शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

महिला सरपंचाच्या खुर्चीवर बसलाय दीर

By admin | Updated: October 9, 2015 21:51 IST

सदस्याचा आरोप : कोरेगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन

वाठार स्टेशन : परतवडी सरपंचांच्या खुर्चीवर महिला सरपंचाचा दीरच बसला आहे. व्यक्ती ग्रामसेवक व सदस्यांसमोर सतत बसून या खुर्चीचा अवमान करत आहे, असा आरोप ग्रामपंचायत सदस्या आशा नवनाथ दिसले यांनी कोरेगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.या निवेदनात म्हटले आहे की, सरपंचपदाची खुर्ची ही गावासाठी भूषणावह आहे. या खुर्चीवर बसण्याचा अधिकार हा दुसऱ्या कोणासही नाही. सरपंच आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. खुर्चीचा अवमान होत असताना पाहत बसणाऱ्या अथवा अशा लोकांना अटकाव करण्यापेक्षा त्यांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवकाची तातडीने बदली करावी, अन्यथा गावातील सर्वांनाच या खुर्चीवर बसण्यास परवानगी द्यावी. ग्रामीण भागात ग्रामपंचायत ही त्या गावच्या विकासाचा कणा समजली जाते. ग्रामीण भागातील या ग्रामपंचायती सक्षम व्हाव्यात, यासाठी शासन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. आगामी काळात गावच्या लोकसंख्येनुसार वर्गवारी करत शासन विकासासाठी निधी ग्रामपंचायतींना देण्याच्या तयारीत आहे. गावचा कारभार करणारी ही स्थानिक स्वराज्य संस्था सुरळीत चालविण्यासाठी सरपंच व शासनाचा अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांची जबाबदारी मोठी आहे. सरपंचपद हे नेहमीच त्या गावासाठी भूषणावह असते. त्या पदासाठी अनेकवेळा सत्ता संघर्षही होतात. सरपंचाच्या खुर्चीचा हव्यास सर्वांनाच असतो, म्हणून कोणी या खुर्चीवर बसण्याचे धाडस करत नाही. सरपंचपदाचा मान हा नेहमीच मोठा आहे व तो राहावा, अशीच भावना ग्रामस्थांची आहे. (वार्ताहर)म्हणणे मांडण्यासाठी बजावल्या नोटिसापरतवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतमधील सरपंचांच्या खुर्चीचा अवमान होत असल्याबाबत केलेल्या तक्रार अर्जाबाबत संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, संबंधित व्यक्ती, संगणक आॅपरेटरांनी १९ आॅक्टोबर रोजी कोरेगाव पंचायत समितीत उपस्थित राहून आपापले म्हणणे मांडण्याबाबत चौकशी अधिकारी सी. एन. घारे यांनी नोटिसी बजावल्या आहेत. याबाबतचा निर्णय यादिवशी स्पष्ट होणार आहे.परतवाडी ग्रामपंचायतीत खुर्च्यांची कमतरता आहे. २ आॅक्टोबर रोजी ग्रामसभा होती. या सभेचे अध्यक्ष संबंधित व्यक्ती असल्याने ते या ठिकाणी बसले होती. परंतु तक्रारदार या सभेस अनुपस्थित असताना त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेली तक्रार योग्य नाही. संबंधित व्यक्ती यापूर्वी एकवेळ या खुर्चीवर बसलेली असताना मी ग्रामसेवक या नात्याने त्या खुर्चीवर बसू नये, अशी त्यांना विनंती केली होती.- शेखर लंगुटे, ग्रामसेवक परतवडी चौकशीची मागणी; संबंधितांवर कारवाई परतवडी ग्रामपंचायतीमधील हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे. याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना कोरेगावच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे म्हणाल्या, ‘परतवडी ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत दिलेले निवेदन मिळाले आहे. याबाबत तक्रारदार, संबंधित व्यक्ती व सरपंच यांचे म्हणने ऐकून घेऊन हा प्रकार सत्य असेल, तर संबधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे.