शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडच्या समितीत जागेचीच ‘पंचाईत’ !

By admin | Updated: September 10, 2015 00:43 IST

पंचायत समितीची दुरवस्था : इमारतींच्या कोपऱ्यात गठ्ठेच गठ्ठे; सूचनांसह योजनांचे फलकही गायब

संतोष गुरव ल्ल कऱ्हाड शासनाने जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर, पंचायत समिती तर गाव स्तरावर ग्रामपंचायतीची उभारणी करून त्यातून विविध योजना ग्रामीण भागात राबविल्या गेल्या; मात्र कऱ्हाड पंचायत समितीमध्ये सध्या कधी योजना येते अन् निघून जाते, याची माहिती सदस्यांसह शेतकऱ्यांनाच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे नवनवीन योजना तसेच शासनाच्या उपक्रमांची माहिती पुस्तकेही इमारतीच्या कोपऱ्यात ठेवली जात असल्याचे दिसते. महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फायलींचे गठ्ठे हे धूळखात पडलेल्या अवस्थेत असल्याने त्याकडे कधी लक्ष दिले जाणार? असा प्रश्न येणाऱ्या प्रत्येकाला पडत आहे. जागेअभावी बाहेर ठेवल्या जाणाऱ्या गठ्ठ्यंमुळे कऱ्हाड पंचायत समितीत आता जागेचीच ‘पंचाईत’ झालेली दिसून येत आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची संख्या कशी पुढे नेता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी देखील स्वच्छतेबाबत सर्वांना सूचना केल्या. अशातून जिल्ह्यात एकीकडे स्वच्छतेबाबतीत व योजनांच्या बाबतीत राज्यात डंका पिटणारी कऱ्हाड पंचायत समिती ही नावलौकिक प्राप्त असलेली पंचायत समिती आहे. मात्र, सध्या पंचायत समितीमधील काही अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या सूचनांचा विसर पडला आहे. त्यामुळे पंचायत समिती आवारात घाणीचे साम्राज्य, इमारतीमध्ये अधिकाऱ्यांच्या खोलीच्या प्रवेशद्वाराजवळच महत्त्वाच्या फायलींचे गठ्ठे पडलेले आहेत. विविध योजनांच्या माहिती पुस्तिका व फायलींचे गठ्ठे जास्त दिवस ठेवल्याने याठिकाणी गठ्ठ्यांवर धूळ बसली आहे. इमारतींमध्ये तीन मजले असून, यात तळमजल्यावर शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व कृषी विभागाचे कार्यालय आहे. शालेय पोषण विभाग पहिल्या मजल्यावर सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी यांच्या सह ग्रामपंचायत व अर्थ आणि सहायक गटविकास अधिकारी विभागाचे कार्यालय आहे. तर दुसऱ्या मजल्यावर पाणीपुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग व यशवंतराव चव्हाण सभागृह आहे. पशुसंवर्धन विभागाखाली असलेल्या स्टोअर रूमच्या खोलीत जुने लिखित स्वरूपातील योजनांच्या फायली, लाथार्थ्यांचे व तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माहितींचे महत्त्वाचे गठ्ठे ठेवण्यात आले आहेत. या खोलीत अनेक वर्षांपासून ठेवण्यात आलेल्या फायलींची अवस्था दयनीय झाली आहे. फायलींच्या गठ्ठ्यांवर धूळ बसल्याने त्याची अवस्था काय झाली आहे. याची पाहणीसुद्धा अधिकाऱ्यांकडून केली जात असेल का ? हा संशोधनाचा विषय बनला आहे. वर्षानुवर्षांपासून असलेल्या योजनांच्या माहितीचे फलक हे रंगरंगोटीसाठी काढून ठेवल्याने ते पुन्हा लावण्याचे कामही अधिकाऱ्यांकडून अद्याप केले गेलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना व नागरिकांना योजना कोणत्या आहेत, हे समजत नाही. माहिती विचारायला गेल्यास योग्य प्रतिसाद मिळत नाही.