शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

वाखरीचा तलाव ठरतोय कर्दनकाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:28 IST

फलटण : एकेकाळी वरदायिनी म्हणून ज्या तलावाकडे पाहिले जायचे, तो तलाव आज वाखरीचा कर्दनकाळ तर ठरणार नाही ना, असा ...

फलटण : एकेकाळी वरदायिनी म्हणून ज्या तलावाकडे पाहिले जायचे, तो तलाव आज वाखरीचा कर्दनकाळ तर ठरणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी तलाव फुटून गाव पाण्याखाली जाऊन जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे वाखरी तलावाची दुरुस्ती करण्यात येऊन ग्रामस्थांचे जीव वाचवावे, अशी आर्त साद वाखरीच्या सरपंच शुभांगी शिंदे यांनी प्रशासनाला घातली आहे.

कायम दुष्काळी असा ठपका पडलेल्या वाखरी गावात १९८० मध्ये जवळपास अर्धा टीएमसीला थोडे कमी असलेल्या तलावाची निर्मिती करण्यात आली. हा तलाव सध्या जीर्ण झाला आहे. या तलावावरील सांडव्यामध्ये भगदाड पडले असून, या भिंतीच्या प्रत्येक ठिकाणी भेगा पडून मोठमोठी झाडे उगवली आहेत. या झाडांमुळे हा तलाव कधीही फुटू शकतो व यामध्ये खूप मोठी दुर्घटना घडून वाखरी गाव तर संपूर्ण वाहून जाईलच, याबरोबरच जवळ असलेल्या तरटे वस्ती, वाठार निंबाळकर (जुने गाव) बाधित होऊ शकते व यामध्ये किती मृत्यू, किती जनावरे व इतर हानी होऊ शकेल, हे कल्पनेच्या पलीकडे असून, ही दुर्घटना घडण्यापूर्वी या तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाखरी ग्रामपंचायतीच्या सरपंच शुभांगी शिंदे यांनी प्रशासनाला केली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत वाखरी व येथील तुकाराम शिंदे यांनी याबाबत सर्व स्थानिक अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना या तलावामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, याची माहिती दिली आहे. मात्र यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा तुमचा तलाव अद्याप कोणाकडेही वर्ग केलेला नाही. मात्र तो लवकरच ‘एनआरबीसी’कडे वर्ग करून त्याचे काम केले जाईल, असे सांगितले आहे. पण पुढे जाऊन याबाबत चौकशी केली असता, ते वर्ग झाले नाही, उलट वरिष्ठ अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचा आरोप वाखरी ग्रामस्थांनी केला आहे. हा तलाव कोणत्या विभागाखाली येतो, हे कोणालाच माहिती नसल्याने प्रशासनाची टाळाटाळ सुरू आहे. वाखरी गाव हे तब्बल तीन हजार लोकसंख्या असलेले गाव. या गावची सर्व आर्थिक परिस्थिती या तलावावर व यामधील पाण्यावर अवलंबून आहे. गावच्या हद्दीतील शेत, पिण्याचे पाणी, आसपासचे ओढे, नाल्यातून ओसंडून वाहत असतात. यामुळे शेतीला पाणी मिळत आहे. पावसाळ्यात गावात कोणालाही झोप लागत नाही. कधीही हा तलाव फुटू शकतो व मोठी दुर्घटना घडू शकते व कधीही भरून न येणारे गावचे नुकसान होऊ शकते. या तलावामुळे वाखरी गावचा विकास झाला आहे. या तलावात तब्बल दीड वर्ष पाणी टिकते. यामुळे गावाला धोम-बलकवडीकडे पैसे भरून कालव्याचे पाणी घेण्याची आवश्यकता नाही, हे आमचे गावचे वैभव आहे. मात्र हा तलाव फुटल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते, असे सरपंच शुभांगी शिंदे यांनी सांगितले.

चौकट...

नेमका कुठे पाठपुरावा करायचा...

वाखरीच्या तलावाला आज ३० वर्षे पूर्ण झाली तरी याला मालक (विभाग) कोणता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर कोणाच्या विभागात हा तलाव येतोय, हे सांगणे ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याने नेमका पाठपुरावा कोणाकडे करायचा. या विचित्र मनस्थितीत दुर्घटना घडू नये, यासाठी हा तलाव दुरुस्ती करण्याचे ग्रामपंचायत निवेदन सर्व मंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे

(चौकट)

कोरोनापेक्षाही पावसाची भीती जास्त...

पावसाळा तोंडावर असल्याने आमचे गाव वाचवा, आमच्या गावाला कोरोनापेक्षा मोठ्या पावसाची भीती वाटत असून, मोठा पाऊस येऊन तलाव जर भरला आणि फुटला तर गाव पाण्याखाली जाऊन जीवितहानी होणार आहे. पावसाळा तोंडावर आला असून, तलाव दुरुस्त करून आमचे गाव वाचवा, अशी आर्त विनवणी सरपंच शुभांगी शिंदे यांनी केली आहे.

27वाखरी

वाखरी (ता. फलटण) येथील तलावाला भगदाड पडल्याने त्यामधून वाहते पाणी पाहायला मिळत आहे.