शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

नवदाम्पत्याच्या मृत्यूनंतर सुचले शहाणपण!

By admin | Updated: November 3, 2014 23:25 IST

खड्ड्यात पडलं डांबर : विजयनगरमध्ये रस्त्याची तत्काळ दुरुस्ती, अपघातस्थळी सकाळीच कर्मचारी दाखल

कऱ्हाड : दुर्घटना घडू नये म्हणून उपाययोजना करण्याऐवजी दुर्घटना घडून गेल्यानंतर दुरुस्ती करण्यात काही शासकीय कार्यालये धन्यता मानतात. बांधकाम विभागानेही याचाच कित्ता गिरवलाय. कऱ्हाड-पाटण मार्गावर विजयनगर येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे यापूर्वी अनेक अपघात झाले; पण त्याकडे लक्ष द्यायला, उपाययोजना करायला बांधकाम विभागाला वेळ नव्हता. अखेर या खड्ड्यांनी नवदाम्पत्याचा बळी घेतल्यानंतर बांधकामच्या अधिकाऱ्यांना जाग आली. रविवारच्या अपघातानंतर सोमवारी सकाळीच बांधकाम विभागाकडून ते धोकादायक खड्डे मुजविण्यात आले. पाटणहून कऱ्हाडला येताना विजयनगरपासून वीज कार्यालय बसथांब्यापर्यंत तीव्र उतार आहे. तसेच रस्त्याला वळण नसल्याने पाटणहून येणारी वाहने या उतारावरून भरधाव येतात. पूर्वी वीज कार्यालय थांब्यानजीक टोलनाका होता. तेथे वाहने थांबावीत, यासाठी गतिरोधक तयार करण्यात आले होते. तसेच टोलनाक्यावरील दिव्यामुळे रात्रीही त्या ठिकाणी अडथळा असल्याची जाणीव वाहनचालकांना होत होती. उतारावर टोलनाका असूनही अडथळ्यांमुळे चालकाकडून वाहन नियंत्रित केले जायचे. गतवर्षी विजयनगरचा टोलनाका बंद करण्यात आला. मात्र, टोलनाक्याचा साचा व गतिरोधक त्याच स्थितीत होते. रात्री टोलनाक्याच्या साच्यामध्ये विजेची सोय करण्यात आली नसल्याने रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या या साच्याला व दुभाजकाला वाहने धडकून अपघात व्हायचे. अपघातांची संख्या वाढल्यानंतर टोलनाक्याचा साचा हटविण्यात आला. तसेच गतिरोधकही काढण्यात आले. मात्र, हे करताना रस्त्याच्या मधोमध व गतिरोधक काढलेल्या ठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे तेथे मोठमोठे दगड ठेवण्यात आले. वास्तविक, ही खबरदारीची उपाययोजना होती; पण ती वाहनचालकांच्या जिवावर बेतू लागली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अंधारात दगड न दिसल्याने अनेक वाहने त्यावर आदळली. सप्टेंबरच्या अखेरीस या दगडांमुळे अनेक अपघात झाले. त्यानंतर रस्त्याच्या मधोमध असलेले ते दगड हटवून खड्ड्यात खडी टाकण्यात आली. मात्र, काही दिवसांतच ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी परिस्थिती झाली. खडी उखडून पुन्हा खड्डे पडले.विजयनगरपासून टोलनाक्याच्या ठिकाणापर्यंत रस्त्याला तीव्र उतार असल्याने भरधाव येणारी वाहने त्या खड्ड्यात आदळण्याची मालिका गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.बांधकाम विभागाच्या या दुर्लक्षाची शिक्षा मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील नवदाम्पत्याला भोगावी लागली. संबंधित खड्ड्यात आदळल्यानंतर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटून कंटेनरने प्रदीप व उषा पाटील या नवदाम्पत्याला चिरडले. खड्डे वेळेत मुजविले गेले असते तर कदाचित अपघात झालाच नसता. देवदर्शनाला निघालेल्या नवदाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला नसता. (प्रतिनिधी)डांबराचे पॅचवर्कअपघातानंतर खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळीच कऱ्हाड-पाटण मार्गावरील विजयनगर येथील खड्डे मुजविण्याची कार्यवाही सुरू केली. सकाळी दहा वाजताच बांधकामचे कर्मचारी खडी व डांबरासह त्याठिकाणी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी खड्ड्यांच्या परिसराची स्वच्छता करून अगोदर खड्डे खडीने भरून घेतले. त्यानंतर त्यावर डांबराचे पॅचवर्क करण्यात आले. दुपारपर्यंत हे काम सुरू होते. कऱ्हाडनजकीच्या वारुंजी फाट्यापासून पाटणपर्यंतचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग पाटण कार्यालयाच्या अखत्यारीत येतो. विजयनगर येथे सोमवारी करण्यात आलेली रस्त्याची दुरूस्तीही पाटण कार्यालयाकडून करण्यात आल्याचे सांगितले जाते.