शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

गुंठेवारीच्या निर्णयावर कोरेगावकर आक्रमक

By admin | Updated: February 9, 2015 00:46 IST

आंदोलनाचा दिला इशारा : प्रांताधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती

कोरेगाव : प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी कोरेगाव शहरातील गुंठेवारीबाबत एकतर्फी निर्णय घेत दस्त प्रमाणित न करण्याविषयी दुय्यम निबंधकांना पत्र वजा आदेश दिल्याने कोरेगावकर आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी शनिवारी प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करत त्यांच्यावर प्रश्नांची सरबती केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याबाबत त्यांनी सूचित केले. दरम्यान, याबाबत सकारात्मक विचार नाही झाला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल बर्गे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बर्गे, सातारा लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज बर्गे, लक्ष्मीचंद शहा, नगरविकास कृती समितीचे राजेश बर्गे, किशोर बर्गे, आबासाहेब जाधव, अण्णा बर्गे, राजेंद्र सावंत, बाळकिसन भोसले, उमेश जगताप, बच्चूशेठ ओसवाल, हरिभाऊ कोळी, उमेश भावी, अरुण दुबळे, आदींच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत कोरेगाव शहरासह रहिमतपूर आणि पाडळी स्टेशन (सातारारोड) येथे जमीन एकत्रिकीकरण योजना झालेली नसल्याने तुकडेबंदी लागू केलेली नाही, त्यामुळे गुंठेवारीचे दस्त करण्यास कोणतीही अडचण नसताना प्रांताधिकारी यांनी दिलेल्या एकतर्फी आदेशावर कोरेगावकर नागरिकांनी आक्षेप नोंदविला. ग्रीन झोनमुळे जमिनी बिनशेती होत नाहीत. शहर विकास आराखडा कालबाह्य झाला असून, त्याची देखील मुदत संपलेली आहे. शहरीकरण वाढत असताना प्रशासनाने अशी चुकीची भूमिका का घेतली, असा सवाल यावेळी करण्यात आला. गावठाणाचे क्षेत्र कमी असल्याने नागरिकांनी काय करायचे, आदी प्रश्न प्रांतांना करण्यात आले. या प्रश्नाच्या अनुषंगाने पालकमंत्री विजय शिवतारे यांना निवेदन दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांचा अवधी मागितलेला असून, त्याची मुदत संपून गेली आहे. प्रशासन चुकीचे निर्णय घेत असल्याने आम्ही वेळप्रसंगी आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला. (प्रतिनिधी)राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासन असताना दस्त होत होते. त्यावेळी कोणाचीही कसलीही तक्रार नव्हती. अधिकारी देखील तेव्हा कायद्याचे पालन करत होते. आता राज्यात शासन बदलल्याने अधिकारी देखील बदलले आहेत. कोरेगावातील गुंठेवारी बंद करण्याचे पाप भाजप व शिवसेना युती शासनाचे आहे, असा आरोप अ‍ॅड. श्रीकांत चव्हाण यांनी केला.