शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

कुरघोडी अधिकाऱ्यांची; फरफट होतेय ग्रामस्थांची

By admin | Updated: February 3, 2015 00:00 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्यासाठी नागरिकांची वणवण

पिंपोडे बुद्रुक : महिन्यापेक्षा अधिक काळ पंचायत समिती अन् तहसीलदार यांच्या कार्यालयात हेलपाटे मारूनही पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात अधिकारी चालढकल करत आहेत. प्रस्तावाच्या नावाखाली ऐकमेकांकडे अंगुलीनिर्देश करूनही कुरघोडी करण्यातच तहसीलदार अन् गटविकास अधिकारी धन्यता मानत आहेत. पण, तहानलेल्या ग्रामस्थांना पाणी कोण देणार? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. भावेनगर, ता. कोरेगाव व डोंगरकडेने वसलेले उत्तर कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातील एक छोटेसे गाव, सध्या गावात फक्त २०० ते ३०० च्या आसपास, ग्रामस्थ अन् लहान मुले आहेत. तशी गावची लोकसंख्या हजाराच्या आसपास आहे. मात्र, मेंढपाळ हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे जवळपास सर्वच घरातील तरुण-महिला पुरुष साधारणपणे दसरा-दिवाळीनंतर व्यवसायानिमित्त स्थलांतरित होत असतात. त्यामुळे आता फक्त वयोवृद्ध महिला-पुरुष अन् शाळकरी मुले गावात वास्तव्य करीत आहेत. नोव्हेंबर २०१४ पासून पिण्याच्या पाण्याच्या विहिरीने तळ गाठला आहे. गावचे सरपंच संतोष सूळ यांनी गेल्या एक महिन्यांपासून पंचायत समिती कोरेगाव अन् तहसीलदार यांच्याकडे पाण्याचा टँकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पंचायत समिती सभापती रूपाली जाधव यांनी केलेल्या टंचाईचा प्रस्ताव दाखल करण्याच्या आवाहनानुसार सरपंचांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याबाबत प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, पंचायत समिती अन् तहसीलदार या दोन्ही कार्यालयांमधील समन्वयाचा अभाव प्रकर्षाने येत आहे. काही वर्षांत पर्जन्यमान अतिशय कमी झालेले आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. चालू वर्षीच्या खरीप अन् रब्बी पिकांना दुष्काळाचा फटका बसलेला आहे. ही सगळी वस्तुस्थिती समोर असताना अधिकाऱ्यांचे हे बेजबाबदार वागणे कितपत योग्य आहे, त्यांना आमची अडचण समजत नाही की, अधिकारी मुद्दाम आमची कुचंबणा करीत आहेत, अशी भावना भावेनगर ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)भावेनगर ग्रामस्थांच्या अडचणींबाबत तहसीलदारांना तोंडी आदेश दिले आहेत. तरीही दोन दिवसांत प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत बोलून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.-दीपक चव्हाण, आमदार===माझ्याकडे टंचाईग्रस्त गावांची प्रस्ताव यादी आलेली नाही. तरीही भावेनगर येथील ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतजी जाईल. मात्र, काही कार्यालयीन कामकाजाच्या पद्धती पाळाव्या लागतात. - अर्चना तांबे, तहसीलदार कोरेगावम्हणे प्रस्ताव आलाच नाही...कागदी घोड्याचे कारण पुढे करून तहसीलदार अन् गटविकास अधिकारी ग्रामस्थांची मात्र फरफट करीत आहेत. गटविकास अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून प्रत्यक्ष पाहणी करून तसा अहवाल दिला असल्याचे सांगत आहेत, तर माझ्याकडे टंचाईग्रस्त गाव म्हणून भावेनगरचा प्रस्ताव आलाच नसल्याचे तहसीलदार सांगत आहेत.