शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव, पश्चिम घाटातील पाणी अडविले तर राज्याची गरज होईल पूर्ण: रिजिजू

By दीपक शिंदे | Updated: October 5, 2023 23:00 IST

मंत्री किरेन रिजिजू हे येथील हवामान खात्याच्या ढग संशोधन केंद्रास भेट देण्यासाठी आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, महाबळेश्वर: ‘राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याची खंत व्यक्त करून पश्चिम घाटातील पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी हे समुद्रात वाहून जात आहे. हे पाणी अडवून राज्याच्या पाण्याची गरज पूर्ण करता येईल,’ असे मत केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी महाबळेश्वर येथे बोलताना व्यक्त केले.

मंत्री किरेन रिजिजू हे येथील हवामान खात्याच्या ढग संशोधन केंद्रास भेट देण्यासाठी आले होते. त्यानंतर ते शास्त्रज्ञांच्या बैठकीत बोलताना त्यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. राज्य सरकारच्या कामाचे वाभाडेच रिजिजू यांनी गुरुवारी बैठकीत काढले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, शास्त्रज्ञ डॉ. जी. पंडीथुराई व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रिजिजू म्हणाले, ‘महाबळेश्वरप्रमाणेच महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा निसर्ग संपन्न आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. महाराष्ट्र देशातील एक श्रीमंत राज्य आहे. राज्यकर्त्यांनी मनावर घेतले तर मोठमोठे प्रकल्प बांधून पश्चिम घाटातील पावसाचे पाणी अडवून राज्यातील दुष्काळी भागाकडे वळविता येईल; परंतु राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. दोन-चारशे नव्हे तर लाख कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले पाहिजे. मात्र, राज्य सरकार अशा कामांवर पैसा खर्च करीत नाही. पश्चिम घाटातून समुद्रात वाहून जात असलेल्या पाण्याबाबतदेखील रिजिजू यांनी खंत व्यक्त केली.

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान