शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

कोरेगाव ग्रामपंचायतीस जकात अनुदानाची रक्कम अदा

By admin | Updated: December 25, 2015 23:41 IST

पाण्यासाठी करणार उपाययोजना : विकासकामे गतीने करणार सरपंच-उपसरपंचांचा दावा

कोरेगाव : गेल्या वर्षापासून शासनाकडून येणे असलेली जकात अनुदानाची थकित रक्कम अखेर ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेकडून अदा करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांनी ७९ लाख ४८ हजारांचा धनादेश उपसरपंच राहुल बर्गे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांकडे प्रदान केला. शासनाकडून निधीची उपलब्धता झालेली असून, त्याद्वारे गतीने विकासकामे केली जातील, अशी ग्वाही उपसरपंच बर्गे यांनी दिली. जकात कर रद्द केल्यानंतर राज्य शासन दरवर्षी १ कोटी ५ लाख रुपये जकात अनुदान म्हणून ग्रामपंचायतीस अदा करत होते. गेल्या काही वर्षांपासून अनुदानाची रक्कम मिळण्यात दिरंगाई होत होती. मिळकत कर आकारणीवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न बंद झाले आहे. ग्रामपंचायतीचे अन्य उत्पन्नाचे मार्ग अत्यल्प असल्याने विकासकामे जवळपास ठप्प झाली होती. सरपंच विद्या येवले, उपसरपंच राहुल बर्गेयांच्यासह प्रदीप बोतालजी, संतोष चिनके, सुनील बर्गे, महेश बर्गे, रसिका बर्गे, शीतल पिसे, नीता बर्गे या सदस्यांनी जकात कर अनुदान मिळावे, यासाठी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा करून निधीची तातडीने उपलब्धता करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासनाकडून निधी उपलब्ध होताच पाटील यांनी ७९ लाख ४८ हजारांचा धनादेश उपसरपंच राहुल बर्गे, ग्रामपंचायत सदस्य महेश बर्गे, मनोज येवले, शंकरराव बर्गे यांच्याकडे प्रदान केला. काही तांत्रिक बाबींमुळे उर्वरित २६ लाखांचा निधी शासनाकडून उपलब्ध झालेला नाही, तो तातडीने उपलब्ध करून देण्याची सत्वर कार्यवाही सुरू आहे. येत्या काही दिवसांत त्या रकमेचा धनादेश ग्रामपंचायतीस दिला जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)दुष्काळी पार्श्वभूमीवर पाण्यासाठी उपाययोजना : बर्गेपत्रकारांशी बोलताना उपसरपंच राहुल बर्गे म्हणाले, ‘ग्रामपंचायतीची घरपट्टी आकारणी शासनाच्या आदेशामुळे बंद आहे, त्याचा थेट परिणाम विकासकामांवर झाला आहे. आगामी काळात जकात अनुदानाशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने आलेली रक्कम विकासकामांबरोबरच पाण्याच्या उपाययोजनांसाठी खर्ची घातली जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीचा विचार करता पाणी योजनांकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. जकात अनुदानाची कसल्याही प्रकारे उधळपट्टी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असून, मूलभूत सुविधा प्राधान्यक्रमाने देऊ.’