शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वाखरीचा तलाव ठरतोय कर्दनकाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:28 IST

फलटण : एकेकाळी वरदायिनी म्हणून ज्या तलावाकडे पाहिले जायचे, तो तलाव आज वाखरीचा कर्दनकाळ तर ठरणार नाही ना, असा ...

फलटण : एकेकाळी वरदायिनी म्हणून ज्या तलावाकडे पाहिले जायचे, तो तलाव आज वाखरीचा कर्दनकाळ तर ठरणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी तलाव फुटून गाव पाण्याखाली जाऊन जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे वाखरी तलावाची दुरुस्ती करण्यात येऊन ग्रामस्थांचे जीव वाचवावे, अशी आर्त साद वाखरीच्या सरपंच शुभांगी शिंदे यांनी प्रशासनाला घातली आहे.

कायम दुष्काळी असा ठपका पडलेल्या वाखरी गावात १९८० मध्ये जवळपास अर्धा टीएमसीला थोडे कमी असलेल्या तलावाची निर्मिती करण्यात आली. हा तलाव सध्या जीर्ण झाला आहे. या तलावावरील सांडव्यामध्ये भगदाड पडले असून, या भिंतीच्या प्रत्येक ठिकाणी भेगा पडून मोठमोठी झाडे उगवली आहेत. या झाडांमुळे हा तलाव कधीही फुटू शकतो व यामध्ये खूप मोठी दुर्घटना घडून वाखरी गाव तर संपूर्ण वाहून जाईलच, याबरोबरच जवळ असलेल्या तरटे वस्ती, वाठार निंबाळकर (जुने गाव) बाधित होऊ शकते व यामध्ये किती मृत्यू, किती जनावरे व इतर हानी होऊ शकेल, हे कल्पनेच्या पलीकडे असून, ही दुर्घटना घडण्यापूर्वी या तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाखरी ग्रामपंचायतीच्या सरपंच शुभांगी शिंदे यांनी प्रशासनाला केली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत वाखरी व येथील तुकाराम शिंदे यांनी याबाबत सर्व स्थानिक अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना या तलावामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, याची माहिती दिली आहे. मात्र यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा तुमचा तलाव अद्याप कोणाकडेही वर्ग केलेला नाही. मात्र तो लवकरच ‘एनआरबीसी’कडे वर्ग करून त्याचे काम केले जाईल, असे सांगितले आहे. पण पुढे जाऊन याबाबत चौकशी केली असता, ते वर्ग झाले नाही, उलट वरिष्ठ अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचा आरोप वाखरी ग्रामस्थांनी केला आहे. हा तलाव कोणत्या विभागाखाली येतो, हे कोणालाच माहिती नसल्याने प्रशासनाची टाळाटाळ सुरू आहे. वाखरी गाव हे तब्बल तीन हजार लोकसंख्या असलेले गाव. या गावची सर्व आर्थिक परिस्थिती या तलावावर व यामधील पाण्यावर अवलंबून आहे. गावच्या हद्दीतील शेत, पिण्याचे पाणी, आसपासचे ओढे, नाल्यातून ओसंडून वाहत असतात. यामुळे शेतीला पाणी मिळत आहे. पावसाळ्यात गावात कोणालाही झोप लागत नाही. कधीही हा तलाव फुटू शकतो व मोठी दुर्घटना घडू शकते व कधीही भरून न येणारे गावचे नुकसान होऊ शकते. या तलावामुळे वाखरी गावचा विकास झाला आहे. या तलावात तब्बल दीड वर्ष पाणी टिकते. यामुळे गावाला धोम-बलकवडीकडे पैसे भरून कालव्याचे पाणी घेण्याची आवश्यकता नाही, हे आमचे गावचे वैभव आहे. मात्र हा तलाव फुटल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते, असे सरपंच शुभांगी शिंदे यांनी सांगितले.

चौकट...

नेमका कुठे पाठपुरावा करायचा...

वाखरीच्या तलावाला आज ३० वर्षे पूर्ण झाली तरी याला मालक (विभाग) कोणता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर कोणाच्या विभागात हा तलाव येतोय, हे सांगणे ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याने नेमका पाठपुरावा कोणाकडे करायचा. या विचित्र मनस्थितीत दुर्घटना घडू नये, यासाठी हा तलाव दुरुस्ती करण्याचे ग्रामपंचायत निवेदन सर्व मंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे

(चौकट)

कोरोनापेक्षाही पावसाची भीती जास्त...

पावसाळा तोंडावर असल्याने आमचे गाव वाचवा, आमच्या गावाला कोरोनापेक्षा मोठ्या पावसाची भीती वाटत असून, मोठा पाऊस येऊन तलाव जर भरला आणि फुटला तर गाव पाण्याखाली जाऊन जीवितहानी होणार आहे. पावसाळा तोंडावर आला असून, तलाव दुरुस्त करून आमचे गाव वाचवा, अशी आर्त विनवणी सरपंच शुभांगी शिंदे यांनी केली आहे.

27वाखरी

वाखरी (ता. फलटण) येथील तलावाला भगदाड पडल्याने त्यामधून वाहते पाणी पाहायला मिळत आहे.