शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

दारू दुकानाच्या स्थलांतराचा भुर्इंजमध्ये ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2015 21:38 IST

सोनाईचीवाडीत दारूबंदी : दुधेबावीत कोरमअभावी सभा तहकूब

सातारा : जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी अनेक गावांत ग्रामसभा झाल्या. काही ठिकाणी वादाचेही प्रसंग घडले. भुर्इंज येथे दारू दुकान स्थलांतराचा ठराव करण्यात आला. सोनाईचीवाडीत दारूबंदीचा ठराव तर फलटण तालुक्यातील दुधेबावीत कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली.भुर्इंज : सरकारमान्य देशीदारूचे दुकान स्थलांतरित करण्याबरोबरच भुर्इंज ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.येथील छत्रपती शिवाजी मैदानावर सरपंच बाळासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. महामार्गालगत शैक्षणिक संस्थेच्या वाटेवर असणारे सरकारमान्य देशीदारूचे दुकान स्थलांतरित करून लोकवस्तीपासून दूर नेण्यात यावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या सूचना सरपंच कांबळे यांनी दिल्या. विविध समाजांची स्मशानभूमी व अंत्यसंस्कार यांचा दाखला देत एकाच स्मशानभूमीत सर्व जाती जमातीच्या लोकांनी अंत्यसंस्कार करावेत, यासाठी सरपंच कांबळे यांनी प्रबोधन कले. विषय पत्रिकेचे वाचन ग्रामविकास अधिकारी विष्णू चव्हाण यांनी केले. चंद्रदीप भोसले यांनी आभार मानले. मल्हारपेठ : सोनाईचीवाडी येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव सर्वांच्या एकमताने मंजूर करण्यात आला. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.सोनाईचीवाडी, ता. पाटण येथे उपसरपंच सचिन माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. गावच्या विकासासाठी पहिले पाऊल म्हणून गावातील दारू धंदा बंद करण्यासाठीची सूचना पुढे आली. त्यानंतर सर्वांनुमते ठराव मंजूर करून लगेच अंमलात आणण्याचे ठरविण्यात आले. ग्रामसेवक परमेश्वर पाखरे यांनी शासकीय योजना, अभियान या परिपत्रकांचे वाचन केले. यावेळी जे. के. कदम, शहाजी काळे, आनंदा काळे, सुरेश काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.दुधेबावी : दुधेबावी , ता. फलटण येथे स्वातंत्र्यदिनी घेण्यात आलेल्या ग्रामसभेला पुरेसे ग्रामस्थ उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे वेळेच्या अर्ध्या तासानंतर कोरमअभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली, अशी माहिती सरपंच ज्योती मोरे यांनी दिली.यावेळी उपसरपंच श्रीमंत नाळे, पोलीस पाटील हणुमंत सोनवलकर, लता नाळे, कृषी सहायक डी. टी. मुळीक, डॉ. एस. पी. इंगवले, डॉ. संतोष कराडे, नाना सोनवलकर, विकास सोनवलकर, दिगंबर सोनवलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.या ग्रामसभेला सुमारे ६५ ग्रामस्थ उपस्थित होते. कोरम पूर्ण होण्यासाठी किमान १०० ग्रामस्थ किंवा मतदाराच्या १५ टक्के ग्रामस्थांची उपस्थिती गरजेची असते. तेवढी संख्या उपलब्ध नसल्याने आता ग्रामसभा दि. २१ रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी दिली. (वार्ताहर)