शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कुसळही येत नव्हतं...तिथं उगवतंय सोनं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

कोरेगाव तालुक्यातील दहिगाव, आसनगाव, शहापूर, रणदुल्लाबाद, पळशी ही गावे पाणीदार करण्यात योगेश यांना यश आलंय. आता तालुक्यातील इतर गावांमध्येही ...

कोरेगाव तालुक्यातील दहिगाव, आसनगाव, शहापूर, रणदुल्लाबाद, पळशी ही गावे पाणीदार करण्यात योगेश यांना यश आलंय. आता तालुक्यातील इतर गावांमध्येही पाणी खेळवून गावे समृध्द करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. युवक जर सकारात्मक नजरेतून गावांकडे पाहत असतील, तर काय कायापालट होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून ही गावे पुढे आलेली आहेत.

योगेश चव्हाण यांनी दहिगावातून प्राथमिक शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना देऊर येथील मुधाई शिक्षण संस्थेत जावे लागले तर वाघोली येथील विद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील नारळीकर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी उच्चशिक्षण घेतले. सध्या ते पुण्यातील अमेरिकन कंपनीमध्ये एचआर मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. कंपनीत कार्यरत असतानाच त्यांना सीएसआर फंड व परदेशातून चांगल्या कामांसाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती मिळाली. जन्मापासून कळता होईपर्यंत आपल्या गावासह तालुक्यात पाहिलेला दुष्काळ या माध्यमातून दूर करता येईल, असा विचार योगेश यांच्या मनात घोळत हाेता.

२०१८मध्ये गावशिवारात माथा ते पायथा त्यांनी कामे हाती घेतली. सासवड येथील ग्रामगौरव संस्थेच्या कल्पना साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. सुरुवातीला दहिगाव येथे शिवार पाहणी करण्यात आली. हेच योगेश यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. गाव पाणीदार करत असताना सर्वच शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे, हे धोरण त्यांनी सुरुवातीपासूनच ठेवले आहे. तालुक्यात जमीन भरपूर आहे. पण ती बारमाही हिरवीगार ठेवण्यासाठी काय करावे लागेल, हाच विचार योगेश यांच्या मनात रोज घोळत असतो. त्यांचे काम पाहण्यासाठी कोरेगाव उत्तर भागात फेरफटका मारायलाच हवा. योगेश हे स्वत: शनिवारी पूर्णवेळ या कामासाठी देतात.

विहिरींचे पाणी १५ फुटांवर

उन्हाळ्यात ज्या भागात ३५० फूट खोल पाणीपातळी जात होती, त्याचठिकाणी माथा ते पायथा असे काम करुन पाणी साठविण्यात योगेश चव्हाण यांना यश आले आहे. जुन्या बंधाऱ्यांची गळती काढणे, गाळ काढणे, समतल चर काढणे, अशी कामे झाल्याने आता दहिगावात विहिरींना १५ फुटांवर पाणी आले आहे.

नोकरी शोधण्याची गरजच काय?

एचआर विभागात काम करत असल्याने योगेश यांच्याकडे गावाकडचे अनेक तरुण नोकरीसाठी अर्ज करतात. स्वत:ची जमीन आहे, मात्र पाणी नाही त्यामुळे शेतकऱ्यांची ही मुले पदवी घेऊन पुण्यात नोकरी शोधत फिरतात. गावात पाणी उपलब्ध झाले तर बागायती पिके घेऊन शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करण्यावरदेखील योगेश यांनी काम सुरु केले असल्याने ४० ते ५० हजार रुपये प्रतिमहिना गावात राहून मिळत असतील तर नोकरी शोधण्याची गरजच काय? असे योगेश यांचे म्हणणे आहे.

(सागर गुजर)

फोटो नेम : १० दहिगाव ०१, ०२