शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जल जीवन मिशनअंतर्गत कोल्हापूरची राज्यात बाजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शालेय विद्यार्थी आणि अंगणवाडीत जाणारी लहान मुलं यांना पाणी उपलब्ध न झाल्याने आजारांचा धोका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शालेय विद्यार्थी आणि अंगणवाडीत जाणारी लहान मुलं यांना पाणी उपलब्ध न झाल्याने आजारांचा धोका असतो. शाळा परिसरात स्वच्छतागृहात पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असल्याने शाळेच्या उपस्थितीवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे राज्याच्या सर्व ग्रामीण भागातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांबाहेर मुबलक पाणी देण्याचे काम सुरू झाले आहे. याअंतर्गत आत्तपर्यंत ५३ लाख ८८ हजार ४२८ ठिकाणी नळजोडणी करून पाण्याची सोय करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात सर्वांत आधी उद्दिष्टपूर्ती करून राज्यात बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ अकोला आणि अहमदनगरचा क्रमांक लागतो.

केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभागाने गांधी जयंतीपासून पुढील १०० दिवसांत ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळजोडणी देऊन पिण्यासाठी, वापरासाठी आणि स्वच्छतागृहात पाणी उपलब्ध देण्याचा उपक्रम हाती घेतला होता.

जल जीवन मिशन अभियानात राज्य शासनाचा ५० टक्के सहभाग असून राज्याच्या ग्रामीण भागात घराघरांतील नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविणे हे काम राज्य शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाण्याबाबत कालबद्ध नियोजन करणे आवश्यक असून नैसर्गिक, कृत्रिम पाणीसाठे याबाबतचा जल आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले होते.

या मोहिमेत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळजोडणी करून पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. १०० दिवसांच्या या मोहिमेत राज्यातील प्रत्येक गावच्या स्थितीचे सनियंत्रण राज्यस्तरावरून आणि जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे.

कोट :

शरीरात पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे मूळ कारण समजले जाते. मुलांसाठी अंगणवाडी आणि शाळांवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्याने २०२०-२०२१ चे ६८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासाठी पेयजलमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांनीही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनीही मौलिक मार्गदर्शन केले.

- आर. विमला, मिशन संचालक, जल जीवन मिशन, मुंबई

चौकट :

पुणे विभागातून कोल्हापूरने १ लाख २५ हजार १९४, नाशिक विभागातून अहमदनगरने २ लाख ३४ हजार ४७४, अमरावती विभागातून अकोलाने ५४ हजार ५२३, तर नागपूर विभागातून नागपूरने ९६ हजार ८६६ अंगणवाडी आणि शाळांच्या अंगणांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. राज्यात औरंगाबाद आणि कोकण विभागातून अद्याप एकाही जिल्ह्यातून उद्दिष्टपूर्ती झालेली नाही.