शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

कुसळही येत नव्हतं...तिथं उगवतंय सोनं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

कोरेगाव तालुक्यातील दहिगाव, आसनगाव, शहापूर, रणदुल्लाबाद, पळशी ही गावे पाणीदार करण्यात योगेश यांना यश आलंय. आता तालुक्यातील इतर गावांमध्येही ...

कोरेगाव तालुक्यातील दहिगाव, आसनगाव, शहापूर, रणदुल्लाबाद, पळशी ही गावे पाणीदार करण्यात योगेश यांना यश आलंय. आता तालुक्यातील इतर गावांमध्येही पाणी खेळवून गावे समृध्द करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. युवक जर सकारात्मक नजरेतून गावांकडे पाहत असतील, तर काय कायापालट होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून ही गावे पुढे आलेली आहेत.

योगेश चव्हाण यांनी दहिगावातून प्राथमिक शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना देऊर येथील मुधाई शिक्षण संस्थेत जावे लागले तर वाघोली येथील विद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील नारळीकर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी उच्चशिक्षण घेतले. सध्या ते पुण्यातील अमेरिकन कंपनीमध्ये एचआर मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. कंपनीत कार्यरत असतानाच त्यांना सीएसआर फंड व परदेशातून चांगल्या कामांसाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती मिळाली. जन्मापासून कळता होईपर्यंत आपल्या गावासह तालुक्यात पाहिलेला दुष्काळ या माध्यमातून दूर करता येईल, असा विचार योगेश यांच्या मनात घोळत हाेता.

२०१८मध्ये गावशिवारात माथा ते पायथा त्यांनी कामे हाती घेतली. सासवड येथील ग्रामगौरव संस्थेच्या कल्पना साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. सुरुवातीला दहिगाव येथे शिवार पाहणी करण्यात आली. हेच योगेश यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. गाव पाणीदार करत असताना सर्वच शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे, हे धोरण त्यांनी सुरुवातीपासूनच ठेवले आहे. तालुक्यात जमीन भरपूर आहे. पण ती बारमाही हिरवीगार ठेवण्यासाठी काय करावे लागेल, हाच विचार योगेश यांच्या मनात रोज घोळत असतो. त्यांचे काम पाहण्यासाठी कोरेगाव उत्तर भागात फेरफटका मारायलाच हवा. योगेश हे स्वत: शनिवारी पूर्णवेळ या कामासाठी देतात.

विहिरींचे पाणी १५ फुटांवर

उन्हाळ्यात ज्या भागात ३५० फूट खोल पाणीपातळी जात होती, त्याचठिकाणी माथा ते पायथा असे काम करुन पाणी साठविण्यात योगेश चव्हाण यांना यश आले आहे. जुन्या बंधाऱ्यांची गळती काढणे, गाळ काढणे, समतल चर काढणे, अशी कामे झाल्याने आता दहिगावात विहिरींना १५ फुटांवर पाणी आले आहे.

नोकरी शोधण्याची गरजच काय?

एचआर विभागात काम करत असल्याने योगेश यांच्याकडे गावाकडचे अनेक तरुण नोकरीसाठी अर्ज करतात. स्वत:ची जमीन आहे, मात्र पाणी नाही त्यामुळे शेतकऱ्यांची ही मुले पदवी घेऊन पुण्यात नोकरी शोधत फिरतात. गावात पाणी उपलब्ध झाले तर बागायती पिके घेऊन शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करण्यावरदेखील योगेश यांनी काम सुरु केले असल्याने ४० ते ५० हजार रुपये प्रतिमहिना गावात राहून मिळत असतील तर नोकरी शोधण्याची गरजच काय? असे योगेश यांचे म्हणणे आहे.

(सागर गुजर)

फोटो नेम : १० दहिगाव ०१, ०२