शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी अधिग्रहण; मोबदल्याचे काय?

By admin | Updated: April 15, 2016 23:35 IST

शिरवळ-बारामती चौपदरीकरण : काम ठप्प; प्रशासनाकडून ठोस निर्णय नाही, दळणवळणाचा प्रश्न कायम

खंडाळा : शिरवळ-लोणंद-बारामती चौपदरीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून ठप्प आहे. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या आहेत. त्यांच्या मोबदल्यासंदर्भात प्रशासनाकडून अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने प्रकल्पासाठी जमिनी देण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मोबदला दिला तरच चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचे मात्र बेहाल झाले आहेत. खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या शिरवळ-लोणंद-फलटण-बारामती या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा निर्णय पाच वर्षांपूवीच घेण्यात आला होता. मात्र या मार्गासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला जाहीर न केल्यामुळे या मार्गावरील अंदोरी, दापकेघर, वाठार येथील शेतकऱ्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. शासनाच्या विरोधात शेतकरी कृती समितीने न्यायालयात प्रयत्न केले. न्यायालयाने शेतकऱ्यांना जाहीर दराच्या चारपट रक्कम देण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत.या निर्णयानुसार जमिनीचा आकार लक्षात घेऊन त्यावर दर जाहीर केले आहेत. सुरुवातीला गुंठ्याला २५ हजार मोबदला देण्याचे जाहीर केलेले. मात्र या कायद्यानुसार आकारणी करून प्रतवारीनुसार ७० हजारांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत मोबदला देण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी वाई प्रांताधिकारी यांच्याकडून स्थानिक संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. जे शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून उच्च न्यायालयात गेले होते. त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत भूसंपादन अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.इतर शेतकऱ्यांप्रमाणे त्यांना नोटिसाही देण्यात आल्या नाहीत. उलट शेतकऱ्यांच्या जमिनीतील पोटखराबी हिस्सा अलग दाखवून शासनाने संभ्रम निर्माण केल्याने शेतकऱ्यांना कोणता निर्णय घ्यावा, असा प्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी) शेतकरी कृती समितीतून आम्ही न्यायालयात गेलो. शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्याप्रमाणे मोबदला जाहीर असताना प्रशासनाने ज्या नोटिसा दिल्या त्यात प्रत्यक्ष आकार, पोटखराबी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने प्रत्येक शेतकऱ्याला काय दर देणार हे मीटिंग घेऊन कळविले पाहिजे. अन्यथा न्यायालयाच्या मार्गानेच आम्ही मोबदला घेऊ.- कोंडिबा उम्रटकर, शेतकरी प्रशासनाची भूमिका जाहीर नाही...मुळातच प्रत्यक्ष भागवार किंवा गटवार प्रतिगुंठा किती रक्कम देणार आहेत. तसेच बांधकाम, घरे, झाडे, फळबागा, व्यावसायिक गाळे याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करणे गरजेचे आहे. पण प्रशासनाने कृती समितीसमोर ना शेतकऱ्यांसमोर आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला निश्चित रक्कम किती मिळणार आहे हेच समजत नाही. काम रखडल्याने दळणवळणाची समस्या...रस्त्याचे काम रखडल्यामुळे दळणवळणाची मोठी समस्या उद्भवली आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघातही होत असतात. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे.