शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘एफआरपी’मध्ये ‘कृष्णा’ची आघाडी

By admin | Updated: December 20, 2015 00:38 IST

पंच्याऐंशी टक्के ‘एफआरपी’चा निर्णय : शेतकऱ्यांच्या खात्यावर आठवड्यात पैसे वर्ग

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’पैकी ८५ टक्के रक्कम चालू हंगामासाठी देण्याचा निर्णय कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी घेतला आहे. राज्यभरात अनेक कारखाने ८० टक्के ‘एफआरपी’ देत असतानाच कृष्णा कारखान्याने मात्र सर्वाधिक ८५ टक्के ‘एफआरपी’ रक्कम जाहीर करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. कारखाना आर्थिक अडचणीत असतानाही केवळ सभासदांचे हित लक्षात घेऊन संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले. चालू गळीत हंगामातील उसासाठी ‘एफआरपी’ लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून शासनाकडे केली जात होती. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी चालू हंगामात ८० टक्के ‘एफआरपी’ आणि हंगाम संपण्यापूर्वी उर्वरित २० टक्के ‘एफआरपी’ देण्याचा तोडगा सुचविला होता. ऊस उत्पादकांनी हा तोडगा मान्य केल्याने साखर कारखानदार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सातारा आणि सांगली जिल्ह्यांत काही कारखान्यांनी ८० टक्के ‘एफआरपी’ देण्याचा निर्णयही जाहीर केला; पण कृष्णा कारखान्याने मात्र सर्व साखर कारखान्यांत आघाडी घेत सर्वाधिक ८५ टक्के ‘एफआरपी’ चालू हंगामासाठीच देण्याचा निर्णय घेतला आहे. ८५ टक्केनुसार होणारी दोन हजार रुपये इतकी रक्कम येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार असल्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले. दरम्यान, कारखान्याने ऊस विकास योजनाही जाहीर केली असून, त्याचा शेतकऱ्यांना चांगला लाभ होणार आहे. कारखान्याच ऊस विकास योजनेअंतर्गत चालू गळीत हंगामात २०१५-१६ आधी तुटलेल्या लागणीचा खोडवा ठेवणाऱ्या व राखणाऱ्या आणि त्याची नोंद कारखान्याकडे करणाऱ्या सभासदांना शेतीसाठी उपयुक्त गाळ शंभर टक्के अनुदानातून कारखाना साईटवरून देण्याची योजना आखण्यात आली आहे. तसेच जे सभासद मोकळ्या जमिनीमध्ये नांगरणीपूर्वी गाळ टाकू इच्छितात, त्यांना प्रतीएकरी ५ ते १० मेट्रीक टनप्रमाणे प्रती मेट्रीक टन २०० रुपयेप्रमाणे अत्यल्प किंमतीत गाळ सभासदांना उधारीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांना कारखाना साईटवरून प्रती मेट्रीक टन २०० प्रमाणे रोखीने हा गाळ उपलब्ध करून देण्यात ेयेणार असून, या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)