शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दारू दुकानाच्या स्थलांतराचा भुर्इंजमध्ये ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2015 21:38 IST

सोनाईचीवाडीत दारूबंदी : दुधेबावीत कोरमअभावी सभा तहकूब

सातारा : जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी अनेक गावांत ग्रामसभा झाल्या. काही ठिकाणी वादाचेही प्रसंग घडले. भुर्इंज येथे दारू दुकान स्थलांतराचा ठराव करण्यात आला. सोनाईचीवाडीत दारूबंदीचा ठराव तर फलटण तालुक्यातील दुधेबावीत कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली.भुर्इंज : सरकारमान्य देशीदारूचे दुकान स्थलांतरित करण्याबरोबरच भुर्इंज ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.येथील छत्रपती शिवाजी मैदानावर सरपंच बाळासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. महामार्गालगत शैक्षणिक संस्थेच्या वाटेवर असणारे सरकारमान्य देशीदारूचे दुकान स्थलांतरित करून लोकवस्तीपासून दूर नेण्यात यावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या सूचना सरपंच कांबळे यांनी दिल्या. विविध समाजांची स्मशानभूमी व अंत्यसंस्कार यांचा दाखला देत एकाच स्मशानभूमीत सर्व जाती जमातीच्या लोकांनी अंत्यसंस्कार करावेत, यासाठी सरपंच कांबळे यांनी प्रबोधन कले. विषय पत्रिकेचे वाचन ग्रामविकास अधिकारी विष्णू चव्हाण यांनी केले. चंद्रदीप भोसले यांनी आभार मानले. मल्हारपेठ : सोनाईचीवाडी येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव सर्वांच्या एकमताने मंजूर करण्यात आला. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.सोनाईचीवाडी, ता. पाटण येथे उपसरपंच सचिन माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. गावच्या विकासासाठी पहिले पाऊल म्हणून गावातील दारू धंदा बंद करण्यासाठीची सूचना पुढे आली. त्यानंतर सर्वांनुमते ठराव मंजूर करून लगेच अंमलात आणण्याचे ठरविण्यात आले. ग्रामसेवक परमेश्वर पाखरे यांनी शासकीय योजना, अभियान या परिपत्रकांचे वाचन केले. यावेळी जे. के. कदम, शहाजी काळे, आनंदा काळे, सुरेश काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.दुधेबावी : दुधेबावी , ता. फलटण येथे स्वातंत्र्यदिनी घेण्यात आलेल्या ग्रामसभेला पुरेसे ग्रामस्थ उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे वेळेच्या अर्ध्या तासानंतर कोरमअभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली, अशी माहिती सरपंच ज्योती मोरे यांनी दिली.यावेळी उपसरपंच श्रीमंत नाळे, पोलीस पाटील हणुमंत सोनवलकर, लता नाळे, कृषी सहायक डी. टी. मुळीक, डॉ. एस. पी. इंगवले, डॉ. संतोष कराडे, नाना सोनवलकर, विकास सोनवलकर, दिगंबर सोनवलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.या ग्रामसभेला सुमारे ६५ ग्रामस्थ उपस्थित होते. कोरम पूर्ण होण्यासाठी किमान १०० ग्रामस्थ किंवा मतदाराच्या १५ टक्के ग्रामस्थांची उपस्थिती गरजेची असते. तेवढी संख्या उपलब्ध नसल्याने आता ग्रामसभा दि. २१ रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी दिली. (वार्ताहर)