शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

भूसंपादन कायद्यामुळे शेतकऱ्यांची झालीय कोंडी

By admin | Updated: January 3, 2015 00:02 IST

भरपाईची मागणी : शिरवळ, लोणंद, फलटणच्या चौपदरीकरणाबाबत कृती समितीची उच्च न्यायालयात धाव

खंडाळा : शिरवळ, लोणंद, फलटण या रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये काही शेतकरी भूमिहीन होत आहेत. तर काहीचे घरे, दुकाने उद्ध्वस्त होत आहे. या जागेला योग्य हमीभाव मिळावा, यासाठी शेतकरी कृती समितीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार भरपाई देण्याचे आदेश दिले आहे. मात्र, याबाबत कोणतेही दरपत्रक शेतकऱ्यांसमोर अद्याप मांडले गेले नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांवर जबरदस्तीने भूसंपादन कायदा लादला जातोय. याबाबत कृती समितीने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.शिरवळ ते लोणंद या तीस किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये वीर धरण ते लोणंद या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतेही अधिगृहण करण्यात आले नव्हते. तरीही रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जात होत्या. काही ठिकाणी विहिरीही रस्त्यालगत असल्याने नुकसान होत होते. या रस्त्यालगत असणाऱ्या गावांपैकी लोणी, भोळी, तोंडल, भादे, वाठार, अंदोरी या गावांतील काही ग्रामस्थांची घरेही जात आहेत. मात्र, याबाबत शासनाने नुकसान भरपाईचे कोणतेही धोरण शेतकऱ्यांना विचारात घेऊन आखले नाही.शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कृती समितीच्या माध्यमातून दावा दाखल केला. दोन वर्षांच्या सुनावनीनंतर बाधित शेतकऱ्यांना भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)भूसंपादन प्रक्रिया ही जुन्या कायद्याप्रमाणे सुरू असली तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नवीन कायद्याच्या अधिन राहूनच दिली जाणार आहे. न्यायालयात सरकारने लेखी निवेदनही दिले आहे. शेतकऱ्यांचे यात कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही.-रवींद्र खेबुडकर, प्रांताधिकारी, वाईंभूसंपादन कायद्यानुसार व्हावेसार्वजनिक बांधकाम विभागाने प्रथम मूळच्या रस्त्याचे भूसंपादन करावे. त्याचा योग्य मोबदला द्यावा, मग वाढीव क्षेत्रांचे संपादन करावे, रस्त्यालगतची झाडे, फळझाडे तोडली त्याचा भरपाई दरपत्रक जाहीर करावे, शेतविहिरीची योग्य किंमत मिळावी, व्यावसायिक दुकानदार, घरे यांचे मोबदल्यासह पुनर्वसन व्हावे, व याची कार्यवाही भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे व्हावे, अशी कृती समितीची मागणी आहे.न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देऊन नवीन कायद्याप्रमाणे बाधित क्षेत्राला दुप्पट दर देण्याचा आदेश दिला आहे. तरीही प्रांताधिकाऱ्यांनी जुन्याच कायद्याखाली नोटिसा दिल्या आहेत. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. या कार्यवाहीवर पुन्हा कृती समितीने स्थगिती घेतली आहे.- पुरुषोत्तम जाधव,सल्लागार शेतकरी कृती समिती.शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत. जुन्याच कायद्याप्रमाणे नोटिसा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. शेतजमीन, विहिरी, घरे, फळझाडे, यांचा कोणताही मोबदला ठरविला गेला नाही. शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यात यावा, मगच ताबापत्रावर सह्या घ्याव्यात.-दत्तात्रय दगडे, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती