शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

कोयना धरणाने गाठली पन्नाशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून पाऊस सुरूच असून, रविवारी सकाळपर्यंत नवजाला सर्वाधिक ७२ मिलीमीटरची नोंद झाली. तर ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून पाऊस सुरूच असून, रविवारी सकाळपर्यंत नवजाला सर्वाधिक ७२ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात ५० टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. तसेच धरणात पाण्याची आवक टिकून आहे.

जिल्ह्यात जवळपास २० दिवसांच्या खंडानंतर मागील आठवड्यात पाऊस सुरू झाला आहे. हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होत आहे. या पावसामुळे पश्चिमेकडे भात लागणीच्या कामाला वेग आला आहे. तसेच प्रमुख धरणातील पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे.

रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात नवजा येथे सर्वाधिक ७२ मिलीमीटर पाऊस झाला. तर जूनपासून आतापर्यंत तेथे १७२६ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तर कोयनेला ४० व जून महिन्यापासून १२६३ मिलीमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ५५ आणि यावर्षी आतापर्यंत १७६२ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. रविवारी सकाळी कोयना धरणात ५०.०४ टीएमसी पाणीसाठा झालेला. तर शनिवारी ४८.४८ टीएमसी साठा होता. कोयना धरणात २४ तासात दीड टीएमसीहून अधिक पाणी वाढले. त्याचबरोबर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक चांगली आहे. सकाळच्या सुमारास १७५५५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.

जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरण परिसरातही पाऊस होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. पूर्व दुष्काळी भागात कधीतरी पावसाची एखादी सर पडत आहे. अजूनही ओढ्यांना पाणी नाही. छोटे पाझर तलाव कोरडे पडलेले आहेत. माण, खटाव, फलटण तालुक्यांत मोठ्या पावसाची आवश्यकता कायम आहे.

.........................................................