शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जल जीवन मिशनअंतर्गत कोल्हापूरची राज्यात बाजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शालेय विद्यार्थी आणि अंगणवाडीत जाणारी लहान मुलं यांना पाणी उपलब्ध न झाल्याने आजारांचा धोका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शालेय विद्यार्थी आणि अंगणवाडीत जाणारी लहान मुलं यांना पाणी उपलब्ध न झाल्याने आजारांचा धोका असतो. शाळा परिसरात स्वच्छतागृहात पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असल्याने शाळेच्या उपस्थितीवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे राज्याच्या सर्व ग्रामीण भागातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांबाहेर मुबलक पाणी देण्याचे काम सुरू झाले आहे. याअंतर्गत आत्तपर्यंत ५३ लाख ८८ हजार ४२८ ठिकाणी नळजोडणी करून पाण्याची सोय करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात सर्वांत आधी उद्दिष्टपूर्ती करून राज्यात बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ अकोला आणि अहमदनगरचा क्रमांक लागतो.

केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभागाने गांधी जयंतीपासून पुढील १०० दिवसांत ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळजोडणी देऊन पिण्यासाठी, वापरासाठी आणि स्वच्छतागृहात पाणी उपलब्ध देण्याचा उपक्रम हाती घेतला होता.

जल जीवन मिशन अभियानात राज्य शासनाचा ५० टक्के सहभाग असून राज्याच्या ग्रामीण भागात घराघरांतील नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविणे हे काम राज्य शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाण्याबाबत कालबद्ध नियोजन करणे आवश्यक असून नैसर्गिक, कृत्रिम पाणीसाठे याबाबतचा जल आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले होते.

या मोहिमेत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळजोडणी करून पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. १०० दिवसांच्या या मोहिमेत राज्यातील प्रत्येक गावच्या स्थितीचे सनियंत्रण राज्यस्तरावरून आणि जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे.

कोट :

शरीरात पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे मूळ कारण समजले जाते. मुलांसाठी अंगणवाडी आणि शाळांवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्याने २०२०-२०२१ चे ६८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासाठी पेयजलमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांनीही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनीही मौलिक मार्गदर्शन केले.

- आर. विमला, मिशन संचालक, जल जीवन मिशन, मुंबई

चौकट :

पुणे विभागातून कोल्हापूरने १ लाख २५ हजार १९४, नाशिक विभागातून अहमदनगरने २ लाख ३४ हजार ४७४, अमरावती विभागातून अकोलाने ५४ हजार ५२३, तर नागपूर विभागातून नागपूरने ९६ हजार ८६६ अंगणवाडी आणि शाळांच्या अंगणांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. राज्यात औरंगाबाद आणि कोकण विभागातून अद्याप एकाही जिल्ह्यातून उद्दिष्टपूर्ती झालेली नाही.