाहतात. त्यामुळे अपमानास्पद वाटते. गावाचे नाव बदलावे, अशी विद्यार्थ्यांचीही मागणी आहे. - समाधान मोरे, ग्रामपंचायत सदस्य