शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कऱ्हाडच्या समितीत जागेचीच ‘पंचाईत’ !

By admin | Updated: September 10, 2015 00:43 IST

पंचायत समितीची दुरवस्था : इमारतींच्या कोपऱ्यात गठ्ठेच गठ्ठे; सूचनांसह योजनांचे फलकही गायब

संतोष गुरव ल्ल कऱ्हाड शासनाने जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर, पंचायत समिती तर गाव स्तरावर ग्रामपंचायतीची उभारणी करून त्यातून विविध योजना ग्रामीण भागात राबविल्या गेल्या; मात्र कऱ्हाड पंचायत समितीमध्ये सध्या कधी योजना येते अन् निघून जाते, याची माहिती सदस्यांसह शेतकऱ्यांनाच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे नवनवीन योजना तसेच शासनाच्या उपक्रमांची माहिती पुस्तकेही इमारतीच्या कोपऱ्यात ठेवली जात असल्याचे दिसते. महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फायलींचे गठ्ठे हे धूळखात पडलेल्या अवस्थेत असल्याने त्याकडे कधी लक्ष दिले जाणार? असा प्रश्न येणाऱ्या प्रत्येकाला पडत आहे. जागेअभावी बाहेर ठेवल्या जाणाऱ्या गठ्ठ्यंमुळे कऱ्हाड पंचायत समितीत आता जागेचीच ‘पंचाईत’ झालेली दिसून येत आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची संख्या कशी पुढे नेता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी देखील स्वच्छतेबाबत सर्वांना सूचना केल्या. अशातून जिल्ह्यात एकीकडे स्वच्छतेबाबतीत व योजनांच्या बाबतीत राज्यात डंका पिटणारी कऱ्हाड पंचायत समिती ही नावलौकिक प्राप्त असलेली पंचायत समिती आहे. मात्र, सध्या पंचायत समितीमधील काही अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या सूचनांचा विसर पडला आहे. त्यामुळे पंचायत समिती आवारात घाणीचे साम्राज्य, इमारतीमध्ये अधिकाऱ्यांच्या खोलीच्या प्रवेशद्वाराजवळच महत्त्वाच्या फायलींचे गठ्ठे पडलेले आहेत. विविध योजनांच्या माहिती पुस्तिका व फायलींचे गठ्ठे जास्त दिवस ठेवल्याने याठिकाणी गठ्ठ्यांवर धूळ बसली आहे. इमारतींमध्ये तीन मजले असून, यात तळमजल्यावर शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व कृषी विभागाचे कार्यालय आहे. शालेय पोषण विभाग पहिल्या मजल्यावर सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी यांच्या सह ग्रामपंचायत व अर्थ आणि सहायक गटविकास अधिकारी विभागाचे कार्यालय आहे. तर दुसऱ्या मजल्यावर पाणीपुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग व यशवंतराव चव्हाण सभागृह आहे. पशुसंवर्धन विभागाखाली असलेल्या स्टोअर रूमच्या खोलीत जुने लिखित स्वरूपातील योजनांच्या फायली, लाथार्थ्यांचे व तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माहितींचे महत्त्वाचे गठ्ठे ठेवण्यात आले आहेत. या खोलीत अनेक वर्षांपासून ठेवण्यात आलेल्या फायलींची अवस्था दयनीय झाली आहे. फायलींच्या गठ्ठ्यांवर धूळ बसल्याने त्याची अवस्था काय झाली आहे. याची पाहणीसुद्धा अधिकाऱ्यांकडून केली जात असेल का ? हा संशोधनाचा विषय बनला आहे. वर्षानुवर्षांपासून असलेल्या योजनांच्या माहितीचे फलक हे रंगरंगोटीसाठी काढून ठेवल्याने ते पुन्हा लावण्याचे कामही अधिकाऱ्यांकडून अद्याप केले गेलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना व नागरिकांना योजना कोणत्या आहेत, हे समजत नाही. माहिती विचारायला गेल्यास योग्य प्रतिसाद मिळत नाही.