शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जल जीवन मिशनअंतर्गत कोल्हापूरची राज्यात बाजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शालेय विद्यार्थी आणि अंगणवाडीत जाणारी लहान मुलं यांना पाणी उपलब्ध न झाल्याने आजारांचा धोका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शालेय विद्यार्थी आणि अंगणवाडीत जाणारी लहान मुलं यांना पाणी उपलब्ध न झाल्याने आजारांचा धोका असतो. शाळा परिसरात स्वच्छतागृहात पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असल्याने शाळेच्या उपस्थितीवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे राज्याच्या सर्व ग्रामीण भागातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांबाहेर मुबलक पाणी देण्याचे काम सुरू झाले आहे. याअंतर्गत आत्तपर्यंत ५३ लाख ८८ हजार ४२८ ठिकाणी नळजोडणी करून पाण्याची सोय करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात सर्वांत आधी उद्दिष्टपूर्ती करून राज्यात बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ अकोला आणि अहमदनगरचा क्रमांक लागतो.

केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभागाने गांधी जयंतीपासून पुढील १०० दिवसांत ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळजोडणी देऊन पिण्यासाठी, वापरासाठी आणि स्वच्छतागृहात पाणी उपलब्ध देण्याचा उपक्रम हाती घेतला होता.

जल जीवन मिशन अभियानात राज्य शासनाचा ५० टक्के सहभाग असून राज्याच्या ग्रामीण भागात घराघरांतील नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविणे हे काम राज्य शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाण्याबाबत कालबद्ध नियोजन करणे आवश्यक असून नैसर्गिक, कृत्रिम पाणीसाठे याबाबतचा जल आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले होते.

या मोहिमेत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळजोडणी करून पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. १०० दिवसांच्या या मोहिमेत राज्यातील प्रत्येक गावच्या स्थितीचे सनियंत्रण राज्यस्तरावरून आणि जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे.

कोट :

शरीरात पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे मूळ कारण समजले जाते. मुलांसाठी अंगणवाडी आणि शाळांवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्याने २०२०-२०२१ चे ६८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासाठी पेयजलमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांनीही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनीही मौलिक मार्गदर्शन केले.

- आर. विमला, मिशन संचालक, जल जीवन मिशन, मुंबई

चौकट :

पुणे विभागातून कोल्हापूरने १ लाख २५ हजार १९४, नाशिक विभागातून अहमदनगरने २ लाख ३४ हजार ४७४, अमरावती विभागातून अकोलाने ५४ हजार ५२३, तर नागपूर विभागातून नागपूरने ९६ हजार ८६६ अंगणवाडी आणि शाळांच्या अंगणांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. राज्यात औरंगाबाद आणि कोकण विभागातून अद्याप एकाही जिल्ह्यातून उद्दिष्टपूर्ती झालेली नाही.