शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

परतीच्या पावसाने खरीप पिकांची नासाडी--परतीच्या पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:56 IST

मलकापूर : परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले असून, या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने खरीप हंगामातील हायब्रीड, ज्वारीचे पीक काळे पडत आहे.

ठळक मुद्देहायब्रीड, सोयाबीन, भुईमुगाचे नुकसान; पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले असून, या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने खरीप हंगामातील हायब्रीड, ज्वारीचे पीक काळे पडत आहे. तर सोयाबीनसह भुईमुगाची पिके कुजत असल्यामुळे हातात आलेल्या पिकांचे वाटोळे होत आहे. एका बाजूला निसर्ग तर दुसºया बाजूला सोयाबीन खरेदी बंद अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या हाताशी आलेला घास हिसकावला जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यात सध्या गडगडाटासह जोरदार पाऊस रोजच हजेरी लावत आहे. काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक येत असलेल्या जोराच्या पावसामुळे भाजीपाला पिकांच्या शेतात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वधारले आहेत.

पावसाने खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काढणीचा हंगाम सुरू असलेल्या सोयाबीन व भुईमूग पीक शेतातच कुजत आहे. ऐन सणासुदीच्या काळातच या नगदी पिकांचे वाटोळे होत असल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. हायब्रीड, ज्वारी हे खरीप हंगामातील पीक चांगले आले होते. महामार्गाच्या पश्चिमेकडील नांदलापूर, धोंडेवाडी, चचेगावसह अनेक गावांत हायब्रीड ज्वारीचे पीक सध्या जोमात आले आहे. मात्र, सततच्या पावसाने हे पीक काळे पडले आहे. वर्षभराची खाण्याची सोय होणार, अशी आशा लागलेल्या शेतकºयांच्या चिंतेत भरच पडत आह

मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाºया शेतकºयांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. भेंडी, गवारी यासारख्या शेंगवर्गीय भाजीवर सकाळी पडत असलेल्या धुक्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पावसामुळे पालेभाज्याच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले आहे.गुºहाळाची घरघर थांबलीगणेशोत्सवाच्या मुहूर्तावर चचेगावसह परिसरातील काही गुºहाळ व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. मात्र, महिन्यापासून जोरदार पावसामुळे शेतकºयांच्या रानात पाणी साचल्यामुळे उसाची वाहतूक करण्यात अडचणी येत आहे. परिणामी, व्यावसायिकांना गुºहाळाची घरघर थांबवावी लागली आहे. याचा परिणाम म्हणून गुºहाळात काम करण्यासाठी आलेल्या कामगारांचे संसार चालविण्यासाठी गुºहाळ मालकाला पदरमोड करावी लागत आहे. गुºहाळाची घरघर थांबली.सर्वांचा पोशिंदा दुहेरी संकटातएका बाजूला सातत्याने अतिवृष्टीमुळे पिके काढता येत नसल्यामुळे रानातच कुजत आहेत. म्हणून शेतकºयांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करून शेतकºयाने काढलेल्या मालाला हमीभाव देण्यावरून व्यावसायिकांनी सोयाबीन खरेदी बंद केली आहे. अशा संकटालाही शेतकºयांना तोंड द्यावे लागत आहे. एकूणच सर्वांचा पोशिंदा सध्या दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे.