शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

कृष्णेच्या डोहात जलपर्णीचा कालिया!

By admin | Updated: June 24, 2016 01:12 IST

प्रशासन सुस्त : भुर्इंज परिसरात वनस्पती हटविण्यासाठी सरसावली तरुणाई; सामाजिक संघटनेचा पुढाकार--स्वच्छ व्हावी कृष्णामाई...

भुर्इंज : येथील कृष्णा नदीत वाढलेल्या जलपर्णीमुळे नदीचे मूळ स्वरूपच हरवून गेले आहे. जलपर्णीच्या विळख्यामुळे अनेक भागांमध्ये नदीपात्रातील पाण्याचे दर्शनही होत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून कोणी आवाहन करण्याची प्रतीक्षा न करता येथील प्लस पॉइंट ग्रुपने भुर्इंज परिसरातील नदीपात्रातील जलपर्णी हटवण्याचे काम स्वयंस्फूर्तीने हाती घेतले आहे. मात्र, त्यांच्या या कामाला प्रशासकीय पातळीवर पाठबळ मिळत नसल्याने या कामाला आवश्यक गती मिळत नाही.भुर्इंजला कृष्णा नदीकाठी असणारे बांधिव घाट, त्या शेजारी महालक्ष्मी मंदिर आणि भृगुऋषी मठ तसेच पात्रालगत असणारी गर्द हिरवाई यामुळे या ठिकाणी कृष्णा नदीचा डौल काही वेगळाच; मात्र या दृष्याला गेल्या काही दिवसांपासून नजर लागली असून, कृष्णा नदीचे पात्रच हरवू लागले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या जलपर्णीमुळे नदीपात्राची अवस्था भीषण झाली आहे. जलपर्णीमुळे पात्रातील मासेही अनेकदा मृत होतात. काही दिवसांपूर्वी येथील प्लस पॉइंट ग्रुपने भुर्इंज परिसरातील नदीपात्रात जलपर्णी हटाव मोहीम राबविण्यास सुरुवात केली. कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेची सुरुवात भुर्इंजपासून केली. या मोहिमेत सहभागी झालेल्या राहुल शेवते, गणेश दीक्षित, प्रथमेश शिंदे, अक्षय शेवते, नीलेश दीक्षित, अमोल राऊत, अमित शिर्के, प्रसाद शेवते, अभिमन्यू निंंबाळकर, नंदकिशोर निंंबाळकर, प्रसन्न शेवते, विश्वजित साळुंखे, अभिषेक भुजबळ, स्वप्नील शेवते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेकडो टन जलपर्णी पात्रातून बाहेर काढली; मात्र जलपर्णीचा विळखा पुन्हा प्रचंड वेगाने पात्राला पडत असल्याने या कामाला अधिक बळ मिळण्याची गरज आहे.त्यांच्या कामाला प्रशासकीय मदत मिळाली तर काम अधिक व्यापक आणि ठोस होणार आहे. नदीपात्र जलपर्णीमुक्त होण्याआधी या पात्राचा वरील भाग आधी जलपर्णीमुक्त होणे आवश्यक आहे. अन्यथा येथील जलपर्णी हटवली तरी वरून येणाऱ्या जलपर्णीमुळे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. (प्रतिनिधी) कऱ्हाडला जलपर्णीच्या तावडीतून कृष्णेची सुटका!पालिकेचा पुढाकार : आठ दिवस राबविली मोहीम; बोटीचा वापरकऱ्हाड : येथील कृष्णा नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णींमुळे नदीपात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत होते. त्यामुळे नदीकाठच्या गावातील गावकऱ्यांसह शहरातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत होते. पालिकेने पुढाकार घेऊन शहरातील सांडपाण्यामुळे नदीपात्रात वाढत असलेल्या जलपर्णी काढल्या व कृष्णानदी पात्र स्वच्छ केले.कऱ्हाड ते टेंभूपर्यंत मोठ्या प्रमाणात सांडपाण्यामुळे जलपर्णींचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे नागरिकांसह नगरसेवकांकडून दूषित पाण्याबाबत पालिका प्रशासनावर मासिक सभेमध्ये धारेवर धरले जात होते. याशिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही नदीप्रदूषणाबाबत पालिकेस अनेक वेळा नोटिसा देण्यात आलेल्या होत्या. याचा विचार करत नदीप्रदूषणावर योग्य तोडगा काढत सुरुवातीला नदीतील जलपर्णी काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला व जलपर्णी काढल्या.कृष्णा-कोयना नदीपात्रात गोवारे हद्दीपर्यंत फोफावलेली जलपर्णी काढण्यात आली. येथील जुन्या कोयना पुलापासून गोवारे हद्दीपर्यंत सुमारे तीसहून अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णींनी नदीपात्राला वेढलेले होते. जलपर्णीची झपाट्याने होणारी वाढ व त्यामुळे होत असलेले दूषित पाणी त्याचा नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत पालिकेने आठ दिवस यांत्रिक बोटींच्या साह्णाने कृष्णा-कोयना पात्रातील जलपर्णी काढल्या. पालिकेतील आरोग्य विभागातील पाच कर्मचाऱ्यांसह कोल्हाटी समाजातील वीस युवकांनी सलग आठ दिवस नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पूर्ण केले.जलपर्णींचा पालिकेचे आरोग्य अभियंता ए. आर. पवार यांनी कर्मचाऱ्यांसमवेत यांत्रिक बोटींतून सर्व्हे देखील केला. शिवाय नदीपात्रात वाढत असलेल्या जलपर्णीची नगराध्यक्षा संगीता देसाई, उनगराध्यक्ष सुभाष पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, एम. सी. बागवान, नगरसेविका अरुणा जाधव, सिद्धार्थ थोरवडे आदींनी नदीकाठी जाऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)