शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

कुरघोडी अधिकाऱ्यांची; फरफट होतेय ग्रामस्थांची

By admin | Updated: February 3, 2015 00:00 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्यासाठी नागरिकांची वणवण

पिंपोडे बुद्रुक : महिन्यापेक्षा अधिक काळ पंचायत समिती अन् तहसीलदार यांच्या कार्यालयात हेलपाटे मारूनही पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात अधिकारी चालढकल करत आहेत. प्रस्तावाच्या नावाखाली ऐकमेकांकडे अंगुलीनिर्देश करूनही कुरघोडी करण्यातच तहसीलदार अन् गटविकास अधिकारी धन्यता मानत आहेत. पण, तहानलेल्या ग्रामस्थांना पाणी कोण देणार? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. भावेनगर, ता. कोरेगाव व डोंगरकडेने वसलेले उत्तर कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातील एक छोटेसे गाव, सध्या गावात फक्त २०० ते ३०० च्या आसपास, ग्रामस्थ अन् लहान मुले आहेत. तशी गावची लोकसंख्या हजाराच्या आसपास आहे. मात्र, मेंढपाळ हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे जवळपास सर्वच घरातील तरुण-महिला पुरुष साधारणपणे दसरा-दिवाळीनंतर व्यवसायानिमित्त स्थलांतरित होत असतात. त्यामुळे आता फक्त वयोवृद्ध महिला-पुरुष अन् शाळकरी मुले गावात वास्तव्य करीत आहेत. नोव्हेंबर २०१४ पासून पिण्याच्या पाण्याच्या विहिरीने तळ गाठला आहे. गावचे सरपंच संतोष सूळ यांनी गेल्या एक महिन्यांपासून पंचायत समिती कोरेगाव अन् तहसीलदार यांच्याकडे पाण्याचा टँकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पंचायत समिती सभापती रूपाली जाधव यांनी केलेल्या टंचाईचा प्रस्ताव दाखल करण्याच्या आवाहनानुसार सरपंचांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याबाबत प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, पंचायत समिती अन् तहसीलदार या दोन्ही कार्यालयांमधील समन्वयाचा अभाव प्रकर्षाने येत आहे. काही वर्षांत पर्जन्यमान अतिशय कमी झालेले आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. चालू वर्षीच्या खरीप अन् रब्बी पिकांना दुष्काळाचा फटका बसलेला आहे. ही सगळी वस्तुस्थिती समोर असताना अधिकाऱ्यांचे हे बेजबाबदार वागणे कितपत योग्य आहे, त्यांना आमची अडचण समजत नाही की, अधिकारी मुद्दाम आमची कुचंबणा करीत आहेत, अशी भावना भावेनगर ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)भावेनगर ग्रामस्थांच्या अडचणींबाबत तहसीलदारांना तोंडी आदेश दिले आहेत. तरीही दोन दिवसांत प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत बोलून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.-दीपक चव्हाण, आमदार===माझ्याकडे टंचाईग्रस्त गावांची प्रस्ताव यादी आलेली नाही. तरीही भावेनगर येथील ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतजी जाईल. मात्र, काही कार्यालयीन कामकाजाच्या पद्धती पाळाव्या लागतात. - अर्चना तांबे, तहसीलदार कोरेगावम्हणे प्रस्ताव आलाच नाही...कागदी घोड्याचे कारण पुढे करून तहसीलदार अन् गटविकास अधिकारी ग्रामस्थांची मात्र फरफट करीत आहेत. गटविकास अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून प्रत्यक्ष पाहणी करून तसा अहवाल दिला असल्याचे सांगत आहेत, तर माझ्याकडे टंचाईग्रस्त गाव म्हणून भावेनगरचा प्रस्ताव आलाच नसल्याचे तहसीलदार सांगत आहेत.