शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रामाच्या भूमीत धरणग्रस्तांना वनवास

By admin | Updated: December 2, 2014 21:28 IST

‘उत्तरमांड’ची चौदा वर्षे : मागण्या मान्य न झाल्यास ‘जेलभरो’चा कृती समितीचा इशारा

चाफळ : विभागातील गमेवाडी (ता.पाटण) येथील उत्तरमांड धरणाला एक महिन्यानंतर १४ वर्षे पूर्ण होत आहेत. रामायणातील प्रभु श्रीरामालाही १४ वर्षांचा वनवास भोगल्यानंतर न्याय मिळून स्वत:चे राज्य परत मिळाले होते. त्याच प्रभूरामाच्या या पवित्र भूमीत आज चौदा वर्षांनंतर या धरणाने बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळू शकला नाही. येत्या १५ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास जेलभरो अंदोलन करणार असल्याचा इशारा उत्तरमांड धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ एकावडे यांनी दिला आहे.यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, १९९९ मध्ये सुरु झालेल्या उत्तरमांड धरणाचे काम आजमितीस पूर्ण झाले आहे. ज्या धरणग्रस्तांनी शासनावर विश्वास ठेवून घरादाराचा त्याग करुन जमिनी देऊ केल्या त्या धरणग्रस्तांना १९९९ ते २०१४ या १४ वर्षांच्या कालावधीत न्याय मिळाला नाही. आपल्या न्याय्य हक्कासाठी त्यांना आजही शासनदराारी झगडावे लागत आहे. वारंवार अर्ज, विनवण्या, आंदालने करुन शासनाचे उंबरठे झिजवूनही धरणग्रस्तांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणाला सवड नाही. १४ वर्षे घरदार व जमिनीपासून वंचित असलेले धरणग्रस्त हालअपेष्टा सोसत मोठ्या उमेदीने न्यायासाठी झुंज देत आहेत. आजही धरणग्रस्तांचे १०० टक्के पुनवर्सन झाले नाही. धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला असताना बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींना पाणी मिळू शकले नाही. अजूनही ३५ टक्के पुर्नवसन बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांना जमिनींचे वाटप करण्यात आले आहे, त्यांना जमीन कसण्यास मूळ मालकाकडुन अडथळा केला जात आहे. ज्यांना घरासाठी जागा मिळाल्या आहेत तिथे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. गावठाणातील आठरा नागरी सुविधा सुस्थितीत नाहीत. बाधित घरांचे पैसे मिळाले नाहीत. या मागण्यांबाबत धरणग्रस्तांवर अनेकदा पोकळ अश्वासनांची खैरात करण्यात आली; मात्र काहीच घडले नाही. राज्यात व देशात नवीन सरकार आले आहे. या सरकारने व नवीन मंत्र्यांनी संपूर्ण संसाराची आहुती देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची परवड थाांवावी. कारण याच प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून आज चाफळपासून उंब्रजपर्यंत हरितक्रांती घडली आहे. चौदा वर्षांचा वनवास भोगणाऱ्या या प्रकल्पग्रस्तांना आता तरी न्याय मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ‘आम्हाला नवीन सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. याबाबत पंधरा दिवसांत योग्य निर्णय घ्यावा; अन्यथा धरणातून पाण्याचा एक थेंबही सोडू दिला जाणार नाही. हक्कांसाठी धरणग्रस्त जेलभरो आंदोलन करतील,’ असा इशारा कृती समितीने दिला आहे. (वार्ताहर)