कोरेगाव : राज्य शासनाने तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्याविषयी अधिसूचना काढल्यानंतर कोरेगावातून सुमारे २३ हरकती जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. लोकसंख्या व शहराची हद्दवाढ या विषयाच्या अनुषंगाने हरकती घेतल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करणार असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याविषयी निर्णय घेऊन तशी अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती मागविल्यानंतर कोरेगावातून तब्बल २३ हरकती जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या होत्या. या हरकतींवर उपविभाग पातळीवर सुनावणी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी नुकतेच दिले होते. अॅड. पुरुषोत्तम बारसावडे, संतोष नलावडे, पृथ्वीराज बर्गे, राजेश बर्गे, डॉ. गणेश होळ, किशोर बर्गे, विठ्ठल बर्गे, दत्तात्रय झांजुर्णे, निसार खान, नीलेश बर्गे, राहुल बर्गे, गणेश धनावडे यांनी मुद्दे मांडले. (प्रतिनिधी)
कोरेगाव नगरपंचायतीला २३ हरकती दाखल
By admin | Updated: July 25, 2014 22:14 IST