शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

कोयना प्रकल्पग्रस्त कोयनामाईची शपथ घेऊन सकाळचे जेवण बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

सातारा : कोयना प्रकल्पग्रस्त येत्या सोमवारपासून सकाळचे जेवण घेणे बंद करतील, हा निर्णय कोयनेला सांगण्यासाठी कोयना जलाशय, कोयना नदी ...

सातारा : कोयना प्रकल्पग्रस्त येत्या सोमवारपासून सकाळचे जेवण घेणे बंद करतील, हा निर्णय कोयनेला सांगण्यासाठी कोयना जलाशय, कोयना नदी यापैकी ज्या गावाला जवळ असेल त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात जाऊन या निर्णयाची शपथ घेतील, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.

कोयना धरण झाले आणि महाराष्ट्राला विकासाचा आधार असलेली वीज मिळाली. या विजेबरोबरच कोयनेच्या पाण्यातून लाखो एकर जमीन बागायती झाली. या आधारावर सहकारी आणि खाजगी उद्योग भांडवल कमवत आहेत. अशा वेळी ६४ वर्षे उलटून गेल्यानंतर कोयना धरणग्रस्तांचे विकसनशील पुनर्वसन बाजूलाच पण साधे पुनर्वसनही होऊ शकले नाही, याविषयी दुःख होण्याऐवजी किंवा ६४ वर्षे झालेल्या उशिराबद्दल खंत वाटण्याऐवजी उशिराचे समर्थन होणे म्हणजे या प्रकल्पग्रस्तांच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

ही परिस्थिती गेले दहा वर्षे चालू आहे. पात्र प्रकल्पग्रस्तांची प्रमाणित यादी तयार करण्याचा निर्णय मंत्रालय पातळीवर जरी प्रथम २०१८ साली झाला असला तरी जिल्हा पातळीवर हा निर्णय २००९-१० सालीच झालेला आहे. या सर्व काळात महामारी किंवा कोणतीही साथ नव्हती किंवा मंत्रालय पातळीवर निर्णय झाला तेव्हा २०१८-१९ ला महामारी, साथ किंवा कोरोना नव्हता, मग उशीर का झाला याचे उत्तर कोण देणार. प्रशासनाने प्रामाणिकपणे या दहा वर्षांच्या विलंबाबद्दल या धरणग्रस्तांची माफी मागितली पाहिजे. याविषयी कुठलेही समर्थन करणे म्हणजे या प्रकल्पग्रस्तांचा अवमान करण्यासारखेच आहे, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

यावेळी हरिश्चंद्र दळवी, मालोजीराव पाटणकर , सचिन कदम, महेश शेलार, चैतन्य दळवी, प्रकाश साळुंखे, सीताराम पवार, रामचंद्र कदम कार्यकर्ते उपस्थित होते.