शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

परतीच्या पावसाने खरीप पिकांची नासाडी--परतीच्या पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:56 IST

मलकापूर : परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले असून, या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने खरीप हंगामातील हायब्रीड, ज्वारीचे पीक काळे पडत आहे.

ठळक मुद्देहायब्रीड, सोयाबीन, भुईमुगाचे नुकसान; पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले असून, या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने खरीप हंगामातील हायब्रीड, ज्वारीचे पीक काळे पडत आहे. तर सोयाबीनसह भुईमुगाची पिके कुजत असल्यामुळे हातात आलेल्या पिकांचे वाटोळे होत आहे. एका बाजूला निसर्ग तर दुसºया बाजूला सोयाबीन खरेदी बंद अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या हाताशी आलेला घास हिसकावला जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यात सध्या गडगडाटासह जोरदार पाऊस रोजच हजेरी लावत आहे. काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक येत असलेल्या जोराच्या पावसामुळे भाजीपाला पिकांच्या शेतात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वधारले आहेत.

पावसाने खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काढणीचा हंगाम सुरू असलेल्या सोयाबीन व भुईमूग पीक शेतातच कुजत आहे. ऐन सणासुदीच्या काळातच या नगदी पिकांचे वाटोळे होत असल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. हायब्रीड, ज्वारी हे खरीप हंगामातील पीक चांगले आले होते. महामार्गाच्या पश्चिमेकडील नांदलापूर, धोंडेवाडी, चचेगावसह अनेक गावांत हायब्रीड ज्वारीचे पीक सध्या जोमात आले आहे. मात्र, सततच्या पावसाने हे पीक काळे पडले आहे. वर्षभराची खाण्याची सोय होणार, अशी आशा लागलेल्या शेतकºयांच्या चिंतेत भरच पडत आह

मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाºया शेतकºयांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. भेंडी, गवारी यासारख्या शेंगवर्गीय भाजीवर सकाळी पडत असलेल्या धुक्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पावसामुळे पालेभाज्याच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले आहे.गुºहाळाची घरघर थांबलीगणेशोत्सवाच्या मुहूर्तावर चचेगावसह परिसरातील काही गुºहाळ व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. मात्र, महिन्यापासून जोरदार पावसामुळे शेतकºयांच्या रानात पाणी साचल्यामुळे उसाची वाहतूक करण्यात अडचणी येत आहे. परिणामी, व्यावसायिकांना गुºहाळाची घरघर थांबवावी लागली आहे. याचा परिणाम म्हणून गुºहाळात काम करण्यासाठी आलेल्या कामगारांचे संसार चालविण्यासाठी गुºहाळ मालकाला पदरमोड करावी लागत आहे. गुºहाळाची घरघर थांबली.सर्वांचा पोशिंदा दुहेरी संकटातएका बाजूला सातत्याने अतिवृष्टीमुळे पिके काढता येत नसल्यामुळे रानातच कुजत आहेत. म्हणून शेतकºयांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करून शेतकºयाने काढलेल्या मालाला हमीभाव देण्यावरून व्यावसायिकांनी सोयाबीन खरेदी बंद केली आहे. अशा संकटालाही शेतकºयांना तोंड द्यावे लागत आहे. एकूणच सर्वांचा पोशिंदा सध्या दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे.