शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

जमिनी अधिग्रहण; मोबदल्याचे काय?

By admin | Updated: April 15, 2016 23:35 IST

शिरवळ-बारामती चौपदरीकरण : काम ठप्प; प्रशासनाकडून ठोस निर्णय नाही, दळणवळणाचा प्रश्न कायम

खंडाळा : शिरवळ-लोणंद-बारामती चौपदरीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून ठप्प आहे. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या आहेत. त्यांच्या मोबदल्यासंदर्भात प्रशासनाकडून अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने प्रकल्पासाठी जमिनी देण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मोबदला दिला तरच चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचे मात्र बेहाल झाले आहेत. खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या शिरवळ-लोणंद-फलटण-बारामती या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा निर्णय पाच वर्षांपूवीच घेण्यात आला होता. मात्र या मार्गासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला जाहीर न केल्यामुळे या मार्गावरील अंदोरी, दापकेघर, वाठार येथील शेतकऱ्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. शासनाच्या विरोधात शेतकरी कृती समितीने न्यायालयात प्रयत्न केले. न्यायालयाने शेतकऱ्यांना जाहीर दराच्या चारपट रक्कम देण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत.या निर्णयानुसार जमिनीचा आकार लक्षात घेऊन त्यावर दर जाहीर केले आहेत. सुरुवातीला गुंठ्याला २५ हजार मोबदला देण्याचे जाहीर केलेले. मात्र या कायद्यानुसार आकारणी करून प्रतवारीनुसार ७० हजारांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत मोबदला देण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी वाई प्रांताधिकारी यांच्याकडून स्थानिक संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. जे शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून उच्च न्यायालयात गेले होते. त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत भूसंपादन अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.इतर शेतकऱ्यांप्रमाणे त्यांना नोटिसाही देण्यात आल्या नाहीत. उलट शेतकऱ्यांच्या जमिनीतील पोटखराबी हिस्सा अलग दाखवून शासनाने संभ्रम निर्माण केल्याने शेतकऱ्यांना कोणता निर्णय घ्यावा, असा प्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी) शेतकरी कृती समितीतून आम्ही न्यायालयात गेलो. शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्याप्रमाणे मोबदला जाहीर असताना प्रशासनाने ज्या नोटिसा दिल्या त्यात प्रत्यक्ष आकार, पोटखराबी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने प्रत्येक शेतकऱ्याला काय दर देणार हे मीटिंग घेऊन कळविले पाहिजे. अन्यथा न्यायालयाच्या मार्गानेच आम्ही मोबदला घेऊ.- कोंडिबा उम्रटकर, शेतकरी प्रशासनाची भूमिका जाहीर नाही...मुळातच प्रत्यक्ष भागवार किंवा गटवार प्रतिगुंठा किती रक्कम देणार आहेत. तसेच बांधकाम, घरे, झाडे, फळबागा, व्यावसायिक गाळे याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करणे गरजेचे आहे. पण प्रशासनाने कृती समितीसमोर ना शेतकऱ्यांसमोर आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला निश्चित रक्कम किती मिळणार आहे हेच समजत नाही. काम रखडल्याने दळणवळणाची समस्या...रस्त्याचे काम रखडल्यामुळे दळणवळणाची मोठी समस्या उद्भवली आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघातही होत असतात. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे.